Wednesday 2 October 2019

Khadi commission celebrates Mahatma Gandhi’s 150th birth anniversary


Khadi and Village Industries Commission  celebrates  Mahatma Gandhi’s 150th birth anniversary year in a unique way 

As the whole country is gearing to  celebrate ‘Father of the Nation’ 150th birth anniversary year, KVIC  is celebrating Mahatma Gandhi’s 150th Birth Anniversary by creating replica of Sabarmati Ashram in its premises while organizing KHADI FEST -2019 in  Mumbai from 2nd October to 1st November 2019. Sabarmati Ashram was home to Mahatma Gandhi from 1917 until 1930   and  the Ashram served as epicenter of the country's freedom struggle during Mahatma Gandhi stay there.  Mahatma Gandhi launched the famous Dandi march from the ashram on March 12, 1930. 

Inaugurating this unique exhibition Ms. Preeta Verma, Chief Executive Officer KVIC said, the institute established by Gandhiji in 1925 in the form of All India Spinners Association has taken an enormous form of Khadi and Village Industries Commission. Speaking further she said that Gandhiji was the only persona who was not only relevant in his times but is equally relevant today.  “Let us all imbibe the ideals of Mahatma and search for the Gandhi within us. Together we can fulfill the dreams of the Mahatma in letter and Spirit. Join us in our endeavour for increasing rural employment and upliftment of Villages through the auspices of KVIC” , She added.


As a part of celebrations commemorating 150th Birth Anniversary year of Mahatmaji, various events are arranged at Mumbai,  Porbandar, Sabarmati,Wardha,Champaran and Delhi commencing from 2nd October. The mega event in Mumbai is for a period of one month, with a theme based mega exhibition showcasing Gandhiji and Khadi, demonstration of Khadi & VI products/activities, sales of exclusive KVI products. Premier Khadi Institutions & PMEGP units are participating in the same and live demonstration of village industries activities/process/ status technology   contributing to the cause.

On this occasion of Gandhi 150, KVIC will be providing 4O% discount on Khadi Kurta, Gandhi Topi and Dhoti and 20% discount on other Khadi and Village Industries products for a period of 4O days through our Direct Sales Outlets.

Tuesday 1 October 2019

फार्सिकल अभिनयाची उत्तम जाण असणारा कलावंत हरपला - विनोद तावडे

फार्सिकल अभिनयाची उत्तम जाण असणारा कलावंत हरपला -  सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे


चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते विजू खोटे यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी नाटक व चित्रपट यामध्ये लिलया व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या निधनाने फार्सिकल अभिनयाची उत्तम जाण असणारा गुणी कलावंत हरपला, या शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आपला शोक व्यक्त केला.

गेल्या ५५ वर्षांपासून त्यांनी अनेक चित्रपटामध्ये विविध स्वरुपाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे अभिनय कौशल्य आणि संवादफेक अतिशय अप्रतिम असल्याने ते दर्शकांच्या कायम लक्षात राहतील. चित्रपट सृष्टीसोबतच छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची एक नवीन ओळख करुन दिली. चित्रपटसृष्टी व छोटा पडदा याबरोबर त्यांनी मराठी नाट्य सृष्टीतही आपली भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारली. विजू खोटे यांच्या निधनाने एक आदर्श कलावंत हरपल्याची भावना श्री. तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली.

Thursday 26 September 2019

Mohan Singh is no more


मोहन सिंग तू दुर्दैवी होतास !

५० वर्षे चित्रपट वितरणाच्या क्षेत्रात काम करून अतिशय सर्वसामान्य मृत्यू तुझ्या वाट्याला आला. आपल्या वयातही जवळपास ५० वर्षांचे अंतर आहे, पण गमतीदार क्षणांमध्ये तुला 'तू' संबोधण्याचा जो मी आनंद घेतला आहे, त्याचे साक्षीदारही आपणच आहोत. तुझ्या कामाचा आलेख बघता तुझ्या अंत्यसंस्काराला हिंदी चित्रपटसृष्टीतील चार दोन जुने कलावंत, निर्माते, वितरक तरी येतील, असे मला कायम वाटायचे. पण व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर तुझ्या वाट्याला आलेले दुर्दैव, या वैभवाची प्रचिती देणार नाही, याची जाणीव तुला होती. आणि काल तेच झाले.

अमिताभ बच्चन यांना नागपूरच्या सीताबर्डीची ओळख करून देणारा आणि रेल्वेच्या टीसीला "हरिवंशराय बच्चन का लडका है, कल स्टार बनेगा. ख्याल रखना", असे सांगणारा तूच तो मोहनसिंग अरोरा. दारासिंग नागपुरात आले की हॉटेलमधून थिएटरच्या मॅनेजरला फोन करून सांगायचे "सरदार को जरूर भेजना". मग तुम्ही सोबत जेवायला जायचे. देव आनंद नागपुरात येण्यापूर्वी विजय आनंद तुला फोन करून सांगायचे "देव आ रहा है, उसका सब इंतजाम करना" आणि मग तू देव आनंदचा नागपूरचा "गाईड" व्हायचास. प्रेम चोप्रा "टाईम्स अॉफ इंडिया"साठी वितरण वसुली एजंट म्हणून काम करायचे, तेव्हा नागपूर, गोंदिया आणि अमरावतीला वसुलीसाठी यायचे, हे तूच ठामपणे सांगितले होते. खुद्द प्रेम चोप्रांनी ते कबुल केले. धर्मेंद्र, जितेंद्र, बलराज साहनी, बडजात्या कुटुंब, खय्याम अशी कितीतरी नावे घेता येतील, ज्यांचा केवळ चित्रपटाच्या प्रमोशनपुरता तुझा संबंध नव्हता, तर त्याही पलीकडे ऋणानुबंध होते. तुला स्वतःचे मार्केटिंग करता आले असते तर तू यांच्यातील अनेकांशी अखेरच्या क्षणापर्यंत संपर्कात राहिला असता. पण, फकिरी वाट्याला आली आणि ती तू आनंदाने स्वीकारली. झोपडीत राहून कोण पुसणार होते तुझ्या वैभवाला? तरीही तत्कालिन सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी घेतली होती तुझी दखल. राज्य शासनाच्या चित्रपट महोत्सवात जितेंद्रच्या हस्ते तुझा सत्कार झाला. पंचशील टॉकीजमधील तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. पत्रकार म्हणून डोळ्यात पाणी येण्याचे क्षण जवळपास नाहीच येत वाट्याला. पण, त्या दिवशी आले. सत्कारासाठी तुझा पंचशीलच्या स्टेजवर आमंत्रित केले तेव्हा अंधारात जितेंद्रचे लक्ष गेले नाही. आणि जसा तू पायऱ्या चढून वर आला तसे जितेंद्र जागेवरून उठले आणि "सरदार?” हा एकच प्रश्नांकित शब्द त्यांनी उच्चारला आणि तुला कडाडून मिठी मारली. हा प्रसंग लिहीतानाही कंठ दाटून येतो सरदार. कुण्या मोठ्या नटाचे निधन झाले की मी तुला फोन करायचो आणि तू कोरिओग्राफर, सिनेमॅटोग्राफर पासून मेक-अपमन पर्यंत प्रत्येकाची नावे सांगायचा. तुला आज खरं सांगतो... तू अशी डिटेल माहिती दिली, की मी अॉफिसला येऊन गुगलवरून त्याची खात्री करून घ्यायचो. माझा तुझ्यावर विश्वास होता, तरीही. प्राण यांच्या एका नातेवाईकाचे धरमपेठमध्ये चपलेचे दुकान होते, अमजद खान यांच्या आईचे निधन झाल्यामुळे राजेश खन्ना यांच्या चित्रपटाचे नागपुरातील चित्रीकरण रद्द झाले... हे सारे तूच सांगायचास आणि तेही ठामपणे. देशभरात फ्लॉप गेलेले चित्रपट दिग्गज निर्मात्यांनी नागपुरात वाजवून घेतले आहेत, ते तुझ्या प्रमोशनच्या स्टाईलमुळे. आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन चित्रपटांचे प्रमोशन होते, तू पूर्वी स्वतःच सायकलने सर्व वर्तमानपत्रांच्या कार्यालयांमध्ये जाऊन पत्रकार परिषदेचे निमंत्रण द्यायचास. पत्रकारितेच्या क्षेत्रातील लक्ष्मणराव जोशी सर (Laxman Joshi), विजय पणशीकर सर, प्रकाश दुबे सर यांची नावे कायम तुझ्या ओठावर असायची. छायाचित्रकार शेखर सोनी यांच्याबाबत तू सतत विचारायचास. एकदा पंचशील सिनेमागृहाच्या बाहेर तू माझा हात घट्ट पकडला आणि "बीस रुपये है क्या?” असे विचारले. मी 30 रुपये दिले, तर तू त्यातील दहा परत केले. मला गंमत वाटली. वाटलं काही काम असेल आणि सुटे नसतील. पण, दुसऱ्या दिवशी कळले की तुझ्याकडे खरच पैसे नव्हते आणि लुनामध्ये पेट्रोल टाकण्यासाठी तुला हवे होते. नंतर काही दिवसांनी कळले, की तू एका मॅगझीनला चित्रपटांचा किती व्यवसाय झाला, याचे रिपोर्टींग करतो आणि तुला दर सहा महिन्यांनी त्याचे मानधन मिळते. तेव्हाही तू एेंशीच्या घरात होतास. पण एका संस्थेला पुरस्कारासाठी तुझे नाव सुचवले तेव्हा "कॅश नही होना, बहुत कमा लिया" असे आयोजकाला सांगणारा मोहनसिंग मी बघितला आहे. "झुंड"च्या शुटींगसाठी अमिताभ नागपुरात होते, तेव्हाही तुला म्हटले होते भेटण्याबाबत. पण, तू म्हणाला "भिड में नही जा सकता मै". अनेक प्रसंगांचा उल्लेख करता येईल. डॉ. विलास चिंतामण देशपांडे आणि डॉ. सुनिती देव (Suniti Deo) यांनी एकदा मला या अनुभवाचे काय करायचे हे सांगितले होते. त्यालाही पाच वर्षे झाली. तू जिवंत असताना ते झाले असते, तर आनंद झाला असता. तुझे मेहाडिया चौकातील कार्यालय, पंचशीलचे व्यवस्थापक राजा लहेरिया यांच्यामुळे झालेली आपली भेट, त्याठिकाणी महेश (Mahesh Tickley Photojournalist) आणि मी केलेले एक शुटींग, तुझ्या मुलीचे आणि त्या पाठोपाठ बहिणीचे निधन... वगैरे वगैरे. तुझ्या झोपडीच्या छतातून सतत कचरा पडायचा आणि तरीही ताईने बनवलेले पराठे मी व महेश त्या धुळीसकट आनंदाने खात होतो. खूप आहे रे माझ्याकडे. पण, "मेल्यावर माणसाची किंमत होते" हा नियम मोडायचा नसतो. तुझी-माझी शेवटची भेट किती ह्रदय पिळवटून टाकणारी होती, याचा संदीप (Sandeep Soni) सोनी साक्षीदार आहे. त्या भेटीचे वर्णन लिहीताना माझी बोटं अडखळत आहेत. त्यासाठी वेगळे निमित्त शोधेन. तुर्तास एवढेच.

श्रद्धांजली वाहणार नाही... मी तुला जिवंत ठेवणार आहे !

तुझा,

नितीन

(Not original, copied from WhatsApp)

Tuesday 24 September 2019

राईट टू सर्व्हिस अॅक्ट म्हणजेच सेवा हमी कायदा महाराष्ट्रात लागू

राईट टू सर्व्हिस अॅक्ट म्हणजेच सेवा हमी कायदा महाराष्ट्रात लागू


महाराष्ट्रात आजपासून 'राईट टू सर्व्हिस अॅक्ट' म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय. यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा तब्बल 43  सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही.
तब्बल 43 सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल... आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.

महाराष्ट्र सरकारची वेबसाईट

www.aaplesarkar.maharashtra.gov.in

वर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करावं लागेल... निर्धारित कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे हाऊसिंग राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिलीय.

या विभागांच्या सेवांचा आहे समावेश...
महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतील.
या सेवांचा आहे समावेश....

• वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
• मिळकतीचे प्रमाणपत्र
• तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
• ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
• पत दाखला
• सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
• प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज
• अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
• भूमिहीन प्रमाणपत्र
• शेतकरी असल्याचा दाखला
• सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
• डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
• जन्म नोंद दाखला
• मृत्यु नोंद दाखला
• विवाह नोंदणी दाखला
• रहिवाशी प्रमाणपत्र
• दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
• हयातीचा दाखला
• ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
• निराधार असल्याचा दाखला
• शौचालयाचा दाखला
• विधवा असल्याचा दाखला
• दुकाने आणि अस्थापना नोंदणी
• दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
• कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण
• नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी
• सेवानियोजकाची नोंदणी
• शोध उपलब्ध करणे
• मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
• दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा
...तर सरकारी बाबूंना भरावा लागेल दंड
'राईट टू सर्व्हिस अॅक्ट'मध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड लावण्याची तरतूद राज्य शासनानं केलीय. निर्धारित वेळत तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला 500 ते 5000 रुपयांपर्यंत दंड बसेल.

सध्या सेवा हमी कायद्यात केवळ 43 सेवांचा समावेश असला तरी येत्या वर्षी मार्चपर्यंत या सेवांचा आकडा 135 वर जाण्याची शक्यता आहे.


Thursday 19 September 2019

नवीन नाटय निर्मिती अनुदान नियमावलीत बदल


मुंबई, दि. १९ सप्टेंबर : राज्य शासनामार्फत नवीन नाटय निर्मिती करणाऱ्या संस्थांना नाटय प्रयोग सादरीकरणासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेत यापूर्वी व्यावसायिक व संगीत नाटकांसाठी राज्यातील सहा महसूली विभागात प्रत्येकी दोन प्रयोग सादर करणे आवश्यक होते, आता नवीन नियमानुसार सहा महसूली विभाग ऐवजी चार महसूली विभागात प्रत्येकी दोन प्रयोग सादर करणे आवश्यक आहे, अशी सुधारणा करण्यात आली आहे.
        तसेच प्रायोगिक नाटकांनाही जास्तीत जास्त अनुदान मिळावे यासाठीचे नियम सुद्धा शिथिल करण्यात आले आहेत. प्रायोगिक नाटकांना अनुदान मिळण्यासाठी असणारा जो पहिला १० चा टप्पा होता तो आता कमी करण्यात आला असून पहिल्याच टप्प्यात ५ प्रयोगांचे अनुदान घेता येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात सहा महसूली विभागात प्रत्येकी एक प्रयोग करण्याची अट आता शिथिल करण्यात आली असून आता फक्त दोन महसूली विभागात प्रत्येकी एक प्रयोग सादर करावयाचा आहे. तसेच नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी आवश्यक असणारी पोलीस परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. नाट्यप्रयोग सादरीकरणाचा यापूर्वी नसलेला कालावधी या नियमावलीत निश्चित करण्यात आला आहे.
        सदरची योजना ही सन २००६ पासून सुरू करण्यात आली आहे. अनेक जुन्या नाटय निर्मात्यांबरोबर नवीन नाटय निर्मातेही या योजनेचा लाभ घेत असतात. परंतु, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात नाट्यगृह नसल्याने ज्या महसूली विभागातील जिल्ह्यात नाट्यगृह नाहीत, त्या जिल्ह्यात नाट्यप्रयोग करणे शक्य नसल्याने, ही अट शिथिल करण्याची विनंती नाटय निर्मात्यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांना केली. त्याची दखल घेत सदरच्या योजनेतील काही अटी आता शिथिल करण्यात आल्या असून, यामुळे नाटय निर्मात्यांना ज्या जिल्ह्यात सुस्थितीत नाट्यगृह आहे अशा महसूली विभागातील जिल्ह्यात नाट्यप्रयोग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
      व्यावसायिक निर्मात्यांबरोबर प्रायोगिक रंगकर्मींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच यामुळे जास्तीत नाटय नाट्यनिर्मिती होऊन नाटय रसिकांना दर्जेदार नाटकं पाहता येणार आहे.
    नाटय क्षेत्रातील नाटय निर्मात्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

दलित शब्द हा व्यवहारात असायलाच हवा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


दलित शब्द हा  व्यवहारात असायलाच हवा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 19 -  शासकीय नोंदीमध्ये जातीचा उल्लेख करताना दलित हा शब्द यापूर्वीही वापरला जात नव्हता त्यामुळे शासकीय नोंदीमध्ये दलित शब्दाला मनाई ठीक आहे मात्र  व्यवहारात तसेच प्रसार माध्यमांमध्ये  दलित शब्दाला मनाई करता कामा नये. दलित शब्दच शेकडो वर्षांपासून आलेल्या सामाजिक विषमतेच्या वेदनेला नेमकेपणाने प्रकट करतो. त्यामुळेच भारतीय दलित पँथर या संघटनेची आम्ही स्थापना केली होती. माझ्या मते दलित शब्द व्यवहारात असायलाच हवा असे प्रतिपादन  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने सरकारी कागदपत्रांतून दलित शब्द वापरण्यास  मनाई करणारा आदेश नुकताच काढला आहे. याबाबत ना.रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना व्यवहारात दलित शब्द असायलाच हवा अशी भूमिका मांडली आहे. बोलण्यामध्ये भाषणांमध्ये वृत्तपत्र मीडिया माध्यमांमध्ये दलित शब्द वापरण्यास मनाई करणे योग्य ठरणार  नाही. त्यामुळे व्यवहारात दलित शब्द असायलाच हवा सरकारी दस्तऐवजांमध्ये यापूर्वीपासून अनुसूचित जाती हा शब्दप्रयोग केला जात असल्याचे सांगत व्यवहारात  दलित शब्दाला मनाई नसावी असे स्पष्ट मत ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

#RAMDASATHAWAL
#Dalit
#रामदासआठवले
             

Wednesday 18 September 2019

मुंबई विद्यापीठात कॉल सेंटर सरू होणार


मुबई विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांची वाढती संख्या, प्रवेश, परीक्षा तसेच निकाला दरम्यान विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत विद्यार्थ्यांचे तात्काळ निराकरण व्हावे, यासाठी मुंबई विद्यापीठात तात्काळ कॉल सेंटर सुरू करण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर यांना दिले आहेत.

मुंबई विद्यापीठाचा विस्तार सावंतवाडी, रत्नागिरी, रायगड, पनवेल, मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर ते डहाणूपर्यंत आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या ही सुमारे ७८० घरात पोहचली आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये मिळून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे ५ लाखांपेक्षा जास्त आहे.  यातील ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी दूरवरुन महाविद्यालय गाठावे लागते. परीक्षेचा अर्ज भरताना, निकालावेळी अथवा छोटया छोटया कामांसाठी विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठात अथवा उपकेंद्रात सातत्याने जावे लागते. एक-दोन वेळा जाऊनही विद्यार्थ्यांचे काम होत नाहीत. शहरीबरोबरच ग्रामिण भागांतील विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊनच तसेच बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन विद्यार्थ्यांची होणारी परवड तसेच पैशाचा पडणार भुर्दंड दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अद्ययावत कॉल सेंटर सुरू करावे, असा अतारांकीत प्रश्‍न जुलै २०१९ च्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सदस्यांनी उपस्थित केला होता.

या प्रश्‍नाला उत्तर देताना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाचे मोबाईल ऍप कार्यरत असून अद्ययावत कॉल सेंटर सुरू करण्याबाबत विद्यापीठ स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे, छापील उत्तर देण्यात आले. बदलत्या काळानुसार अन्य विद्यापीठांच्या स्पर्धेत आपले विद्यापीठ भविष्यातही कुठेही मागे राहू नये विद्यापीठाचे स्वत:चे कॉल सेंटर असणे ही बाबा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची व पैशाची बचत होणार असल्याचे, राज्यमंत्री यांनी पत्रात नमुद केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामासाठी विद्यापीठातकिंवा उपकेंद्रावर न जाता सर्व आवश्यक माहिती प्राप्त होईल. यासाठी विद्यापीठाने तात्काळ कॉल सेंटर सुरू करावे, असे निर्देश राज्यमंत्री वायकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी पत्राद्वारे दिले आहेत. 

Tuesday 27 August 2019

प्रवीण तरडे अपघातातून बचावले



प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते, प्रविण विठ्ठल तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी यांच्या गाडीला मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता सासवड जवळ हिवरे गावात , महादेव मंदिरासमोर अपघात झाला.

त्यांच्यासोबत कार्यकारी निर्माते विशाल चांदणे सुद्धा होते.
सुदैवाने या अपघातात, गाडीतील एअर बॅग्स मुळे कोणालाही इजा झाली नाही. सर्वजण सुखरूप आहेत. सासवड पोलिस घटनास्थळी पोचले आहेत. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. ते सुखरूप पुण्यात पोचले आहेत.

Friday 23 August 2019

प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच निर्मितीचा शुभारंभ


जानेवारी २०२० पासून प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच सुरु होणार  - विनोद तावडे

प्रायोगिक रंगभूमी होणे ही महाऱाष्ट्राची सांस्कृतिक आवश्यकता आहे, गेली सुमारे १० वर्षे लालफितीमध्ये रखडलेल्या प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाच्या कामाचा आज शुभारंभ आज झाला असून सर्व नियम व कायद्याचे पालन करुनच येत्या सहा महिन्यात रंगमंचाचे काम पूर्ण होईल आणि येत्या जानेवारी २०२० पासून प्रायोगिक रंगमंच सुरु होईल. राज्य शासन प्रायोगिक रंगभूमीच्या चळवळीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, महाराष्ट्रातील नाट्यचळवळ अधिक जोमाने पुढे नेता येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज ठामपणे सांगितले.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मध्ये रवींद्र नाट्य मंदिराच्या पाचव्या व सहाव्या मजल्यावरील जागेत प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच निर्मितीचा शुभारंभ आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरुणकाका काकडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह नाट्य क्षेत्रातील नामंवत मंडळी उपस्थित होती.

यावेळी  सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. तावडे यांनी सांगितले की, एखादा प्रकल्प लालफीतीमध्ये अडकतो म्हणजे काय याचे हे अतिशय समर्पक उदाहरण आहे. २००९ पासून ही जागा अशीच पडून होती. याजागेत प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाची निर्मितीमध्ये अनेक अडथळे येत होते. परंतु गेल्या सुमारे दीड–दोन वर्षात हा प्रकल्प उभारणीचे उद्दीष्ट्य आखण्यात आले. या फाईल वर असलेले अनेक प्रशासकीय तांत्रिक अडथळे दूर करीत व नियम व कायद्याचे पालन करुन प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाचा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प करण्यात आला. गेली सुमारे १० वर्षे लालफितीत अडकलेला हा प्रकल्प मंजूर करताना अतिशय पारदर्शकता ठेवण्यात आली आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत या रंगमंचाबाबत माहिती देताना श्री. तावडे यांनी सांगितले की,  प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सुरु ठेवणे, ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. प्रायोगिक रंगभूमीला प्राधान्य मिळावे, चांगले कलाकार घडावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, येथील आसनव्यवस्था रंगमंचाला पूरक अशी करण्यात येणार आहे.

वर्षभरात प्रायोगिक नाट्यसाठी २०० प्रयोग ठेवण्यात येतील. अतिशय नाममात्र दरामध्ये नाट्यसंस्थेला प्रायोगिक रंगभूमी उपलब्ध करुन देण्यात येईल. यामध्ये रंगकर्मींना सर्व पायाभूत सोयी-सुविधा देण्यात येतील.  व्यावसायिक नाट्यक्षेत्रामध्ये यशस्वी होत असताना प्रायोगिक रंगभूमी हा नाटकाचा पाया असतो. त्यामुळे या माध्यमातून प्रायोगिक नाट्यभूमीचा पाया भक्कम होईल. तसेच आजच्या युवा कलाकारांना या नवीन व्यासपीठाच्या मार्फत आपली कला सादर करण्याची अधिक चांगली संधी मिळेल, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

राज्य शासन व महापालिकांमार्फत नाट्यगृहांची उभारणी करण्यात येते. त्यानंतर या नाट्यगृहांमध्ये चालणा-या नाट्यप्रयोगाच्या भाड्यामधून नाट्यगृहांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येईल, अशी सर्वसाधारण व्यवस्था आहे, पण नाट्यगृहच्या देखभाल व दुरुस्तीसाठी राज्य शासन व पालिका यांच्या व्यवस्थेतून पुरेशी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राज्य शासन व पालिकांच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असेही श्री.तावडे यांनी स्पष्ट केले.

प्रायोगिक रंगभूचीच्या प्रस्तावित रंगमच असा असेल...
१. ३९१ दर्जेदार आसने
२. ‍डिजीटल सिनेमा प्रोजेक्टर
३. आधुनिक तंत्रज्ञानाची युक्त प्रकाशव्यवस्था व ध्वनी व्यवस्था
४. दर्जेदार ध्वनी शोषक (अकौस्टिक्स) प्रणाली
५. सुसज्ज मेकअप रुम
६. डिजिटल सिनेमा प्रोजेक्टरसाठी स्वतंत्र कक्ष
७. सेंटरलाईज्ड वातानुकुलन
८. भव्य स्टेज
९. भव्य स्क्रिन व आधुनिक स्टेज ड्रेपरी
१०.पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रतिक्षालय
११.   २ उद्वाहने
१२.   अग्नीशमन यंत्रणा.

Wednesday 21 August 2019

Sharad Talwalkar

सुप्रसिद्ध अभिनेते शरद तळवलकर यांची आज पुण्यतिथी....21 ऑगस्ट

शरद गणेश तळवलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१८ रोजी नगर जिल्ह्यात बोधेगाव येथे झाला. त्यांचे शेळी शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कुलमध्ये झाला. शाळेत  असताना ते  शिक्षकांच्या नकला  खूप करायचे. १९३५ साली त्यांनी ' रणदुमदुभी ' नाटकात शिशुपालाची भूमिका करणारा कलाकार ऐन वेळी अडला आणि शरद तळवलकरांनी आपल्या अभिजात कलागुणांनी त्या भूमिकेत कमालीचा  रंग भरला. तेव्हापासून दरवर्षी स्नेहसंमेलनच्या नाटकात त्यांना  आग्रह धरला जाऊ लागला. नटश्रेष्ठ केशवराव दाते यांच्या पाहण्यात त्यातली एक भूमिका आली आणि त्यांच्या ' नाट्य विकास ' संस्थेत त्यांनी तळवलकरांना बोलवले. नाटकात काम करणे हे त्याकाळात फारशी  सन्मान्य गोष्ट नव्हती. वडिलांनी त्यांना विरोध केल्यावर शरद तळवलकर यांनी आपले घर सोडले आणि मार्गदर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला मा. विनायक  यांच्या ' हंस पिक्चर्स ' मध्ये बाबुराव पेंढारकर यांना भेटले. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण  करायचे ठरवून अकाउंटंटची नोकरी पत्करली. महाविद्यालयाच्या नाटकातून केलेल्या त्यांच्या भूमिका लोकांना आवडल्या, लोकप्रिय झाल्या. शरद तळवलकर यांनी कलाकार , दिग्दर्शक राजा परांजपे यांना गुरुस्थानी मानले होते.
पुढे शरद तळवलकर व्यावसायीक नाटकांतून  भादव्या , फाल्गुनराव , कामण्णा , तळीराम , धर्यधर अशा भूमिका  करू लागले. १९५२ साली गाजलेल्या ' पेडगावचे शहाणे ' आणि ' लाखाची गोष्ट ' या राजा परांजपे यांच्या चित्रपटात त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या. त्याचप्रमाणे दत्ता धर्माधिकारी यांच्या  ' अखेर जमलं ' या चित्रपटात लक्षणीय भूमिका मिळाली.
१९५५ साली आलेल्या ' करायला गेलो एक ' या तुफान विनोदी फार्सने शरद तळवलकरांचे नाव महाराष्ट्रभर केले. तेथून त्यांची यशस्वी वाटचाल चालू झाली . अभिनयाच्या वेडापायी त्यांनी पुणे विद्यापीठातील नोकरी सोडली. पुढे राजा गोसावी यांच्याबरोबर केलेले ' अवघाची संसार ' , ' दोन घडीचा डाव '  आणि ' याला जीवन ऐसे नाव ' हे त्यांचे चित्रपट गाजले. १९६२ साली आलेल्या ' रंगल्या रात्री अशा ' या चित्रपटात त्यांना आव्हानात्मक भूमिका मिळाली. ' बायको माहेरी जाते ' या चित्रपटात त्यांची विनोदी भूमिका खूप गाजली. त्यांनी संशयकल्लोळ , लग्नाची बेडी  , अपराध मीच केला , दिवा जळू दे सारी रात , भावबंधन , ह्या नाटकातून  कामे केली तर घरोघरी हीच बोंब , अप्पाजींची सेक्रेटरी अशा नाटकातून इरसाल भूमिकाही केल्या. त्यांचा मी एकच प्याला मधील तळीराम जेव्हा पहिला तेव्हा त्यांचा एक हात वर करून ' थोडीशी घेतो  ' हे सांगण्याचा अभिनय लाजवाब असे. शरद तळवलकर यांचे ' लग्नाची बेडी ' या नाटकातील काम इतके इरसाल होते की सुदैवाने आजही आपण आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते  बघू शकतो.
शरद तळवलकर यांनी मुबईचा जावई , आली अंगावर , नवरे सगळे गाढव , चांदणे शिंपीत जा , थोरली जाऊ , गडबड घोटाळा यातील विनोदी भूमिका गाजल्या होत्या. ' धुमधडाका ' मधील शरद तळवलकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगवलेला चित्रपटाची कथा सांगण्याचा सीन कोणीही विसरू शकत नाही. एकटी , लेक चालली सासरला या चित्रपटातील त्यांच्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या. शरद तळवलकर यांनी १६० हुन अधिक चित्रपटातून कामे केली.
त्यांचे डार्लिग डार्लिग , सखी शेजारणी ह्या नाटकाचे प्रयोग चालूच होते आणि त्यांना आजाराने गाठले. तरी पण त्यांची विनोदबुद्धी शाबूत होती. माझा एक मित्र त्यांना भेटायला गेला तेव्हा तो बिचारा शांतपणे आत गेला , शरद तळवलकर डोळे उघडून त्याला हसून  म्हणाले ' अरे अजून आहे मी ' आणि मग त्याच्याशी त्यांचे बोलणे सुरु झाले. त्यांच्या  तोडून त्यांचे किस्से ऐकणे म्हणजे धमाल होती. एकदा ते एका  मुलाखतीत म्हणाले होते , ' माझे लग्न स्मशानात ठरले  जिथे लोकांचे संसार मोडतात तिथे माझा संसार सुरु झाला.' त्याची कथाही अजब आहे.
शरद तळवलकर यांना  एकटी , मुंबईचा जावई , जावई विकत घेणे आहे , रंगल्या रात्री अशा , धूम धडक , लेक चालली सासरला तू तिथे मी ह्या  चित्रपटासाठी अवॉर्ड्स मिळाली होती.
शरद तळवलकर यांना  स्टेजवर अभिनय करताना पाहणे म्हणजे पर्वणीच असे . त्यांच्या  ' अप्पाजींची सेक्रेटरी ' या नाटकात तर त्यांनी इतकी धमाल केली होती की त्यांनी जे नाटक पाहिले आहे तो ते नाटक कधीच विसरू शकणार नाही. जवळजवळ ६० वर्षे ते अभिनय करत होते.
अशा या चतुरस्त्र अभिनेत्याचे २२ ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले.

सतीश चाफेकर

लोकमत
(Cop

Ganpat patil



२० ऑगस्ट मराठी रजतपटावरील ज्येष्ठ कलाकार गणपत पाटील यांचा जन्मदिन.
"आत्ता गं बया!" हे इतकेच शब्द गणपत पाटलांची थोरवी सांगण्यास पुरेसे आहेत.तमाशाप्रधान चित्रपट मराठीत अमाप आले. त्यात नाच्याचे काम करणारी बरीच कलाकार मंडळी होऊन गेली. पण "गणपत पाटील" ह्या नावाशी कुणाचीही तुलना होऊच शकत नाही, इतका तो नाच्या त्यांनी आपल्या अभिनयाने जीवंत केला होता. बोलणं,दिसणं आणि नाचणं अशा तिहेरी अंगांनी त्यांचा सहजसुंदर अभिनय नटलेला होता.."झाले बहू, होतिलही बहू,परंतू या सम हा!" फक्त एकच ! गणपत पाटील.
त्यांच्या ‘आत्ता ग़ बया‘ ला दाद दिली नसेल असा मराठी रसिक विरळाच. अंगात मखमली बदाम अन त्यावर हाफ जाकीट, गळ्यात गुंडाळलेला रंगी बेरंगी रुमाल अन डोक्यावर बुट्टेदार टोपी अशा वेशातले गणपत पाटील त्यांच्या नाचाच्या भूमिकेत समरसून जायचे. या भूमिकेने त्याना मानही दिला अन प्रचंड अपमान देखील. त्यांनी साकारलेल्या भूमिकेतल्या पात्राने वास्तवातल्या गणपत पाटलांना मात दिली. खरे तर रसिक प्रेक्षकानी दिलेली ही दाद होती,
गणपत पाटलांचा जन्म २० ऑगस्ट १९२० कोल्हापुरात एका गरीब कुटुंबातला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली.
दरम्यान राजा गोसावी यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले.
त्यासुमारास पाटलांना राजा परांजप्यांच्या ’बलिदान’ व राम गबाल्यांच्या ’वंदे मातरम्‌’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली.
चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची – म्हणजेच ’नाच्या’ची – आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले.
बायकी किरटया आवाजात ओरडत बोलताना उजव्या हाताची तर्जनी हनुवटीवर ठेवून अन डावा हात कमरेवर ठेवून बोलणारे अंगाला लचके द्यायचे अन अगदी ठसक्यात खुमासदार पद्धतीने तो नाच्या साकारायचे. खरे तर त्यांच्या वाट्याला आलेली अगदी नगण्य असणारी जेमतेम फुटेज असणारी ही भूमिका ते जगायचे अन ती भूमिका प्रेक्षकाच्या मनात ठसायची. प्रेक्षक देखील त्याना मनापासून दाद द्यायचे. तत्कालीन मराठी सिनेमे अन त्यातही तमाशापट यांचा धांडोळा घेताना सर्व रांगडे मराठी अभिनेते डोळ्यापुढे येतात. अरुण सरनाईक, सुर्यकांत मांढरे, कुलदीप पवार,चंद्रकांत… सांगत्ये ऐका हा त्यातला सुवर्ण पट म्हणावा लागेल. जयश्री गडकर, माया गांधी, सीमा ते उषा नाईक – उषा चव्हाण पर्यंत कोणाचेही तमाशाप्रधान चित्रपट पाहिले तर त्या सर्वांचा एकच समान धागा होता तो म्हणजे गणपत पाटील !
गणपत पाटलांनी साकारलेला कोणताही सिनेमा घ्या त्यात त्यांची भूमिका जास्तीत जास्त मोठी आठ ते नऊ मिनिटांची आहे. बालध्रुवमध्ये ते बालकलाकार म्हणून चक्क मॉबमध्ये उभे होते. १९४९ मधल्या ‘मीठभाकर‘ने त्यांना ओळख दिली. ‘राम राम पाव्हणं‘ ने शिक्का मारला तर १९५१ च्या ‘पाटलाचा पोर‘ने त्यांची चौकट पक्की केली. त्याच वर्षी आलेल्या ‘छत्रपती शिवाजी‘मध्ये त्यांनी अनेक छोट्या भूमिका पार पाडल्या होत्या. १९६० शिकलेली बायको’ने त्यांचे बस्तान पक्के केले. १९६३ मधील ‘थोरातांची कमळा‘ने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्या नंतर आलेल्या १९६४ मधल्या ‘पाठलाग‘, ‘सवाल माझा ऐका‘, ‘वाघ्या मुरळी‘ या सिनेमांनी त्यांचे आयुष्य बदलले. इथेच घात झाला. खरे गणपत पाटील लोप पावले आणि नाच्या गणपत पाटील लोकमानसाच्या नसनसात भिनला. १९६५ मध्ये आलेल्या ‘केला इशारा जाता जाता‘ने त्यांना स्टार कलाकारांईतके महत्व आले. १९६५ च्या ‘मल्हारी मार्तंड‘ आणि ‘रायगडचा राजबंदी‘ने मराठी तमाशापटात गणपत पाटलांचे स्थान अबाधित केले. १९६७ -‘बाई मी भोळी‘ आणि ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी‘ आणि ‘सांगू मी कशी‘ ‘सुरंगा म्हनत्यात मला‘, ‘छंद प्रीतिचा‘,’धन्य ते संताजी धनाजी‘ पर्यंत सारे ठीक चालले होते. मात्र १९६८च्या ‘एक गाव बारा भानगडी‘ने गणपत पाटील थोडेसे सावध झाले. कारण या सिनेमाने लोकप्रियतेचे नवे विक्रम केले आणि सार्वजनिक जीवनात आपला तमाशा होऊ लागलाय हे पाटलांच्या ध्यानी येऊ लागले. १९६९ मधील ‘खंडोबाची आण‘ व ‘गणगौळण‘ मध्ये त्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण १९७०च्या ‘अशी रंगली रात‘ आणि ‘गणानं घुंगरू हरवलं‘ या सिनेमात त्यांच्या वाटेला मोठे फुटेज आले. १९७१ च्या ‘अशीच एक रात्र‘ आणि ‘लाखात अशी देखणी‘ने पुन्हा गाडी रुळावरून ढासळू लागली. मात्र १९७१ मध्ये दादांच्या ‘सोंगाड्या‘ने त्यांना नाव दिले अन समाजाने त्यांचे नाव घालवले. यानंतर आलेल्या अनेक सिनेमात १९७२ – ‘पुढारी‘ १९७४ – ‘सून माझी सावित्री‘, ‘सुगंधी कट्टा‘ १९७६- ‘जवळ ये लाजू नको‘ १९७८ – ‘कलावंतीण‘, ‘नेताजी पालकर‘ १९७९ – ‘ग्यानबाची मेख‘, ‘हळदी कुंकू‘ १९८० – ‘मंत्र्याची सून‘, ‘सवत‘ १९८१- ‘पोरी जरा जपून‘ १९८१ – ‘तमासगीर‘ १९८२ – ‘दोन बायका फजिती ऐका‘, ‘राखणदार‘ १९८७ – ‘बोला दाजिबा‘, ‘इरसाल कार्टी‘ १९९०- ‘थांब थांब जाऊ नको लांब‘ १९९३ – ‘लावण्यवती‘ २००६ – ‘मा. मुख्यमंत्री गणप्या गावडे‘ हे चित्रपट मुख्य गाजले.
गणपत पाटील जेंव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेंव्हा त्यांच्याशिवाय तमाशापट अशक्य झाला होता. विशेष बाब म्हणजे तमाशाच्या फडावर नाचणारी कलावंतीण जयश्री गडकर, लीला गांधी, संध्या, उषा चव्हाण, उषा नाईक, रंजना, मधु कांबीकरपासून ते माया जाधव पर्यंत कोणीही लीड रोलमध्ये असले तरी नाच्याचे काम गणपत पाटलांना दया असा त्या अभिनेत्रींचा आणि दिग्दर्शकाचा आग्रह असे. ते तिकडे रमत गेले अन इकडे त्यांचा संसार जगाच्या टवाळीचा विषय झाला. त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी काय काय ऐकून घेतले असेल याची कल्पना करवत नाही. इतके असूनही पाटलांनी आपल्या चेहऱ्याला रंग लावून घेणे बंद केले नाही. गणपत पाटलांनी कधी कुणापुढे हात पसरले नाहीत की कुणापुढे कशाची याचना केली नाही. सगळे दुःख, अपमान, व्यथा, तिटकारा ते सोशित गेले मात्र अंती त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.
चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आयुष्यभर फक्त सदरा- पायजमा अशा एकाच ढगळया वेशात वावरलेला हा माणूस आपल्या शापित भूमिकेचे सोने करून गेला पण त्यांच्या वेदना जगापुढे फारशा मांडल्या गेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या ‘रंग नटेश्वराचे‘ मध्ये मात्र विस्तृतपणे या सर्व घटनांचा पट उलगडला आहे. या नटरंगाची आयुष्यभर उपेक्षा झाली होती की काय म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांच्यावर निघालेल्या चित्रपटाला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला. २०१३ सालचा ‘विशेष दिनानाथ मंगेशकर पुरस्कार‘ त्याना मरणोत्तर जाहीर झाला होता. तत्पूर्वी २००५ चा ‘झी जीवनगौरव पुरस्कार‘ हाच काय तो त्यांचे कौतुक सोहळा.
२३ मार्च २००८ रोजी हा खरा प्रतिभावंत अभिनेता आपल्या अनंताच्या प्रवासाला गेला. मला कधी कधी वाटते की त्या विश्वनिहंत्याने देखील त्यांना एकदा टाळी वाजवून ‘आत्ता गं बया !’ म्हणायला लावले असेल अन तोही मनमुराद हसला असेल. पण यांच्या डोळयातले अश्रू त्यालाही कळले नसतील… आपल्या भूमिकेचे त्यांनी सोने केले पण त्या भूमिकेनेच त्यांच्या आयुष्याची माती केली.
अभिनय संपन्नतेला मिळालेली रसिकांची ही दाद त्यांचे रोजचे जिणे बेहाल करून गेली. त्यांच्या पत्नीच्या वाट्याला किती भयंकर थट्टा आली असेल कल्पना करवत नाही. पुढे जाऊन गणपत पाटील ही तृतीयपंथीयांसाठीची संज्ञा झाली. अगदी नटरंग सिनेमा येईपर्यंत ही अवस्था होती. ‘नटरंग‘ आला अन मराठी सिनेमाचे व गणपत पाटलांचे पांग फेडून गेला. पण तेंव्हा गणपत पाटील नव्हते. मार्च २००८ मध्ये ते गेले. त्यांचे पात्र अन त्यांचे नाव अजरामर झाले. पण त्यांच्या व्यक्तिगत अन कौटुंबिक जीवनाला या नाच्याच्या पात्रामुळे विषण्ण कारुण्याची झाक होती.
आपली कदाचित ही शेवटची पिढी असावी ज्यांना गणपत पाटील माहित होते. मराठी सिनेमा म्हटला की अजूनही डोळ्यासमोर पूर्वेचे रांगडे, ग्रामीण तमाशाप्रधान चित्रपट आठवतात.अरुण सरनाईक, जयश्री गडकर, सूर्यकांत, चंद्रकांत, गणपत पाटील, रविंद्र महाजनी अशीच नावे लक्षात येतात. आजचे नवे चित्रपट पाहतांना नवीन पिढीला या गुणी कलावंतांची कितपत ओळख राहील? या बद्दल शंकाच आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील गणपत पाटील ह्या उपेक्षित शिलेदाराला भावपूर्ण श्रध्दांजली!
(Not my artical. Copied)

Ranveer Singh reinvented rap in India

Ranveer brings rap revolution in India

With Ranveer delivering the huge success of Gully Boy and popularising rap/hip-hop through his breakthrough label IncInk, India is seeing this genre as the new fad in brands and films

For generations, Bollywood superstars have propelled societal fads and created huge trends. Ranveer Singh, whose stardom cuts across demographics and regions of our country, has brought niche rap/hip hop music from the streets of the country and made it massively mainstream.

First with Gully Boy, he delivered a career-best performance and made the cash counters ringing as the film became a blockbuster. He also launched his passion project, an independent record label IncInk, aimed at discovering, nurturing and promoting young artists from across the country. His first 3 talents are brilliant hip hop artists Kaam Bhari, Slow Cheeta and Spitfire. A genre that was once considered hugely small, rap/hip-hop is now majorly commercial.

From political parties, to brands to even films are now using rap/hip-hop to promote ideas and ideologies. No one can forget the BJP campaign during Lok Sabha elections which saw them campaigning against Congress with the song Azaadi from Gully Boy. It broke the internet. A slew of brands from face wash (Himalaya Men’s Face Wash), footwear (Relaxo Flite), to even an initiative like Sabka Dentist have all used rap to find their way into the millennial minds. Recent films like Article 15 and Khandaani Shafakhana have used this genre to promote. Currently, a youth TV channel (MTV) has launched a show titled Hustle that discovers rappers in India. Let’s also not forget the hundreds and thousands of content creators who have uploaded their rap/hip-hop songs on Youtube, Facebook, Tik Tok to bring attention to their music and talent.

Ranveer says, “The time of Hindustani rap/hip hop has come and this is the much-needed explosion in the music scene of India. These are exciting times for original music in India and rap/hip-hop is a huge refresher. Hindustani Rap/hip hop is no longer an underground music scene. It has become the language of the youth and it is the biggest thing happening in Indian culture today.”

He adds, “India has always produced spectacular original content and now is the time for rap/hip hop and the incredible artists whose poetry is speaking of a revolution. They are the poets of our generation and the youth is listening to what they have to say. Hindustani Rap/hip hop is here to stay and it is the voice of India that you can’t just ignore.”

Ranveer says he would love to be a thought leader of the country and for his industry. “I love films and I love our industry. I would like to be the leader of the industry, a champion of the industry. I want Hindi cinema and the Hindi movie business to keep growing and becoming bigger and bigger. So, if there is anything that I can contribute to this industry, to the Hindi cinema to become bigger and better it is a very rewarding for me,” he says.

Lakme Fashion Week

केवीआईसी, लक्मे फैशन वीक विंटर / फेस्टिव 2019 में महात्मा गांधी के 150 साल पूरे होने का जश्न मनाएगा

भारतीय वस्त्र विरासत का प्रतीक, खादी को हाथ से कते होने, हाथ से बुने तथा सही मायने में धारण करने योग्य होने की अपनी विशिष्टता के कारण खादी का वर्षों से अहम स्थान रहा है । महात्मा गांधी की 150 वीं जयंती मनाने और भारतीय स्वतंत्रता के इस वस्त्र का जश्न मनाने के लिए खादी और ग्रामोद्योग आयोग ने हाथ से कते और हाथ से बुने हुए रेशम व खादी वस्त्रों के विशेष संग्रह तथा उनके प्रदर्शन के लिए  लैक्मे फ़ैशन वीक-विंटर / फेस्टिव 2019 के दूसरे दिन 3 युवा डिजाइनरों-गौरव खानीजो, अनुज भूटानी तथा  पल्लवी भयानी के साथ सहयोग लेना सुनिश्चित किया है ।

इस सहभागी के तौर पर तीनों डिजाइनरों को खादी और ग्रामोद्योग आयोग के माध्यम से कारीगरों के साथ जुड़ने और आसानी से उपलब्ध परिधान संग्रह बनाने का अवसर मिलेगा, जो देश भर के चुनिंदा केवीआईसी के खादी इण्डिया स्टोर्स में उपलब्ध होगा।

डिजाइनर अनुज भूटानी पुरुषों और महिलाओं के लिए एक संग्रह का प्रदर्शन करेंगे जो कि कपड़े की समन्वेषण, वस्त्र तथा इसकी स्थिरता पर ध्यान देने के साथ ’आरामदायक विशिष्ट वस्त्र’ प्रदान करता है। लेबल “खानिजो” के डिजाइनर गौरव खानीजो, एक संग्रह पेश करेंगे जो हमारे भविष्य के परिधानों को ध्यान में रखकर तैयार किया गया है एवं ‘लेबल थ्री’ की डिजाइनर पल्लवी ध्यानी को सिल्हूट दिखाते हुए देखा जा सकेगा जो आधुनिक, न्यूनतम और उपयोगिता वाले हैं। यह रेंज लेबल को पहली बार मेन्सवियर संग्रह में रखा जाएगा ।

केवीआईसी के अध्यक्ष श्री विनय कुमार सक्सेना ने पहले ही कई अवसरों पर कहा है कि “खादी भविष्य का वस्त्र है । अपने अनूठे इको-फ्रेंडली स्वभाव और परिपूर्ण तथा शोख रंग युक्त वस्त्र गुणों के कारण खादी एक स्टाइलिश रिवायत बन गई है जो अब डिजाइनरों द्वारा लोकप्रिय रूप से आत्मसात की जा रही है । लंबी और कठिन लड़ाई के बाद मिली स्वतन्त्रता के लिए  खादी का उपयोग भारतीयता की पहचान के लिए एक उपकरण के रूप उपयोग में किया गया । पिछले 72 वर्षों से लेकर अब तक खादी वस्त्र सभी अंतर्राष्ट्रीय सीमाओं के पार भी रचनात्मक सोच को प्रेरित और अचंभित करता है । “फैब्रिक ऑफ़ इंडिया” के नाम से जानी जाने वाली, खादी अपने आप में एक संस्कृति साबित हुई है, जो सही मायने में हमारे देश की उपलब्धियों का गौरव बनती है।
खादी में नवाचार अब व्यापक राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर ध्यान आकर्षित कर रहे हैं । युवा और प्रसिद्ध फैशन डिजाइनर खादी में नवाचार कर रहे हैं और खादी के प्रति आकर्षण को एक नया मोड़ दे रहे हैं। वस्त्र में नए रंगों का चयन एवं विस्तार, कटिंग,  सिलाई के तरीकों में पश्चिमीकरण को शामिल करना, और अपने आप में नए रुझानों का निर्माण करना, खादी वस्त्र ने भविष्य में पहने जाने वाले परिधानों के रूप में खुद को ढाल लिया है। ”

सहभागिता पर टिप्पणी करते हुए आईएमजी रिलायंस के फैशन के प्रमुख और उपाध्यक्ष श्री  जसप्रीत चंडोक ने कहा कि महात्मा गांधी की जयंती के 150 वर्ष  पूरे होने पर जश्न मनाने के लिए खादी और ग्रामोद्योग आयोग के साथ एक बार फिर से साथ आना हमारे लिए गौरव की बात है । खादी और ग्रामोद्योग आयोग द्वारा डिजाइनर खनीजो, अनुज भूटानी और पल्लवी ध्यानी के साथ मिलकर अपना अनूठा संग्रह प्रदर्शित करने पर हमें गौरव की अनुभूति हो रही है जो बड़े पैमाने पर उपभोक्ताओं द्वारा उनकी जीवन शैली मे शामिल होने के लिए तैयार है।

खादी और ग्रामोद्योग आयोग, खादी, ग्रामोद्योग तथा हस्तनिर्मित उत्पादों के लिए भारत का सबसे बड़ा मंच है जिसे अप्रैल 1957 में भारत सरकार के अधीन गठित किया गया था। यह सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय के अंतर्गत ग्रामीण विकास के लिए जहाँ भी आवश्यक हो ग्रामीण विकास में लगी अन्य एजेंसियों के साथ समन्वय कर खादी और ग्रामोद्योग की स्थापना, विकास योजना, प्रचार, सुविधा, प्रायोजन तथा अन्य सहायता के लिए स्थापित एक सांविधिक निकाय व सर्वोच्च संगठन है ।

लक्मे फैशन वीक-विंटर / फेस्टिवल 2019, का आयोजन 21 से 25 अगस्त 2019 तक होगा।

Jewelery exhibition opens in Mumbai



13th Edition of IIFJAS inaugurated in Mumbai by Ms. Amruta Fadnavis

The India International Fashion Jewellery & Accessories Show {IIFJAS} is oldest, largest and official platform in India for the Fashion & Imitation Jewelry. Fondly known as the Face of Indian fashion Jewelry Industry, IIFJAS is all set to welcome everyone to witness a larger and enhanced show at the 13th edition in Mumbai from 20th to 23rd August, 2019 at Bombay Exhibition Centre(NESCO) Goregaon from 10:30 am onwards to 6:00 pm. The exhibition was inaugurated by Ms. Amruta Fadnavis (banker, singer and social activist) she not only graced the show rather personally visited various stalls to check out new trend and options available.

IIFJAS is a platform which gives chance to all the upcoming jewelry designers and manufacturers of India, fashion stylists, renowned buying houses and buying agents, Television production houses and many top-notch merchandising outlets, aside from wholesalers, retailers, traders, importers and exporters to showcase the unique portion of their work.

Ms. Amruta Fadnavis who is a versatile personality and wears many feathers in her cap like that of a social activist, banker and singer, is also known for her fashion and style statement, when asked about her experience she said ""It was an exhilarating experience to see these many latest trends and designs from different parts of India as well as the world under one roof in IIFJAS 2019. I am glad that I visited here”.”

“We're thrilled to start next edition of IIFJAS which has developed into the premiere destination for individuals and brands from fashion jewelry industry to showcase their strengths and talents," said  Devraj Semlani, Chairman, Radiaant Expositions Ltd.

“With changing trends people’s preference for jewelry has also changed which led to a rise in growth of fashion jewelry Industry. Through IIFJAS we strive to provide a platform to the industry and give them their due share in the market” said Abhishek Jaiin- Director- Radiaant Expositions Ltd.

It is the only show that boasts of being the individual destination in India to see the modern trends and inventions of leading brands & manufacturers in costume jewellery, CZ Jewellery, fashion jewellery, silver jewellery, raw materials, pieces of machinery, packaging & accessories products from Gems & Jewellery industry.

The Thirteenth Edition is expected to be more magnificent than ever and facilitate grander business opportunities to about 250+ suppliers spread across 350+ stalls and 10,000+ quality trade buyers from all across the globe. The buyer-turnout is expected to be a record breaking one, with buyers joining-in from 250+ Indian cities from over 20 Indian states, and internationally from all 7 continents of the world, specifically from countries and regions like USA, UK, Australia, Spain, Brazil, Nigeria, S. Africa, Turkey, Tunisia, Singapore, Nepal, Canada, Mexico, Cyprus, Myanmar, China, Bahrain, Dubai, Jeddah, Japan, Afghanistan, Bangkok, Sri Lanka, Bangladesh, UAE, Nigeria and Hong Kong, showing great appreciation for the trend-setting designs and quality products to be displayed at the IIFJAS.

IIFJAS attracts fashion and style connoisseurs from different parts of world. Footfall includes people like  Jewelry designers, fashion designers, fashion stylists, renowned buying houses and buying agents, Television production houses and many top-notch retail outlets, apart from wholesalers, retailers, traders, importers and exporters.

IIFJAS affirms its crystal clear vision to benefit the entire industry and motivate other related sections to join the business league in the coming years, by acting as the perfect platform for sourcing costume & fashion jewelry and accessories.

Sye Raa Narasimha Reddy 's teaser released


Chiranjeevi is upbeat about his upcoming flick, Sye Raa Narasimha Reddy, a period flick, based on Telugu freedom fighter Uyyalawada Narasimha Reddy. Directed by Surender Reddy, the big-budget flick stars an ensemble cast including Chiranjeevi, Nayanthara, Tamannaah, Amitabh Bachchan, Vijay Sethupathi, Kichcha Sudeep and Vijay Sethupathi in pivotal roles.

The teaser launch of Sye Raa Narasimha Reddy took place in a grand manner in Mumbai today (August 20). At the event, Chiranjeevi was asked to speak about Amitabh Bachchan, who plays a brief yet important role in Sye Raa Narasimha Reddy. Produced by Ram Charan, the film will be jointly distributed in Hindi by Farhan Akhtar and Ritesh Sidhwani. Sye Raa Narasimha Reddy will release on October 2.

Vidya Balan - Knotty at forty


विदया बालन नॉटी ऍट फॉर्टी

-हर्षदा वेदपाठक

बेगम जान या चित्रपटानंतर विदया बालन, मिशन मंगल या चित्रपटामध्ये अनेक अभिनेत्रींबरोबर काम करतेय. सहअभिनेत्री या सगळ्या महिला असल्या की. सेटवर कपडे, साड्या, फॅशन, जेवण याविषयीच भरपुर चर्चा व्हायची. हे सांगताना, विदया स्पेस या  वेगळ्या विषयावर काम करायला मिळाले यावर समाधान व्यक्त करते. यासह तिच्याबरोबर केलेली बातचित.

मिशन मंगलच्या निमीत्ताने बोलायचे तर तु बारा वर्षानंतर अक्षय कुमार बरोबर काम करत आहेस ?

हे बेबी आणि भुल भुलैय्या हे दोन चित्रपट आम्ही लागोलाग केले होतेत. बारा वर्षाचा कालावधी कधी लोटला तेच समजले नाही. सेटवर सुरवातीला तो ज्या प्रकारे मस्ती करायचा, त्याच प्रकारे अजून देखिल वावरताना दिसला.

आयुष्याची सुरवात वयाच्या चाळीशीमध्ये होते असं म्हणतात. त्या प्रचलीत वाक्य प्रचाराबरोबर तु कश्या प्रकारे जुळवुन घेतेस ?

ओह याह, टेल मी अबाउट इट...मी, माझ्याबरोबर कधी नव्हे, इतकी खुश आहे. मला वाटतं, स्वताबरोबर समाधानी असणे, हेच मुळी वाढत्या वयाबरोबर किंबहुदा आयुष्यात आलेल्या अऩुभवामुळे येणारया मॅच्युरीटीमुळे शक्य होते. आहे त्या परिस्थीतीमध्ये तुम्ही स्वताचा स्विकार करता. आणि स्वताला समजण्याचा जो प्रयत्न करता, तो याच वयात सुरु होतो. अगदी लहानसहान गोष्टी मधुन तुम्ही समाधान मिळवत राहता. 

चाळीशीमध्ये भेडसावणारया मिडलाईफ क्रायसेसचे काय करायचे ?

मिडलाईफ क्रायसेसचा प्रश्न बायकांना काहीच भेडसावत नाही. तर तो पुरुषांना  त्रासदायक ठरतो. बायकांचे प्रॉब्लेम हे मेनोपॉजमुळे होतात. त्या खेरीज स्रीयांना दर महिन्याला मासिक पाळी दरम्यान जो त्रास होतो, तेवढाच ऐक प्रश्न असतो. मला वाटतं स्रीयां मेनोपॉझमध्ये आहेत, या विषयाला त्या सहन करु शकत नाही. कारण त्यामागे आपण एक स्त्री आहोत आणि ते स्रीत्व आता उरलेलं नाही, हा विचार त्यांना विखारी वाटत असावा. बरं मेनोपॉझ बरोबर येणारं चिडचिडेपण, भय, मनात राहुन जाणारी चिंता या गोष्टींचा महिलांना फार त्रास होतो. आणि हे सगळ्या महिलांबरोबर घडते.
आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे, माझी मावशी जेव्हा मेनोपॉझच्या संक्रमणातुन जात होती. तेव्हा ते आम्हाला काय किंवा घरात कोणालात कसे ते काय कऴले नाही. आता मात्र अनेक स्रीया त्यावर व्यक्त होताना दिसत आहेत. आणि ते बदललेल्या काळाचे प्रतिकच मानले पाहिजे.

पुरुष चाळीशीचा झाला की, नॉटी होतो असे म्हणतात मग बायकांबरोबर तसे का नाही घडत ?

माझा एक मित्र आहे ज्याने  लग्न केलेले नाही. आणि त्याला जिवनामध्ये ऐका स्रीबरोबर रहायचे नाही, यावर तो ठाम आहे. तर त्याच्या जिवनात अऩेक स्रीया आहेत. तो कमीटमेन्ट फोबीक असुन, त्याला लॉग टर्म रिलेशनशिपमध्ये राहायचेच नाही. असे त्याचे म्हणणे आहे. तो मला सांगत होता, पस्तीशीच्या पुढील स्रीया या खुप (हसुन) तेज तर्रार असतात.  मला वाटतं तो पर्यत स्रीयांना, अन्डर द शिट चा बरयापैकी अनुभव असतो. त्यामुळे पुरुषांना त्या हुक करु शकतात, यात वाईल्डपणा आणि नॉटीनेस आहेच की.

तु काय नॉटी केलं आहेस ?

(खळखळुन हसून) ते सांगण्यासारखे असते तर नक्कीच तुम्हा सगळ्यांना सांगीतले असते.

फक्त तुझ्याबद्दल तु गर्भवती असल्याच्या अनेक चर्चा बरयाचदा ऐैकाला येतात काय सांगशिल त्याबद्दल ?

सब उल्लु के पठ्ठे रहे है....मी कधीच बारीक, शिडशिडीत अशी नव्हती. आणि तुम्हाला माझे पोट दिसुन आले तर समजा मी आयुष्यभर मग (हसून) गर्भवती आहे.

एक काळ असा होती की, कलाकार अभिनयावर लक्ष देत होतेत. आता मात्र चर्चा होते ती, झीरो फिगरची ?

मुलींनी नेहमी तरुणच राहीले पाहिजे असा, समाजामध्ये एक प्रघात आहे. आणि त्यामुळेच ते चित्रपटाबरोबर जोडलं गलं आहे. ज्यामुळे तुम्ही पुरुषांच्या नजरेत आकृष्ट राहु शकता. स्री तरुण नसली तर पुरुष आपोआपच, तिच्यापासून दुर जाऊ लागतात आणि ते वास्तव आहे .याच कारणामुळे प्राचीन काळी राजा अनेक राण्या करत, आणि नविन राणी हि आधिच्या राणीपेक्षा नक्कीच तरुण असायची. त्याकाळी बायकींची लग्ने लवकर होत असत. मग मुले, यात स्री पार दमुन जात असे.  आता मात्र बदलेल्या काळानुरुप, स्रीयांचे शिक्षण, मग नोकरी आणि लग्न या यात उशीर होत आहे. त्यामुळे स्रीयांच्या आयुष्याची खरी  सुरवात हि  पस्तीशीमध्ये होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. इतकच नाही तर मुलांना कधी जन्माला घालायचे हे पण ती आता ठरवु लागली आहे. माझ्याबद्दल बोलायचे तर मी झीरो फिगर या श्रेणीत कधीच बसली नाही कारण मी कधीच शिडशीडीत नव्हते.  माझ्या शरीराबद्दल लोकं काय बोलतात, त्याची पर्वा करणे मी सोडले आहे. पण माझा लुक आणि शरीर याने मी किती खूश आहे ते तु्म्हाला सांगू शकत नाही.  आय फिल सॅक्सी ऑल द टाईम...

तुझ्या लेखी सुंदरतेची व्याख्या काय ?

मला वाटंत तुम्हाला घरात ज्या प्रकारे वाढवलं जातं त्यावरुन तुमची सुंदरतेची व्याख्या ठरते. आमच्या घरात मला सुंदर मुलगी म्हणुनच वागवले गेले. तुम्ही शाळेत जाता, तेथे किंवा तुमचे मित्र मैत्रीणी तुम्हाला तुमचे नाक, दात. केसं, जाडेपणा या वरुन चिडवू लागतात. आणि तेथे सुंदरता म्हणजे काय याची तोंडओळख होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुमचे आईवडील तुम्हाला ज्याप्रकारे पाहतात. त्यांच्या नजरेतुन तुम्ही, स्वताला पाहत असता. तेथे तुमच्या सुंदरता या व्याख्येचे पहिल्यांदा विशेषण झालेलं तुम्हाला पहायला मिळते. अमेरिकन ब्युटी नावचा मी एक चित्रपट पाहिला होता, त्यात ऐक संवाद होता – सुंदरता चेहरयाने येत नाही तरी तुम्ही आयुष्यात काय काम करता त्याने ठरवली जाते. आणि माझे विचार त्या वाक्याबरोबर जुळतात. महत्वाची गोष्ट म्हणजे, विदयाला तुम्ही जे पडदयावर पाहता, ते एक पात्र म्हणून ,तेथे ती ऐक अभिनेत्री असते. भुमिका आणि विदया या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 

चित्रपटसृष्टीमध्ये आता अभिनेत्रींना वेगवेगळ्या भुमिका मिळू लागल्या आहेत. मग तिचे वय, तिचे झालेले लग्न यावर पूर्वी ऐवढी चर्चा  आता होताना दिसत नाही?

अश्याप्रकारचा बदल नक्कीच स्वागतार्त आहे. आणि त्यांनी तसा बदल नाही केला, तर मी त्यांना तो बदल करायला भाग पाडेन. दहा वर्षापासुन मी स्त्री सत्ताक भुमिका करत आहे. तेव्हा मला  वाटायचे की अश्याप्रकारचे चित्रपट चालणार नाहीत. मी केलेल्या चित्रपटांपैकी, काही चित्रपट खुप चाललेत, काही कमी चाललेत तर काही अजीबात चालले नाहीत. मी मात्र चित्रपट स्विकारताना कसलाच विचार करत नाही. माझा चित्रपटसृष्ट्तील प्रवेशच मुळी वयाच्या पंचवीशी नंतर झाला. जेव्हा अनेक अभिनेत्री रीटायर्ड होतात,काहींची लग्न होतात. आपण आपल्या आसपास पाहिले तर दिसुन येईल की, लग्न झालेल्या कोणाचेही जिवन थांबले नाही. आता तसच काहीसं चित्रपटसृष्ट्रीबद्दल घडू लागले आहे. मला वाटतं, जो पर्यत तुम्हाला, एक व्यक्ती, एक स्त्री म्हणून तुमच्यामध्ये रस असेल, आत्मविश्वास असेल तरच तुम्ही समोरच्या माणसाला तुमच्या कलाकृतीने बांधून ठेवू शकता असे मला वाटते.  मला आयुष्यभर अभिनय करायचा आहे, त्यामुळे जी भुमिका माझ्या  हदयायाल भिडेल तिच मी स्विकारेन. आणि मला खात्री आहे, त्या भुमिका प्रेक्षकांना खिऴवुन ठेवण्यात पण यशस्वी ठरतील. 
मला लोकं सांगत होतीत की, माझे अनेक चित्रपट चालले आहेत. आणि ते माझ्या एकटिच्या जोरावर चालले आहेत, हे हि ते सांगतात. मग मला ही माझ्या हातामध्ये अंबुजा सिमेन्टीची पॉवर आली आहे असे वाटु लागले. आणि त्यानंतर मात्र माझे काही चित्रपट लागोलाग आदळलेत असे देखिल होऊ शकते. 

अनेक अभिनेत्रीबद्दल अऩेकदा मोठमोठी गॉसीप आणि कॉन्ट्रोव्हसी  ऐैकू येतात. पण तुझ्याबद्दल तसं कधी ऐैकू नाही आलं. या सगळ्यापासुन तु कशी काय लांब राहीलीस ?

लग्नापुर्वी काही लगानसहान गोष्टी माझ्याबद्दलही चर्चेत येत होत्यात. मात्र लग्न झाल्यावर सगळच थांबलं. सेटवर मी पुर्वीपण मजा करायची, आणि आता देखिल मजा करते. अक्षय मला नेहमी सांगतो, तु मुलासारखी वागतेस . मी पण स्वताला काही छुईमुई समजत नाही. म्हणून कादाचित गॉसिप माझ्यापसून लांब राहीले असावे .

वेब फिल्म या नविन प्लॅटफॉर्मवर तुला काम करताना पाहता येणार काय ?

दोन वर्षापुर्वी मी ऐका पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत ते वेब सिरीजसाठीच. अजुनही त्यावर काम सुरु आहे. पुढचे अजुन ठरायचे आहे.


-हर्षदा वेदपाठक



John Abraham on Batla House


जॉन आब्राहम - वास्तवदर्शी विषयाचे दास्ताऐवजीकरण व्हायला पाहिजे
- हर्षदा वेदपाठक

विकी डोनर, परमाणु, मद्रास कॅफे या चित्रपटांनतर जॉन अब्राहम निर्माता म्हणून  बाटला हाऊस या चित्रपटासह तयार आहे. दिल्ली हायकोतर्टाने बंदी उठवल्यानंतर, उदया तो चित्रपट भारतभर प्रदर्शित होत आहे. यासह जॉन बरोबर केलेली बातचित,

दिल्ली हायकोर्टाने बाटला हाऊस वरील बंदी उठवली आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाला काय सांगशिल त्याबद्दल?

बाटला हाऊसमध्ये आरोपी असलेल्या दोन गुन्हेगारांनी, या चित्रपटावर बंदी आणावी यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु, आम्ही या चित्रपटाची कथा हि सार्वजनिक असलेल्या माहितीवर आधारीत असल्याचे पुरावे दिले. त्यात कोणत्याही घटनेला खोटे दाखवले गेले नाही, किंवा कोणत्याही घटनेचे उदात्तीकरण केलेले ऩसल्याचे आम्ही सिध्द केले. त्याखेरीज लहान मुले बॉम्ब तयार करत आहेत, तिच मुले कुराणचा वास्ता देत चर्चा करत राहतात या दोन दृष्यांना आम्ही टोन डाऊन केलं आहे. कोर्टाने, सोमवारी चित्रपट पाहिला आणि मंगळवारी त्यावर दिवसभर चर्चा करुन काल प्रदर्शित करायची ऑर्डर काढली. आता बाटला हाऊस, ठरवलेल्या तारखेनुसार प्रदर्शित होत आहे. 

बाटला हाऊस सारख्या वास्तववादी भुमिकांसाठी जेंव्हा दिग्दर्शकांकडून विचारणा होते, तेंव्हा नेमकं कसं वाटतं?

नक्कीच चांगलं वाटतं. काही असे विशिष्ट कलाकार आहेत, ज्यांचं त्यांच्या देशावर प्रेम आहे आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरुन आणि देहबोलीतूनही दिसून येतं. माझं माझ्या देशावर असलेलं प्रेम अगदी स्पष्ट आहे आणि मुख्य म्हणजे संजीव कुमार यादव या व्यक्तिरेखेसाठी माझी शरिरयष्टी अगदी चपखल आहे. निखिलने मला ही पटकथा एकदा तरी वाचून पहाच, असा आग्रह केला आणि जेंव्हा मी ती वाचली तेंव्हा मी थक्क झालो. सत्य हे कल्पनेपेक्षाही चमत्कारीत असते. मला सुरुवातीला वाटलं की हे काल्पनिक आहे, पण त्यातील प्रत्येक गोष्ट खरी आहे. आणि त्या चित्रपटाची निर्मीती देखिल केली.

घटना आणि भुमिका दोन्ही वास्तवदर्शी आहेत. कश्याप्रकारे भुमिकेची तयारी केली?

तुम्ही जेव्हा वास्तविक पात्र साकारत असता, तेंव्हा तुम्ही सर्जनशील स्वातंत्र्य घेऊ शकता, पण त्यासाठी  मर्यादा निश्चित करणे आवश्यक असते. आणि मी संजीव कुमार यादव यांच्याबरोबर ऐक दिवस घालवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी मी त्यांच्याबरोबर सहा तास होतो आणि त्या दरम्यान त्यांच्या मनात काय सुरु आहे याची अंतर्गत प्रक्रिया समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. बंदूक वापरायला शिकलो. बाबरी मशीद प्रकरणानंतरचे हे वादग्रस्त प्रकरण होते आणि हा विषय आम्ही कसा हातळणार आहोत, हे खूपच महत्वाचे होते. त्यांना पीपीएसटी पोस्ट ट्रॉमॅटीक समस्या होती. त्यांची पत्नी त्यांना सोडून जाऊ इच्छित होती आणि त्याचबरोबर काही कौटुंबिक समस्याही होत्या. त्यांना आत्महत्या करावीशी वाटत होती आणि भारत सरकारकडून त्यांची चौकशी सुरु होती. (आतापर्यंत)त्यांनी नऊ शौर्य पुरस्कार मिळवले आहेत. घटनेपुर्व त्यांना(यापैकी) सहा शौर्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. या सगळ्या गोष्टींचे संतुलन राखणे आवश्यक होते आणि आम्ही बरयापैकी तसा प्रयत्न केला आहे.


निखिलला आणि तुला बाटला हाऊस हा विषय का आकर्षक वाटला?

निखील अडवाणी दिग्दर्शित डी-डे हा चित्रपट मला खुप आवडला होता. मात्र बाटला हाऊस हा चित्रपट त्याच  दृष्टीकोणातून बनवता येणार नाही, यावर आमचं दोघांचं एकमत होतं. पिडीतांचा दृष्टीकोन, दहशतवाद्यांचा दृष्टीकोन आणि आम्ही त्यांची कशी व्याख्या करतो ते, दिल्ली पोलिस, साक्षीदारांचा दृष्टीकोन आणि चौथा न्यायालयाचा दृष्टीकोन... हे सगळे ऍंगल आणि चर्चा महत्वाची होती. आहे. आणि मला वाटतं प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल.   

अरिझ खानचे काय?

या प्रकरणावर सध्या न्यायालयीन सुनावणी सुरु आहे. त्यामुळे मला त्यावर भाष्य करण्याची परवानगी नाही. बाटला हाऊस ही एका वास्तव घटनेपासून प्रेरीत अशी काल्पनिक कथा आहे. तसा आम्ही डिस्क्लेमरही दिला आहे. आमच्याकडे सीबीएफसीचे यु/ए प्रमाणपत्र आहे, त्यामुळे या विषयावरील मत मी राखून ठेवले आहे.

बाटला हाऊस हा विषय वादातीत आहे. त्यावर चित्रपट तयार करताना भिती नाही वाटली तुला ?

चित्रपटात सगळ्या दृष्टीकोनांतून भाष्य करण्यात आले आहे आणि आम्ही ते प्रेक्षकांवर सोपवले आहे. कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून तुम्हाला तुमचे राजकीय पक्षपात बाजूला ठेवावे लागतात आणि प्रेक्षकांसमोर निःपक्षपाती दृष्टीकोन मांडावा लागतो. आणि आम्ही ते काम केलं आहे.

सत्यघटनांचे दस्तऐवजीकरण आपल्याकडे फारसे होत नाही. त्यामुळे की काय वास्तवदर्शी चित्रपट ही आपल्याकडे फारसे होत नाहीत?

कोणालातरी ते काम करावे लागणारच. आणि ते मी परमाणुच्या वेळी केले. मद्रास कॅफे या चित्रपटाच्या शेवटी पण तसेच झाले. चित्रपट पाहून लोकं म्हणाले की तो ऑफीसर शेवटी मारला गेला आणि जॉन अब्राहमने त्याला वाचवले नाही. देशाच्या तरुणाईला राजीव गांधींच्या हत्येविषयी माहिती नाही. पन्नास तरुणांपैकी एक जण फक्त म्हणाला की तो चित्रपट राजीव गांधींशी संबंधित आहे. ही देशाची आजची परिस्थिती आहे. जेएफकेकडे पाहिलं तर समजतं की विदेशी लोकांनी  कशाप्रकारे सत्यघटनांचे दस्तऐवजीकरण केले आहे. पण त्याचबरोबर ते अतिशय रंजकही बनवलं आहे. कोणीतरी अशा गोष्टी सांगितल्याच पाहिजेत आणि मी ते करत असल्याचा मला आनंद आहे.

निर्मात्याच्या भूमिकेत शिरावं असं का वाटलं ?

मी निर्माता झालो कारण एक अभिनेता म्हणून मला माझ्या आवडीचे चित्रपट करायला मिळत नव्हते. निर्माता झाल्यावर एक अभिनेता म्हणूनही माझ्यात सुधारणा झाली. कोणीतरी आजचा, वेगळा विषय असलेला सिनेमा करायला हवा. विक्की डोनरने बधाई हो बधाई, शुभमंगल सावधान, उरी, आर्टीकल 15, खानदानी शफाखाना या सारख्या चित्रपटांना जन्म दिला. तुम्ही ट्रेंड सेटर असायला हवं असं मला वाटते आणि मला काही तरी वेगळं करायचं होतं.

व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट तयार करताना तुम्हाला तडजोड करणं भाग असतं का?

मला तरी तडजोड करावी लागते, कारण मी छोट्या बजेटचे चित्रपट करत असतो. माझ्याकडे मोठ्या आणि आलिशान सेटस् ची चैन नाही. बाटला हाऊस करत असताना सेटलाईट हक्क, संगीत, डीजीटल यासह चित्रपटाचा बाकी खर्च वगळून आम्ही चित्रपट भारतभर प्रदर्शित करु शकलो. शंभरापैकी, पन्नास रुपये वितरकाकडे जातात. वितरण साखळीत प्रत्येक जण सुरक्षित आहे. मुख्य म्हणजे, एक चांगले कथानक तुम्हाला सर्वोत्तम प्रकारे सांगण्यासाठी मी माझ्या डोक्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो.

तुझ्या चित्रपटातील नायिकांच्या निवडीबाबत काय सांगशील?

तेमी दिग्दर्शकांवर सोपवतो. परमाणुमध्ये माझ्याबरोबर अनुजा साठे आणि मृणाल पांडे होत्या. दोघीही अतिशय उत्कृष्ठ आणि शिस्तशीर अभिनेत्री होत्या. मी त्याबाबत कुठलाही निर्णय घेत नाही. अगदी नोहा फतेहीला एका गाण्यासाठी घेण्यात आल्याचंही मला माहित नव्हतं. अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यामधिल केमस्ट्री चांगली असली पाहीजे, पण याबाबतचा निर्णय माझा नसतो. तो दिग्दर्शकाचा निर्णय असतो.

तुझी अक्षयबरोबर तुलना केली जाते, त्यावर काय सांगशील?

आमची मानसिकता मिळतीजुळती आहे आणि आम्हाला देशभक्तीपर चित्रपट करायला आवडतं. मला वाटतं, जर पटकथा चांगली असेल, तर तुम्ही असे चित्रपट करावेत. अक्षय चांगले चित्रपट करत आहे आणि मी मला करावेसे वाटतात ते चित्रपट करतोय, जे खूपच छान आहे. ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही असे चित्रपट करु शकत नाही जे देशभक्तीपर आहेत पण आशयघन नाहीत, असे चित्रपट चालणार देखिल नाहीत. तुम्ही बघाल की काही मोठ्या बजेटचे चित्रपटही साफ आपटले आहेत. त्यामुळे आशय महत्वाचा आहे. मला देशभक्त व्हायला आवडेल पण मला राष्ट्रवादी बनायचे नाही. देशाच्या सद्गुणांमुळे देशभक्त देशावर प्रेम करेल. राष्ट्रवादी देशातील सगळ्यासाठीच देशावर प्रेम करेल. मला देशाबाबत चिकित्सक व्हायचं आहे, तरीही देशावर माझे प्रेम आहेच.

स्वातंत्र्यदिनाच्या काही आठवणी आहेत का?

लहान असताना मला ध्वज धरायची खूप इच्छा होती, पण त्यावेळी त्याची परवानगी नव्हती. पण मला आठवतं, त्यावेळी लवकर उठून झेंडावंदनाला मी जात असे. पण माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा भाग म्हणजे फुटबॉल खेळायला जाणे, कारण तो सुट्टीचा दिवस असायचा.

बाटला हाऊस या चित्रपटासाठी केलेल्या संशोधनाबद्दल काय सांगशील?

आमच्या लेखकाने यावर चार वर्षे संशोधन केलं आणि त्यानंतर मी निखिलला यामध्ये समतोल आणण्यास सांगितले. आम्ही ५१ दिवसांत या चित्रपटाचे चित्रिकरण पुर्ण केलं. मी ते पोलिस अधिकारी, त्यांची बायको आणि कुटुंबियांना भेटलो आहे. त्यांच्या पत्नीने मला सांगितले की, ते पाच मिनिटांपेक्षा जास्त बोलत नाहीत. आम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं त्यांच्या पत्नीवर प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या आयुष्याचं द्विभाजन झालं आहे. ते अतिशय गौरवशाली अधिकारी होतेत त्यादरम्यान त्यांच्यावर आरोप झाले, त्यामुळे या प्रकरणात आपला काय दोष, असं ते विचारयचे. सध्या ते दिल्ली पोलीस सेलचे डीसीपी आहेत. त्यांच्या जीवाला सतत धोका असून, त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांना अलीकडेच दुखापत झाली होती आणि ते घरी सुखरुप येतील का, याची आपल्याला खात्री वाटत नसल्याचं त्यांच्या पत्नी सांगतात. कोणीतरी या गोष्टीचं कौतुक केलं पाहीजे. त्यांची पत्नी एबीपी न्यूज चॅनेलसाठी काम करतात आणि त्यांच्या मुलांना या सगळ्यापासून दूर ठेवण्यात आलं असल्याची माहिती त्यांच्या पत्नीनं दिली.   

तुझ्या फीटनेसचे रहस्य काय आहे?

मी सिगरेट ओढत नाही, दारु पित नाही. तळलेल्या आणि गोड पदार्थांपासून दूर राहतो. लोक म्हणतात की, माझे टेस्ट बडस् मरुन जात आहेत. मला वाटतं जर तुम्हाला या आरोग्याला अपाय करणारया गोष्टी खाण्याची इच्छा होत असेल, तर तुमचे मन कमकुवत आहे. यापैकी मला कोणी काही देऊ केलं तर मी त्यांना माझा शत्रू म्हणतो. त्यांना माझं चांगलं झालेलं नको आहे. जेंव्हा तुम्ही आजारी असता, तेंव्हा फक्त कुटुंबच तुमच्याजवळ येतं. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि तुम्ही स्वतःचे रक्षण करायला पाहीजे

आगामी चित्रपट कोणते आहेत?

मी मुंबई सागा सुरु करत आहे आणि नंतर मी ऍटॅक विथ लक्षची निर्मीती करतोय, जो ऍक्शन चित्रपट आहे आणि सत्यमेव जयते २ हा आणखी एक चित्रपट रांगेत आहे. मी सध्या माझ्या कामाचा पूर्वी कधीही घेतला नसेल एवढा आनंद घेत आहे, आणि मला त्याचा अभिमान आहे. मी पुन्हा एकदा बॉबी ग्रेवाल आणि निखिल अडवाणीबरोबर काम करत आहे. आम्ही एकत्र सहा चित्रपट करत आहोत. माझ्या मते जेए एंटरटेंनमेंटमध्ये आम्ही असे चित्रपट करत आहोत जे करायला आम्हाला खरोखरच खूप आवडेल. मी पार्ट्यांना जात नाही आणि मी कुठल्याही कॅंपमध्येही नसतो आणि मला मित्रही नाहीत. मी माझे स्वतःचे काम करतो आणि मी बजेटशी तडजोड करत असलो, तरी मी ज्या कथा घेऊन येत आहे, त्याचा मला आनंद आहे. आमच्याबरोबर आता स्टुडीयो देखिल सहनिर्माता म्हणून काम करण्यास तयार आहेत.

पागलपंती हा चित्रपट सुध्द तु करत आहेस?

मला अनीस बज्मी हे दिग्दर्शक म्हणून खूप आवडतात आणि त्यांचे विनोदी चित्रपटही, हसवणे हि सगळ्यात अवघड शैली आहे. लोकांना हसवणं खूपच कठीण असतं. आम्ही नुकतंच त्याचं चित्रिकरण पूर्ण केलं आणि मला ते करताना खूप मजा आली.

उपराष्ट्रपतींनी बाटला हाऊस पाहिला तेव्हा त्यांची प्रतिक्रीया काय होती?

ते खूपच प्रभावित झाले आणि ते म्हणाले की मी तुमच्या दृष्टीकोनाचा आदर करतो.

- हर्षदा वेदपाठक

Monday 19 August 2019

Khaiyamsab is no more

Mohammed Zahur Khayyam Hashmi was a noted music composer of the Hindi film industry and was best known for his compositions in films like Umrao Jaan and Kabhi Kabhi.

He was honoured with the National Film Award for his work in Umrao Jaan. He also won a Filmfare Award for Umrao Jaan and Kabhi Kabhi. He was bestowed with the Sangeet Natak Akademi Award in 2007.

The Government of India honoured him with Padma Bhushan in 2011.

The composer had been hospitalised due to lung infection on July 28 after he collapsed in his house. The 92-year-old artiste was admitted to Sujoy Hospital in Juhu.


संगीतकार खय्याम यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

संगीतकार खय्याम यांच्या निधनाने अतिशय तरल आणि संगीत देणारा महान कलावंत आपण गमावला आहे , अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, खय्याम यांच्या अभिजात रचनांनी रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. अनेक चिरंतन अजरामर  ठरणाऱ्या रचनांमुळे खय्याम रसिकांच्या सदैव स्मरणात  राहतील. उमरावजान,  कभी कभी, आखरी खत, रझिया सुलतान, नुरी अशा चित्रपटातील त्यांची काही गीते कालातीत आहेत. मिर्झा गालिब, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, निदा फाजली अशा श्रेष्ठ प्रतिभावंतांच्या  महान रचनांना खय्याम यांनी पुरेपूर न्याय दिला. एक कलावंत म्हणून खय्याम जेवढे महान होते तितकेच ते एक माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते. पद्मभूषण, फिल्मफेअर अनेक पुरस्कारांनी त्यांचा सार्थ गौरव झाला होता. अलिकडेच हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती.  त्यावेळी प्रशंसापर आशीर्वाद लाभले होते. ही भेट अखेरची ठरल्याचे मला मनस्वी दुःख आहे.


Monday 5 August 2019

Article 370 आर्टिकल ३७०

जम्मू काश्मिर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा, केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय?

केंद्र शासनाच्या थेट नियंत्रणाखाली असलेला भूप्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश. भारत देशामध्ये 29 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश (Union Territory) आहेत. हे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून त्यांचे प्रशासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जाते. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रचालकाची नेमणूक करतात.

मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक मारत जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) मधील कलम 370 (Article 370) हटवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याची शिफारस राज्यसभेत केली. इतकंच नाही तर राज्याच्या पुनर्रचनेचाही प्रस्ताव अमित शाह यांनी मांडला. यानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आलेला आहे.

भारतात आतापर्यंत सात केद्रशासित प्रदेश होते. कलम 370 हटवून जम्मू काश्मिर आणि लडाखची भर या यादीत पडणार आहे.

केंद्रशासित प्रदेश कोणकोणते?

अंदमान आणि निकोबार

चंदीगड

दमण आणि दीव

दादरा आणि नगर हवेली

दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश

पुदुच्चेरी

लक्षद्वीप

जम्मू काश्मीर

लडाख

स्वातंत्र्य काळात काही भूभाग भारताचा भाग नव्हते, किंवा राज्यामध्ये रुपांतरित करण्याइतपत मोठे नव्हते. आर्थिकदृष्टया कमकुवत आणि राजनैतिकदृष्ट्या अस्थिर असलेले हे भूप्रदेश केंद्र सरकारच्या सहकार्याविना प्रशासन चालवू शकणार नाहीत, असं निदर्शनास आलं.
1956 साली सातवी घटनादुरुस्ती आणि राज्य पुनर्रचना अधिनियम याद्वारे केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात
आली.

पोर्तुगीजांकडून गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली; तसेच फ्रेंचांकडून मिळालेला पुदुच्चेरी हा भूप्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणून नियुक्त करण्यात आला.

केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती कधी?

अंदमान आणि निकोबार (1956)
दिल्ली (1956)
लक्षद्वीप (1956)
दादरा आणि नगर हवेली (1961)
दमण आणि दीव (1962)
पुदुच्चेरी (1962)
चंदीगड (1966)

केंद्रशासित प्रदेश निर्मितीची कारणं काय?

राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीकोन – दिल्ली, चंदीगड
सांस्कृतिक वेगळेपण – पुदुच्चेरी, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली
व्यूहनीतीचा दृष्टीकोन – अंदमान आणि निकोबार, लक्ष्यद्वीप

कलम 370 काय आहे?

भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 नुसार जम्मू काश्मीरला सार्वभौम राज्य म्हणून विशेष दर्जा देण्यात आला आहे. भारतीय संविधाना अंतर्गत जम्मू काश्मीरचं स्वतंत्र संविधान आहे. या कलमानुसार भारताचा नागरिक काश्मीरमध्ये स्थायिक होऊ शकत नाही. तसंच दुसऱ्या राज्यातील नागरिक इथे संपत्ती खरेदी करु शकत नाहीत. एवढंच नाही तर जम्मू-काश्मीरमधील महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केलं असेल, तर त्यालाही इथे जमीन खरेदी करता येणार नाही.

कलम 370 हटवल्याने काय होईल?

जम्मू काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा राहणार नाही.
एखादा नवा कायदा लागू करायला राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसेल.
त्यामुळे राज्याच्या कायद्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करु शकेल.
370 कलम हटवल्याने संपत्ती खरेदीचा आणि गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल.
370 कलमांतर्गत 35 A मुळे मिळालेले अधिकारही निघून जातील.

कलम 35A काय आहे?

14 मे 1954 रोजी भारताच्या राष्ट्रपतींच्या एका आदेशानुसार कलम 370 अंतर्गत कलम 35A जोडण्यात आलं. कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरला आधीच विशेष राज्याचा दर्जा प्राप्त होता. पण कलम 35A जोडल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या राज्य सरकारला स्वतःचं संविधान आणि काही विशेष कायदे तयार करण्याचे अधिकार मिळाले.

भारतीय राज्यघटनेतील कलम 35-A कलम 370 शी संबंधित आहे. ज्याअंतर्गत काश्मिरींच्या अधिकारांची तरतूद करण्यात आली आहे.  जम्मू काश्मीरमधून कलम 35A रद्द केल्यास त्या राज्याला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा संपेल. जम्मू काश्मीर विधानसभेला स्थानिक नागरिक परिभाषा ठरवण्याचा अधिकार या कलम 35 ए मुळे मिळतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना काही विशेष अधिकार मिळतात. राज्यात मालमत्ता खरेदी करणे, सरकारी नोकऱ्या, स्कॉलरशिपसह अन्य योजना मिळतात.
(Copied)

Sunday 21 July 2019

Sonakshi Sinha Defines Versatility With The Most Interesting Line-Up of Films


We all know how much everyone has loved the trailer of ‘Khandaani Shafakhana’which is a story of ‘Baby Bedi’ a.k.a Sonakshi Sinha; where she is urging people to talk about sex in order to save her ancestral sex-clinic. The trailer is extremely hilarious and also, it’s one of its kind as, this is the first time where in a movie based on a topic like sex-education, a female lead has taken the responsibility of making people talk about it by saying, #BaatTohKaro!

We must say, when it comes to choosing bold characters, there’s no one who can do it like our beloved Sona! Ever since she made her debut in Dabangg, she has been experimental with her roles. Even though now Dabangg has become a huge franchise, Sonakshi’s character graph in the film changed in both the parts. Be it Akira, Holiday or Force 2, Sonakshi Sinha loves to play a strong female lead who likes to live life on her own terms and is a trained fighter.

While we are talking about strong female characters, Sonakshi dared to go off-beat as well, because in Noor and Happy Phirr Bhag Jayegi, her roles were a bit on the goofy side, but certainly made sure that they made an impact. When it comes to playing content oriented cinema with complex characters, Sona had us head over heels in love with her in films like Lootera.

She didn’t even shy away from playing the villain in Ittefaq and now she’s all set to entertain us with the most interesting line-up of her films in the upcoming couple of years. Apart from ‘Khandaani Shafakhana’, Sona is returning as the lovely Rajjo in Dabangg 3. Along with that, she is also playing a lead role in a multi-starrer ensemble cast film, Mission Mangal, where she becomes an Astronaut on-screen! Sona is also starring in Bhuj, alongside Ajay Devgn which is based on the condition of Bhuj, Rajasthan during the 1971 Indo-Pak war.

What is it that this versatile woman can’t do? We just hope that she keeps on entertaining us with her interesting choice of characters for many, many years to come!

Tuesday 7 May 2019

Mentel Hai Kya been postponed

To whomsoever it may concern,

A lot is being reported about Mental Hai Kya clashing with another film at the box office on July 26. The shift in the release date is a decision taken after the recommendations from the distributors, trade analysts and top research team, keeping in mind the releases a week before and after this date.
We have been advised to shift the release of our movie to July 26, purely for the business prospects.

On knowing, that there is already a movie scheduled for a release on that date, we did it all in our purview to ensure that there will be no mud slinging and it will be dignified release. We stand by assuring that to all other parties.

This is a call taken by Ekta Kapoor’s Balaji Motion Pictures considering better prospects for the movie at the box office and no other parties were involved.

Balaji Telefilms condemn the reports being circulated and stand by that Mental Hai Kya releasing on 26th July is purely a business decision made by Ekta Kapoor’s Balaji Telefilms.

Friday 8 February 2019

१५ मार्च पासून महाराष्ट्रात लागू होणार छत्रपती शासन


पोस्टर रीलीज करताना मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या समवेत चित्रपटाचे  लेखक_दिग्दर्शक खुशाल म्हेत्रे व सहनिर्माते अमर पवार


१५ मार्च पासून महाराष्ट्रात लागू होणार 'छत्रपती शासन' 

प्रबोधन फिल्म्स प्रस्तुत ''छत्रपती शासन'' सिनेमा येत्या १५ मार्च २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. धर्म, जाती, प्रदेशाच्या नावाखाली स्वतःसह दुसऱ्याच्याही आयुष्याची राखरांगोळी  करणाऱ्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालून त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या विचारांची ओळख करून देण्याचा प्रयत्न म्हणजे "छत्रपती शासन" चित्रपट होय.  भविष्यातील खरी ताकद असलेल्या तरुण पिढीचा डळमळीत होणारा आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणारा परिपूर्ण फॅमिली एंटरटेनमेंट असलेला हा सिनेमा आहे. महाराजांचे विचार हे आजच्या काळात प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी साकारण्यात आलेला प्रयत्न म्हणजे "छत्रपती शासन". या सिनेमाचा पोस्टर लॉँच सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मा.खा.श्री. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकताच पार पडला. उत्कर्ष कुदळे, प्रियांका कागले आणि खुशाल म्हेत्रे यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन खुशाल म्हेत्रे यांनी स्वतः केलं असून कथा, संवाद देखील त्यांचेच आहेत. प्रथेप्रमाणे एखाद्या सिनेमाचा मुहूर्त सिनेक्षेत्रातील नामांकित मंडळी, राजकारणी अथवा इतर मान्यवरांच्या हस्ते केला जातो. मात्र या सिनेमाच्या टीमने अशा पारंपरिक प्रथेला बगल देत एक वेगळाच पायंडा पाडला आहे. ''छत्रपती शासन'' सिनेमाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त पहिल्यांदाच स्पॉट दादा योगेश मर्कड यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला होता. अभिनेता  मकरंद देशपांडे, किशोर कदम, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, प्रशांत मोहिते, अनिल नगरकर यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका असून सायली काळे, धनश्री यादव, किरण कोरे, सायली पराडकर, रामचंद्र धुमाळ, विष्णू केदार, राहूल बेलापूरकर, पराग शहा, प्रथमेश जोशी, श्रेयसचंद्र गायकवाड, अभय मिश्रा, मिलिंद जाधव यांचा अभिनय देखील सिनेमात पाहायला मिळणार आहे. गीतकार  डॉ. विनायक पवार, नंदेश उमप, दीपक गायकवाड, राजन सरवदे यांच्या लेखणीतून सजलेल्या गाण्यांना नंदेश उमप, रोहित नागभिडे, सचिन अवघडे, अभिजित जाधव, राजन सरवदे यांनी संगीत दिलं आहे. गायक नंदेश उमप, उर्मिला धनगर, जान्हवी प्रभू अरोरा, अभिजित जाधव, राजन सरवदे या गायकांच्या विविधांगी आवाजांचा स्वरसाज सिनेमातील गाण्यांना चढला आहे. बाल कलाकार श्रीशा म्हेत्रे, राजवर्धन दुसाने, रोमित भुजबळ आणि रेवा जैन यांच्या खुमासदार अभिनयाची झलक यातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निम्मिताने १५ मार्च पासून महाराष्ट्रात 'छत्रपती शासन' लागू होणार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.