Tuesday 20 October 2020

मनोज तिवारी का नया गाना हुआ प्रदर्शित

मनोज तिवारी का बिहार इलेक्शन पर कल होगा नया गाना जारी


अनुभव सिन्हा के गाने  मुम्बई में का बा को   बिहार में विपक्ष द्वारा एक महिला   की आवाज में रिकार्ड कर कॉपी कर दिया गया जिसके बोल हैं “ बिहार मैं का बा ”। जिसे मीडिया ने भी इस्तेमाल किया था और हम इसकी निंदा करते हैं। हमने केवल उनके ही शब्दों में विपक्ष को जवाब दिया .और गाना बनाया गया बिहार में ई बा।  जहां तक ​​बिहार अभियान का संबंध है सांसद और भोजपुरी मेगास्टार मनोज तिवारी  द्वारा कल  शुक्रवार को एक गाना जारी किया जाएगा, जिसका उपयोग बिहार में  चुनावों के लिए किया जाएगा।यह जानकारी  बीजेपी नेता नीलकांत बख्शी ने देते हुए कहा है कि मनोज तिवारी जी द्वारा जारी होने वाला यह गाना निश्चित ही मतदाताओं का ध्यान आकर्षित करेगा।

लवकरच होणार सिनेमाघरे खुली

एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपध्दती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.


कोविड - 19 मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासत केले.


मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, राज्यातील कोविड -19 चे संकट मोठे असून या संकटकाळात सिेनमागृहांचे मालक शासनासोबत आहेत याचे समाधान आहे. सिनेमा चालण्यासाठी सिनेमागृहांची आवश्यकता असते हे जरी खरे असले तरी महाराष्ट्राने पुनश्च हरिओम करीत कामगारांना काम मिळावे यासाठी उद्योग क्षेत्र सुरु केले. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याबाबत नुकतीच परवानगी देण्यात आली. आता मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे, रेल्वेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी लोकलच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत. राज्यातील सिनेमागृहांबाबतही सकारात्मकता ठेवून निश्चित करण्यात आलेल्या एसओपीनुसार सिनेमागृहे सुरु करण्यात येतील.आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. मनोरंजन क्षेत्र हे राज्याच्या अर्थचक्राला गती देणारे क्षेत्र आहे. हे क्षेत्र बंद ठेवण्यात आपल्याला किंवा शासनाला आनंद नाही.


आपल्याला जगभरात काही देशांमध्ये कोविड -19 चा संसर्ग वाढल्याने युरोप, ऑस्ट्रेलिया, स्वीडन यासारख्या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावा लागला.हिवाळयात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू शकतो असा इशारा देण्यात आल्याने आपल्याला काळजीपूर्वक पुढे जायचे आहे. महाराष्ट्रात आपण अनलॉक टप्प्याटप्प्याने करण्यामागे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये हाच उद्देश आहे. सिनेमागृहांमध्ये वातानुकुलित वातावरण प्रेक्षक  सिनेमा पहायला आल्यानंतर किमान दोन तास बंदिस्त ठिकाणी असतो त्यावेळी त्याला संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमधील स्वच्छता पाळली जाणे, सिनेमागृहे वेळोवेळी सॅनिटाईज करण्यात येणे,सिनेमागृहात एकूण आसनक्षमतेच्या फक्त 50 टक्के प्रेक्षक असणे या बाबी पाळल्या जाणे गरजेचे आहे.  एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, प्रेक्षकांनी मास्क लावणे, सॅनिटाईज करणे आणि शारीरिक अंतर पाळणे हे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

 

चौकट

बॉलीवूडची बदनामी दु:खदायक


मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलीवूडमध्ये बनत आहे. या बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलीवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे.बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत.

 

आताचा काळ सिनेमागृहे सुरु करण्यासाठी महत्वाचा - अमित देशमुख

 

दसरा, दिवाळी, नाताळ असे लागोपाठ येणारे सण यामुळे या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. लॉकडाऊन कालावधीत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे बंद करण्यात आली होती. आता सिनेमागृहे सुरु केल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी येतील, त्यामुळे आताचा काळ हा महत्वाचा आहे. परंतु सिनेमागृहे सुरु करण्याची परवानगी दिल्यानंतरही सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची आणि स्वच्छतेची काळजी यालाच प्राधान्य असणार आहे. सिनेमागृहे सुरु झाल्यामुळे या क्षेत्राला गती मिळणार आहे.


बैठकीस पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह सिंगल स्क्रिन ओनर्स पैकी उदय टॉकीजचे नितीन दातार, पीव्हीआर सिनेमाचे संजीव, युएफओ मुव्हीजचे कपिल अग्रवाल, संजय गायकवाड, राजेश मिश्रा, पीव्हीआरचे अजय बिजली,आशीर्वाद थिएटर्सचे अक्षय राठी, आयनॉक्सचे आलोक टंडन,सिध्दार्थ जैन, सिनेपॉलीसचे देवांग संपत, पीव्हीआरचे कमल ग्वानचंदानी, कार्निव्हलचे कुणाल सोहनी, सिटी प्राईडचे प्रकाश चाफलकर, राहूल हसकर, अटारिया मॉलचे कुणालवर्धन,झेविअर सोटोमेअर आदी उपस्थित होते.

मराठी मनोरंजन क्षेत्राच्या उभारीस नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार

चित्रपटांचे अनुदान दीर्धकाळ प्रलंबित असुन  अनुदान देणेच्या कामाला चालना देण्यासाठी  अतिरिक्त समिती तसेच सिनेकलाकार  लोकसाहित्य,नाट्यकर्मी यांना विमा,आरोयसेवा,प्रवास मदत करण्यास शासनाच्या विविध विभागांचे एकत्र प्रयत्न  गरजेचे  ... उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महाराष्ट्रातीलसिनेमांना अनुदाने एक वर्ष प्रलंबित असुन हे सर्व चित्रपट पाहुन त्यांच्या अनुदानाना मान्यता मिळण्यास अजुन १वर्षे लागु शकते म्हणुन यांच्या थकीत असलेल्या अनुदानाबाबत तसेच प्रलंबित असलेल्या कामाला चालना देण्यासाठी  अतिरिक्त समिती स्थापन करा असे निर्देश उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांस्कृतिक विभागाला दिले.       

महाराष्ट्रातील  सिनेकलावंत, रंगमंच कलावंत आणि लोककला कलावंत यांचे प्रश्न  चित्रपटगृहातील सुविधा व  शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत आज उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थित वेबीनार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. सांस्कृतीक कार्य विभागाचे संचालक बिभिषण चौरे, सह संचालक मीनल जोगळेकर, अवर सचिव शैलेश जाधव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, चित्रपट सेना उपाध्यक्ष दिगंबर नाईक, अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर,लोकसाहित्य अभ्यासक डॉ. चंदनशिवे, रघुवीर खेडकर, नाट्य निर्माते प्रसाद कांबळी, सुनील महाजन,मुंबई, पुणे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल , डॉ. प्रविण आष्टी कर,नाशिक, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद  मनपाचे अधिकारी या वेबीनारच्या माध्यमातून सहभागी होते.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यातील प्रत्येक महानगर पालिकेतील किती नाट्यगृह आहेत, त्याची सद्य:स्थिती काय आहे, त्यापैकी छोटी नाट्यगृहे किती आहेत तसेच महानगर पालिका यासाठी कोणते सहकार्य करत आहे हे तपासावे. त्याचप्रमाणे प्रत्येक महानगर पालिकेतील नाट्यगृहाच्या स्वच्छता गृहातील नळाचे पाणी नियमीत सुरु आहे की कसे, लिकेजची अडचण आहे काय, फ्लश सुरु आहे की कसे, पिण्याच्या पाण्याची सोय कसे आहे,  खिडक्यांच्या जाळ्या आणि काच दुरुस्ती केले आहे किंवा कसे, प्रत्येक स्वच्छता गृहात कचरा टोपल्या आहेत काय, फरशी दुरुस्ती केले आहे काय, स्वच्छता गृहे आणि शौचालयांना कडया आहेत काय, विद्युत व्यवस्था, बटणे व बल्ब सुरु आहेत काय, महिला कलाकारांना चेंजिंग रुम आहेत काय, हेल्प लाईन नंबर ग्रिन रुम व नाट्य गृहात लावले आहेत काय याबाबतचा आढावा घेऊन याचा अहवाल तयार करावा व तो मा.मुख्यमंत्री व मा. सांस्कृतीक कार्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे असेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद ,जालना येथील महानगर पालिकेतील नाट्यगृहाच्या सुविधा मधील दुरुस्तीच्या कामामध्ये सुधारणा होत आहे याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.

सांस्कृतीक कार्य विभागाचे संचालक श्री बिभिषण चौरे म्हणाले की, राज्यातील चित्रपटगृह सिने कलावंत, रंगमंच कलावंत आणि लोककला कलावंत यांचे सर्वेक्षण चालू असून ते लवकर पुर्ण करण्यात येईल. महानगर पलिकेतील नाट्यगृहे, सिने कलावंत यांच्या अनुदानाबाबतचे काम अंतिम टप्प्‍यात असून त्यावर लवकर निर्णय होईल. कोल्हापूर चित्रनगरचे प्रस्तावीत असलेले काम चालू आहे लवकरच पूर्ण केले जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ठाणे येथील राम  गणेश गडकरी व काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या सुविधा मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. तसेच कल्याण येथील नाट्यगृह हे चौथ्या मजलावर असून  कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यास त्रास होत आहे अशी सुचना अभिनेता सुबोध भावे यांनी मांडली.  यावरती डॉ नीलम गोऱ्हे यांनी कल्याण येथील उद्वाहन बसविण्याबाबत मनपा कल्याण डोंबिवली यांच्या सोबत लवकरच बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी राज्यातील नाट्यगृह, सिने कलावंत, सिने नाट्यसृष्टी कलाकार तंत्रज्ञ व इतर कामगार यांना आरोग्य विमा सुविधा,आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच Film and Television Institute of India (FTII) PUNE हे नाव बदलून प्रभात फिल्म कंपनी हे नाव देणे,मराठी चित्रपटांना वरील GST माफ करणे बाबत आढावा घेतला.  चित्रपट कामगारांना त्यांचे साहित्य ठेवणेसाठी गोरेगाव चित्रनगरी मध्ये छोटी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत, नवीन कलाकारांसाठी अल्प दरात मुंबईत भाडे तत्वावर निवास व्यवस्था उपलब्ध करणेबाबत, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी  दुरुस्ती व व्यवस्था याबाबत मार्गदर्शक सूचना करण्याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल असे ना.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

बालगंधर्व नाट्य मंदीर पुणे व औरंगाबाद येथील संत एकनाथ नाट्यमंदिर मधील दुरूस्तीच्या कामांचे टेंडर झालेले असून कामे तात्काळ सुरू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त औरंगाबाद यांनी सांगितले.  

नवीन नाट्यगृह बांधण्यासाठी व सर्व नाट्यगृहांमध्ये आवश्यक दुरूस्तीसाठी कलाकार व नाट्य निर्माता संस्थांची मदत घ्यावी, सर्व नाट्यगृहातील गैरसोईबद्दल तक्रार करण्यासाठी अधिकारी यांचे नाव व मोबाईल नंबरची यादी नाट्यगृहाच्या दर्शनी भागात लावावी, दिव्यांगासाठी सर्व मनपांनी व्यवस्था करावी  असेही निर्देश डॉ गोऱ्हे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.

नाशिक मनपा यांनी कालीदास सभागृहात ताबडतोब दिव्यांगाच्यासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यासाठी ना.डॉ.गोऱ्हे यांनी दिलेल्या निर्देशचे पालन करत तात्काळ रॅम्प बसविण्यात येईल तसेच कार्य अहवाल २५ ऑक्टोबर, २०२० देण्यात येईल असे देखील त्यांनी नाशिक उपायुक्त यांनी सांगितले. पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुणे येथील प्रलंबित नाट्यगृहाचा कामाचा कार्य अहवाल ताबडतोब सादर केले तसेच नव्याने सुचविण्यात आलेल्या कामाचा कार्य अहवाल दि.२५ ऑक्टोबर पर्यंत देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ठाणे मनपा येथील गडकरी नाट्यगृहाच्या प्रलंबित कामाचा अहवाल पुढील सात दिवसात सादर करण्यात येईल असे ठाणे अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले.

Wednesday 7 October 2020

कहाणी दत्ता डावजेकर यांची

 *शापित गंधर्व ..... डीडी*




कोलंबस म्हटलं की आपल्याला काय आठवतं ?  कोलंबसाने लावलेला अमेरिकेचा शोध !  


एक मराठी माणूसही असाच अवलिया होता. ज्याचे उपकार आपल्यावर निरंतर राहतील व त्या ऋणात राहण्यासारखं दुसरं सुख नाही. साक्षात *गानकोकिळेचा, गानसम्राज्ञीचा* शोध लावणारा तो अवलिया माणूस होता *ज्येष्ठ संगीतकार श्री दत्ता डावजेकर उर्फ डीडी.*


डीडींचं बालपण फारच हलाखीत गेलं. वयाच्या चौथ्या वर्षी आई देवाघरी गेली. वडील तमाशात तबला वाजवित त्यामुळे घराकडे पूर्ण दुर्लक्ष ! 


छोटा दत्ता बुध्दीने अतिशय तल्लख ! एक्स्ट्रा ऑर्डिनरी‌. शिक्षणाची नितांत आवड. इंजिनीयर व्हायची महत्त्वाकांक्षा !  वयाच्या पाचव्या वर्षी, १९२२ साली दत्ताने छोट्याशा *साबणाच्या डबीत रेडिओ* तयार करण्याची किमया केली होती. १९२४ साली लंडनमध्ये मॅकॅनो कंपनीने इलेक्ट्रिक सर्किट बनविण्याची एक स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत सात वर्षाच्या दत्ताने पाठविलेल्या सर्किटला *५० पौंडांचे प्रथम पारितोषिक* मिळालं.


एका वेळच्या जेवणाची भ्रांत असलेला दत्ता त्यावेळी लोकांच्या घरची धुणीभांडी करून, केरकचरा काढून मिळेल त्या अन्नावर आपल्या पोटाची खळगी भरत होता. दिवस जात होते. शिक्षण कधीच सुटलं होतं. त्याची खंत होतीच. परंतु जगाच्या शाळेत नूतनवीन शिकण्याची त्याची उर्मी काही कमी झाली नव्हती. 


डीडी तसेच ज्येष्ठ भावगीत गायक श्री गजाननराव वाटवे आणि इतर मित्र तेव्हां पुण्यात एकत्र रहात असत. तेव्हां वाटव्यांचं *वारा फोफावला* हे भावगीत जनमानसात अतिशय  लोकप्रिय झालं होतं. एके दिवशी डीडी सुबोध मुखर्जी या निर्माता-दिग्दर्शकाकडे काम मागायला गेले. तेथून आल्यावर ते वाटव्यांना प्रामाणिकपणे म्हणाले की *अरे वाटवे ! तुझं "वारा फोफावला" चं संगीत "माझं" आहे असं मी सांगितलं व मला पिक्चर मिळालं. तू रागावू नकोस रे बाबा !*


त्यावर वाटवे म्हणाले की *डावजेकर, तू काहीसुद्धा मनाला लावून घेऊ नकोस. ती चाल माझीही नाही. ती बाबूराव गोखल्यांची आहे !*


डीडींचे वडील बाबुराव, तमाशांत आणि उर्दू नाटकांत तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्‍या डावजेकरांनी तबलावादन आणि पेटीवादन आत्मसात करून घेतले. तबला-पेटी वादनांबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तरी हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे त्यांना मासिक २० रूपये पगार मिळत असे. १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे "म्युनिसिपालिटी" ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. 


डीडींची कन्या व नामवंत हिंदी-मराठी पार्श्वगायिका *डॉ रेखा दत्ता डावजेकर* उर्फ *डॉ सौ अपर्णा मयेकर* यांनी आपल्या संगीतकार, कवी, चित्रकार, संशोधक पित्याच्या सांगितिक, कौटुंबिक तसेच सामाजिक व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना दिलेला उजाळा म्हणजेच ही *ज्योतीने तेजाची आरती.*  


प्रश्न : डॉ अपर्णाताई, एक हरहुन्नरी, सृजनशील, हळवा कलाकार म्हणून आम्ही दत्ता डावजेकर उर्फ डीडींना ओळखतो. आपल्या या कनवाळू, अजातशत्रू पित्याबद्दल तुम्ही काय सांगाल ?


*डॉक्टर अपर्णा मयेकर :* मास्टर विनायक दिग्दर्शित करीत असलेल्या एका चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन माझे वडील दत्ता डावजेकर उर्फ डीडी करीत होते. एके दिवशी एका चौदा वर्षे वयाच्या हडकुळ्या, दोन वेण्या घातलेल्या फ्रॉकमधील मुलीची ऑडीशन घेण्यासाठी विनायकांनी डीडींना सांगितले. डीडी त्या मुलीची ऑडीशन घेऊ लागले आणि काही मिनिटांतच डीडी पळत पळत मास्टर विनायकांकडे आले व म्हणाले, *"विनायक, मागेल तेव्हढे मानधन द्या. पण ह्या मुलीला हातची जाऊ देऊ नका. असा गाता गळा यापूर्वी मी ऐकलेला नाही !"*.


त्यावर मास्टर विनायक हंसत म्हणाले की *"अहो डीडी, ती मास्टर दिनानाथांची मुलगी आहे, लता !"*


अशा रितीने लता दीदींचं संगीत क्षेत्रात आगमन झालं. लता दीदींचं हिंदीतील पहिलं गाणं *आपकी सेवा में* या चित्रपटातील "पा लागू कर जोरी" तर मराठीतील पहिलं गाणं *माझं बाळ* या चित्रपटातील "चला चला नवबाला" आहे. या दोन्ही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन डीडींचं आहे.


एव्हढेच नव्हे तर आशा भोसले, उषा मंगेशकर, सुधा मल्होत्रा, पं वसंतराव देशपांडे, माणिक दादरकर उर्फ माणिक वर्मा, प्रेमनाथ, अनुराधा पौडवाल या गायक/गायिकांना तसेच पृथ्वीतलावर भगवान श्रीकृष्णाच्या बांसरीचे कॉपी राईट्स सांभाळणारे सुप्रसिद्ध बांसरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांना पहिला ब्रेक दिला तो आदरणीय डीडी उर्फ दत्ता डावजेकर यांनी.



सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक *पं वसंतराव देशपांडे* यांना "झांजीबार झांजीबार" या गीताने पहिला ब्रेक देणारे आमचे डीडी. 


सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक व संगीतकार *पं जितेंद्र अभिषेकी* यांना लोकसंगीताचा बाज असलेले *गोमू माहेरला जाते रे नांखवा* हे सुपरहिट गीत बळेच गायला उद्युक्त करणारेही डीडीच.


सुप्रसिद्ध गायिका *माणिक दादरकर उर्फ सौ माणिक वर्मा* यांची HMV ची पहिली ध्वनिमुद्रिका डीडींच्या संगीत दिग्दर्शनाखाली निघाली.


प्रख्यात हिंदी अभिनेता आणि खलनायक *प्रेमनाथ* याला "गोवळकोंडा का कैदी" या चित्रपटात प्ले बॅक ची संधी डीडींनी दिली.


तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मास्टर विनायकांच्या *प्रफुल्ल पिक्चर्स* मध्ये असतांना डीडी, लतादीदी व इतर उत्साही माणसे फावल्या वेळात चक्क आट्यापाट्या खेळायचे. 


आशाताईंनी लतादीदींचे तत्कालिन मॅनेजर श्री भोसले यांच्याशी लग्न केल्यावर त्या उभयतांना आपल्या पुण्यातील घरात दोन महिने आसरा देणारेही आमचे डीडी.




माझ्या आईने  गरोदर असताना *दत्त रघुनाथ कुमठेकर यांची "आभाळाची सावली"* ही कादंबरी वाचली होती. त्या कादंबरीत रेखा नांवाचं डॉक्टरचं कॅरॅक्टर  होतं. आमच्या आईला हे कॅरॅक्टर फारच आवडलं. तिने डीडींना सांगितले की *आपल्याला जर मुलगी झाली तर आपणही तिचं नांव रेखा ठेवायचं आणि तिला मोठी डॉक्टर करायचं !* 


माझा जन्म झाल्यावर डीडींनी माझं नांव रेखा ठेवलं. स्वत:ला उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागले ही खंत मनात असल्याने त्यांनी आम्हां मुलांच्या शिक्षणावर सारं लक्ष केंद्रित केलं. आम्ही डीडींची मुले चिकित्सक शाळेत पहिला नंबर कधीच सोडत नसू. डीडींची आम्हाला ओपन ऑफर असे की आम्ही जेवढे परसेंटेज मिळवू तेवढे रूपये डीडी त्याकाळी आम्हाला बक्षीस देऊ करत.


१९७१ साली मी रेखा दत्ता डावजेकर *M.B.B.S*. झाले. माझा भाऊ सुध्दा इंजिनिअर झाला. परंतु डीडींची बुध्दी आम्हां मुलांपेक्षाही तल्लख होती. *भारतात सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक सिंथेसायझर बनविण्याचा मान डीडींकडे जातो*. त्यांनी अनेक इलेक्ट्रॉनिक वाद्यांची निर्मिती केली.


डीडी हे काळाच्या खूपच पुढचे संगीतकार होते. गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे हे मराठी चित्रपट सृष्टीतील त्रिकूट जगजाहीर आहे. अनेक उत्तमोत्तम चित्रपट या तिघांनी मिळून सादर केले. पण जेव्हां *पाठलाग* या चित्रपटाची जुळवाजुळव राजा परांजपे करत होते तेव्हा संगीत दिग्दर्शनासाठी त्यांनी डीडींना पाचारण केलं. या सस्पेन्स (गुढकथा) चित्रपटासाठी निर्मात्याचं बजेट कमी असल्याने डीडींनी कमीतकमी म्हणजे फक्त ५ वाद्ये वापरून गीतांना संगीतबद्ध केलं. या चित्रपटातील आशाताईंचे *या डोळ्यांची दोन पांखरे* हे गीत सुपरहिट ठरले. हा वाद्यमेळ ऐकून भलेभले संगीतकार चक्रावून गेले. 


चित्रपटांना बॅकग्राऊंड म्युझिक देण्यात आमच्या डीडींचा हातखंडा. केवळ हलणारी चित्रे पाहून डीडी स्वरलिपी तत्काळ तयार करायचे आणि किती सेकंदाचा पिस कोणी वाजवायचा हे त्या त्या वादकाला सांगायचे. आणि  ते नेहमीच अचूक असे.


हार्मोनियम, तबला, दिलरुबा, जलतरंग, ग्लॉक्स, क्ले व्हायोलिन, पियानो, सिंथेसायझर इत्यादी वाद्यांवर डीडींची हुकुमत होती. तसेच क्षणार्धात स्वरलिपी (नोटेशन्स) लिहिण्यात डीडी वाकबगार होते. त्यामुळेच सी. रामचंद्र, रोशन, चित्रगुप्त, एस एन त्रिपाठी अशा दिग्गज संगीतकारांकडे डीडी सहाय्यक संगीतकार म्हणून काम पाहू लागले. या संगीतकाराच्या अनेक अजरामर गीतांचे संगीत संयोजन डीडींनी केले आहे. 


जेव्हां डीडींची स्वत:ची चाल असे तेव्हा चाल केल्यावर डीडी ती मला गायला सांगत. माझ्याकडून गाऊन घेतल्यावर त्या चालीत आवश्यक ते फेरबदल करून मग ती चाल मुख्य गायिकेकडून गाऊन घेत. 


तुम्हाला आश्चर्य वाटेल  पण संगीतकार सी रामचंद्र यांच्या सुप्रसिद्ध *"अनारकली"* चित्रपटामधील *जाग दर्द-ए-इश्क जाग* या गीताचं संपूर्ण संगीत दिग्दर्शन डीडींचं आहे. 


संगीतकार  मास्टर कृष्णराव यांना *किचकवध* चित्रपट मिळाला. या चित्रपटातील *धुंद मधुमती रात रे* ह्या गीताची चाल खरंतर डीडींची आहे. ह्या गीताची एक मजेशीर गोष्ट आहे.  ह्या गीताच्या रिहर्सलसाठी लतादीदी व मास्टर कृष्णराव आमच्या गिरगांवातील भिमराव वाडीतील घरी आले होते. स्वत:ची चाल असल्यामुळे डीडींनी रिहर्सलच्या आधी हे गाणं माझ्याकडून गाऊन घेतलं व चालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या. लतादीदी रिहर्सल करीत असतांना थोड्या वेळाने डीडी सिगारेट आणण्यासाठी जागेवरून उठले‌. लतादीदींना कारतो कळल्यावर त्या म्हणाल्या की *खाली माझा ड्रायव्हर जयसिंग उभा आहे. मी त्याला सिगारेट आणायला पाठविते.* त्यानंतर लतादीदी आमच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीत उभ्या राहून जयसिंगला हाका मारू लागल्या. *जयसिंग ! जयसिंग !!* कल्पना करा. गिरगांवांत *साक्षात कोकिळेचा आवाज* ऐकून गिरगांवकर स्तिमित होऊन वर पाहू लागले व लतादीदी भिमराव वाडीत आल्या आहेत ही बातमी गिरगांवात सर्वदूर पसरली व जो तो आमच्या भिमराव वाडीकडे धावू लागला.



डीडींनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी *थँक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले*. डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम कवीही होते. "आली दिवाळी मंगलदायी", "कुणि बाई, गुणगुणले", "गेला कुठे बाई कान्हा", "थांबते मी रोज येथे" व "तुज स्वप्नि पहिले रे, गोपाला" ही त्यांनी रचलेली आणि गाजलेली काही गीते. 


*भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी* हे गदिमांनी लिहिलेले "पाहू रे किती वाट" ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले. 


डीडी उत्कृष्ट कविता करायचे. त्यांच्या असंख्य कविता प्रसिद्ध आहेत. नामवंत गीतकार व कवी ग दि माडगूळकर उर्फ गदिमा हे आपल्या कोणत्याही काव्यात फेरफार चालवून घेत नसत. अपवाद फक्त डीडी. *डीडींची काव्यप्रतिभा जाणून असल्याने गदिमांनी फक्त डीडींना काव्यात फेरफार करण्याची मूभा दिली होती.*


*या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती* (चित्रपट - पाठलाग, गायिका: आशा भोसले), *गोमू माहेरला जाते हो नाखवा* (चित्रपट: वैशाख वणवा. गायक: पं.जितेंद्र अभिषेकी), *बाई माझी करंगळी मोडली* (चित्रपट: पडछाया- गायिका:आशा भोसले), *आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही* (चित्रपट: वैशाख वणवा- गायिका: सुमन कल्याणपूर), *गंगा आली रे अंगणी* (चित्रपट:संथ वाहते कृष्णामाई), *रामा रघुनंदना* (चित्रपट: सुखाची सावली – गायिका: आशा भोसले), *ऊठ शंकरा सोड समाधी* (चित्रपट: पडछाया-गायिका : रेखा डावजेकर) ही डीडींची काही गाजलेली गाणी.



आमचे डीडी अतिशय मितभाषी व मृदू स्वभावाचे. दुसऱ्याच्या चांगल्या गुणांची पारख करणारे आणि त्याबद्दल चारचौघांत प्रशंसा करणारे. *हा खेळ सावल्यांचा* ह्या चित्रपटाला खरं तर डीडी संगीत देणार होते. नंतर त्यांना कळलं की आता त्याचं संगीत दिग्दर्शन हृदयनाथ मंगेशकर उर्फ बाळ करणार आहे. डीडींना हे कळल्यावर त्यांची उस्फूर्त प्रतिक्रिया होती *अरे वा ! बाळ म्युझिक डिरेक्ट करतोय कां ? बेस्ट ! बाळ छान म्युझिक करतो. तो ह्या गीतांना न्याय देईल‌. त्याला माझ्या तर्फे आशिर्वाद !*. यापेक्षा संत या शब्दाला दुसरा पर्याय आहे कां ?


डीडींचं प्रथम प्राधान्य अभ्यासाला नंतर इतर गोष्टींना. हौस म्हणून गाणे ठीक आहे पण व्यवसाय म्हणून नको असे ते म्हणत. मी मेडिकलला असतांना हृदयनाथ मंगेशकरांनी *"भावसरगम* कार्यक्रमात गाशील कां ?" म्हणून मला विचारले. डीडींनी सांगितले "मुळीच नाही. पहिला अभ्यास. तूला डॉक्टर व्हायचंय त्याच्यावर लक्ष केंद्रित कर." 


मी गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. पं जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून मी गंडा बांधलाय. शोभा गुर्टू, वसंतराव कुलकर्णी या गुरूंकडेही मी शिकलेय. गझल गायन मी गोविंदप्रसाद जयपुरवाले यांच्याकडे शिकलेय. गिरगांवातीलच सुप्रसिद्ध गायक गोविंद पोवळे हे माझे सुगम संगीत (लाईट म्युझिक) क्षेत्रातील गुरू. 


लहानपणी स्वत:च्याच संगीत दिग्दर्शनाखाली गाण्यासच डीडींची मला अनुमती असे. अपवाद फक्त संगीतकार वसंत पवारांचा आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा. वसंत पवारांचा आणि डीडींचा स्नेह. वसंत पवारांच्या "डोंगरची मैना" या चित्रपटातील एकच गाणं गाण्यास डीडींनी मला अनुमती दिली. सुप्रसिद्ध गायक बालकराम वरळीकर यांच्याबरोबर मी एक द्वंद्वगीत गायले. ज्येष्ठ संगीतकार श्री श्रीनिवास खळे यांच्या *जिव्हाळा* या चित्रपटातील *या चिमण्यांनो, परत फिरा रे !* ह्या गीतातील ४ कडव्यांपैकी दोन कडवी मुले गच्चीवर पतंग उडवत असतांना गातात. तर उरलेली दोन कडवी आई मुलांना घरी परत बोलावण्यासाठी गाते. यातील आईची दोन कडवी लतादीदींनी गायिली तर मुलांच्या दोन कडव्यांपैकी एक कडवं मी गायले. चित्रपटात फक्त लतादीदींचीच दोन कडवी ठेवण्यात आली.


संगीतकार सी रामचंद्र *आशा* नावाच्या चित्रपटाला म्युझिक देत आहे. डीडी त्यांचे सहाय्यक होते. एकदा सी रामचंद्र, डीडी आणि गीतकार राजेन्द्र कृष्ण कारमधून जाताना सी रामचंद्र डीडींना म्हणाले की "अरे दत्ता, ह्या पिक्चरमध्ये आपल्याला एक वेस्टर्न साँग घ्यायचंय." त्यावर डीडी म्हणाले की मी रेडिओवर एका संगीतिकेला संगीत देतोय. त्यात मी स्वत: एक गीत लिहिलंय. त्या गीताचे शब्द आहेत *इना मिना मोना बोस*. ह्या गीताचं संगीत मी वेस्टर्न स्टाईलमध्ये दिलंय. असं म्हणून डीडींनी ते गीत सी. रामचंद्रना वेस्टर्न स्टाईलमध्ये गाऊन दाखवले. सी रामचंद्रना ते गीत विलक्षण आवडले व फक्त शब्द बदलून तेच गीत डीडींच्याच वेस्टर्न स्टाईलमध्ये *आशा* चित्रपटात समाविष्ट झाले. त्या सुपरहिट गीताचे बोल होते *इना मिना डिका...*.


*माझं लग्न सुप्रसिद्ध सतार वादक श्री अरविंद मयेकर यांचेशी ५ जून १९७२ रोजी झालं.* ते पं. जितेंद्र अभिषेकी यांचे उजवे हात. डीडींच्याही अनेक रेकॉर्डींग्जमध्ये त्यांचा सहभाग होता. त्या काळच्या नटसम्राट, गुंतता हृदय हे, कट्यार काळजात घुसली, मत्स्यगंधा, रायगडाला जेव्हा जाग येते, मन पांखरू पांखरू, लेकुरे उदंड झाली, इत्यादी अनेक सुपरडुपर हिट नाटकांचं बॅकग्राऊंड म्युझिक माझ्या मिस्टरांचं आहे. *लेकुरे उदंड झाली* या नाटकाच्या प्रोज-कम-चालीत अरविंद मयेकरचा सिंहाचा वाटा आहे असे त्याचे संगीतकार पं जितेंद्र अभिषेकी आवर्जून उल्लेख करीत. कॉन्सर्ट्सच्या निमित्ताने त्यांनी देशविदेशात लतादीदी, सुमन कल्याणपूर, मुकेजी यांच्याबरोबर असंख्य दौरे केले आहेत. अशा रितीने माझ्या माहेरी व सासरी मी संगीतात चिंब न्हाऊन गेलेय.



एकदा संगीतकार सी रामचंद्र काही कामानिमित्त आमच्या घरी आले होते. तेव्हा ते डीडींना म्हणाले की *थाकीन (म्हणजे मी)* ला मी "शारदा" पिक्चरमध्ये प्ले बॅक साठी घेतोय. "शारदा" चित्रपटातील पहिल्याच सीनमध्ये छोटी मीना कुमारी दोन श्लोक गाताना दाखवलीय. हे दोन्ही श्लोक मी गायलेयत. ते माझं पहिलं रेकॉर्डिंग‌. बॉम्बे लॅबमध्ये हे रेकॉर्डिंग‌ झाल्यावर मी रूमच्या बाहेर आले. तेथे एक गोल चेहऱ्याचे गृहस्थ उभे होते. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला व म्हणाले, *बहुतही मिठी आवाज है ! बहुत गाओगी !* डीडींनी स्टुडिओच्या काचेतून हे दृष्य पाहिले व ते धावत बाहेर आले व मला म्हणाले, *अगं त्यांच्या पाया पड. ते महम्मद रफी आहेत.*  त्या वयात मला महम्मद रफी वगैरे कुठलं ठाऊक असायला ? अक्कल आली तेव्हा मात्र स्वत:चा खूपच अभिमान वाटला.


*शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा* या गाण्यांत मी आशाताईंबरोबर गायलेय. मला न्यायला डीडी चिकित्सक शाळेत आले होते. आम्ही स्टुडिओचा जीना चढत असतांना वर उभ्या असलेल्या अभिनेता देव आनंदने मला शाळेच्या युनिफॉर्ममध्ये पाहिले. तो पटकन पुटपुटला *आजकलकी लडकियां स्कूल बंक करके हिरो हिरॉईन देखने आते है !* असं बोलून तो आत रेकोर्डिंग स्टुडिओत निघून गेला ‌ डीडींना भारी राग आला. ते मला म्हणाले की *त्यांच्याशी मला बोलावं लागेल*!


डबींग झाल्यावर देव आनंद बाहेर आला. डीडींनी त्यांना थांबवलं व म्हणाले, *आपने मेरी बेटी के बारे मे जो बोला वो गलत है ! मेरी बेटी होनहार है और स्कूल में हर बार फर्स्ट आती है ! वोह डॉक्टर बनने वाली है ! आज आशाजी के साथ ड्युएट गाने के लिए मै उसे डायरेक्ट स्कूल से लाया हूं !*


देव आनंद अवाक होऊन डीडींकडे पहात राहिले व sorry म्हणाले.


आशाताईंनी माझ्या खांद्यावर हात ठेवून *शेपटीवाल्या प्राण्यांची ...* हे ड्युएट माझ्याबरोबर गायलं व *प फ ब भ* ही अक्षर आल्यावर माईक कसा क्रॉस धरायचा हेही शिकवलं.


एकदा रंगभवन ह्या ओपन थिएटरमध्ये महाराष्ट्र सरकारचा अवार्ड फंक्शनचा कार्यक्रम होता. हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदी पहिल्या रांगेत बसले होते. मी त्यांच्यासमोर *जीवलगा* गायले. लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. थोड्या वेळाने हृदयनाथ व लतादीदी दोघंही स्टेजवर आले. हृदयनाथ मला म्हणाले, *अगं तुझी हिम्मतच कशी झाली की साक्षात सरस्वती समोर बसलेली असतांना "जीवलगा" गायची ? तूला भिती वाटली नाही ?*


मी फक्त हंसले अन् म्हणाले, की *हे डीडींचे मार्गदर्शन !*


लहानपणी एकदा आमच्या गायन क्लासचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम लक्ष्मीबागेत होता. डीडी मला म्हणाले की तू *ओ चांद जहा वोह जाये...* हे गाणं गुरुपौर्णिमेला गा. 


लक्ष्मीबागेत हॉल खचाखच भरला होता. मला भिती वाटली. डीडी मला बाजूला घेऊन म्हणाले, *थाकीन ! असं समजायचं की गाण्यातली अक्कल फक्त तूला आहे. समोर जे बसले आहेत त्याना कोणाला गाण्यातलं काहीही कळत नाही. हा मंत्र सारखा मनात ठेव.* 


मी बिनधास्त होऊन गायले व तीनवेळा वन्स मोअर घेतला. *Positive Thinking हे डीडींचं वैशिष्ट्य.*


डीडी टॅप डान्स फार म्हणजे फारच छान करायचे. "गजाभाऊ" चित्रपटात डीडी आणि बेबी आचरेकरने टॅप डान्स केलाय.


चित्रकला, रेखाचित्र डीडी लिलया काढायचे. आमच्या भिमराव वाडीत दिवाळीत वेगवेगळ्या स्पर्धा, नाटके, सांगितिक कार्यक्रम होत असत‌ एक मॅगझिन ही निघत असे‌. त्याचे मुखपृष्ठ दरवर्षी डीडी चितारीत. 


एकदा डीडींनी काळ्या कार्बन पेपरवर तेली खडूने *मंगळावरचा माणूस* हे चित्र काढले. एकदा गदिमा आमच्या घरी आले असतांना त्यांनी हे चित्र पाहिले व डीडींकडून मागून घेऊन पुण्यातील आपल्या *"पंचवटी"* बंगल्यात लावले.


प्रश्न : तुमचा स्वत:चा संगीत प्रवास कसा झाला ?


*डॉक्टर अपर्णा मयेकर* : मी अत्यंत समाधानी आहे. मी १४ भाषांमध्ये सुमारे ५००० हून अधिक गाणी गायलेय. प्रामुख्याने मराठी व हिंदी भाषांमध्ये मी पार्श्वगायन केलंय. मराठीत डीडी, बाबूजी, खळेकाका, वसंत पवार, विश्वनाथ मोरे, अनिल-अरुण, इत्यादी तर हिंदीत भप्पी लाहिरी, सी रामचंद्र, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रविंद्र जैन, दिलीप सेन-समीर सेन, इ अनेक संगीतकारांकडे मी गायलेय. उच्चार अस्खलित व्हावेत म्हणून मी उर्दू शिकले. मी उर्दूत कविताही करते. 


भप्पी लाहिरींच्या "गैर कानूनी" या चित्रपटात "तुम जो परदा रखोगे" हे गाणं लतादीदी गाणार होत्या. पडद्यावर गोविंदा व श्रीदेवी होते. लता दिदी उपलब्ध नसल्याने भप्पीदांनी मला तात्पुरतं डबींगसाठी बोलावलं. मी श्रीदेवीचा पार्ट लतादीदींसाठी डब केला. काही दिवसांनी लतादीदी टेकसाठी गायला आल्या. माझं डब झालेलं गाणं ऐकल्यावर त्या भप्पीदांना म्हणाल्या की *थाकीन ने अच्छा गाया है ! यही गाना रहेने दो !* यापेक्षा मोठी दाद कोणती असेल ? भप्पीदाही म्हणाले की "लतादीदीने फर्स्ट टाईम किसी और सिंगर को इतना अॅप्रिसिएट किया हो !"


मी भप्पी लाहिरी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, मन्ना डे, नितीन मुकेश, आनंद-मिलींद यांच्याबरोबर परदेश दौरे केले आहेत.


परंतु माझे प्राधान्यक्रम ठरलेले होते. प्रथम मुले, त्यानंतर रुग्णसेवा व स्वान्तसुखाय गाणं‌. सध्या मी *सतरंगी आशा* हा माझा कार्यक्रम करते. यात माझा सलग ३० गीतांत सहभाग असतो. मध्येमध्ये काही ड्युएट्स असतात.


प्रश्न : आपले वडील एव्हढे ज्येष्ठ संगीतकार, कवी, चित्रकार, संशोधक (क्ले व्हायोलिन व सिंथेसायझर) होते. *१९६२ पासून सलग पाच वर्षे सर्वोत्कृष्ट संगीतकार पुरस्कार* मिळवूनही त्यांच्या या श्रमांचं चीज झालं नाही असं तुम्हाला वाटत नाही कां ?


*डॉक्टर अपर्णा मयेकर* : होय. वाटतं. पण त्याला कारण त्यांचा मृदू, भिडस्त, अल्पसंतुष्ट स्वभाव. "ठेविले अनंते तैसेची रहावे" ही वृत्ती. हे गाणं *मी स्वरबध्द केलंय* असं कधीही कुणालाही न सांगण्याची प्रवृत्ती. पराकोटीची सहनशीलता. दुसऱ्याला माफ करण्याकडे कल. मी तर त्यांना *शापित गंधर्व* म्हणते. त्यांना पुनर्जन्म नाही. *त्यांचं संगीत, त्यांच्या बुध्दीचा अंश आणि त्यांची सहनशीलता माझ्यात उतरलीय हे माझं भाग्य !*

(टिप :  हा  लेख माझं नाही. लेखकाचे नाव ठावूक नाही, परंतु माहितीपूर्ण वाटला म्हणून कॉपी केला)

#दत्ताडावजेकर #संगीतकार

Tuesday 6 October 2020

Akshay and Vaani paid a tribute to nostalgia

Bellbottom' duo Akshay Kumar and Vaani Kapoor stylishly arrive back in Mumbai!!


The cast and crew of Pooja Entertainment's retro themed, espionage thriller 'Bellbottom' are back in Mumbai after wrapping up a memorable schedule.



Akshay and Vaani paid a tribute to the nostalgia seeped film by stepping into Mumbai airport in their retro look. Vaani looked gorgeous in her pair of Bell-bottoms. Both were styled to celebrate not just the film but the era the story is set in.


'Bellbottom' was also the first film to go on floors post the lockdown. It also became the first film in the world to start and finish shooting during the pandemic.

BellBottom Completed

Akshay Kumar's ‘Bellbottom’ Becomes the First Film in the World To Start and Finish Shooting During The Pandemic!

The film finds itself in the company of a handful of international, mega-budget films that got back on the floors during the pandemic such as Tom Cruise's Mission: Impossible 7 and Jurassic Park: Dominion, managing to shoot in an unprecedented environment. In the process, Bellbottom has become the first of these films to complete shooting the entire film. 

Pooja Entertainment presents in association with Emmay Entertainment ‘Bellbottom’ Produced by Vashu Bhagnani, Jackky Bhagnani, Deepshikha Deshmukh, Monisha Advani, Madhu Bhojwani and Nikkhil Advani. 'Bellbottom' written by Aseem Arrora & Parveez Shaikh is set to release on 2nd April, 2021.


#BellBottom


Amazon to launch Amazon Original Movie Putham Pudhu Kaalai

Amazon Prime Video to launch Amazon Original Movie Putham Pudhu Kaalai, an anthology of five Tamil short films featuring the first of its kind stories of love, new beginnings, second chances, and a glimmer of hope – set and filmed in the times of the COVID-19 lockdown.

Putham Pudhu Kaalai brings together 5 of the most celebrated directors in Tamil cinema – Sudha Kongara, Gautham Menon, Suhasini Mani Ratnam, Rajiv Menon, and Karthik Subbaraj to create Amazon Prime Video’s first Indian anthology film.

Putham Pudhu Kaalai will release on the 16th of October in over 200 countries and territories!#

#PuthamPudhuKaalai

Bellbottom for a swift and an incredible shooting

https://www.instagram.com/p/CFtzsPPnr4h/?igshid=rsx5tid3rhe3


Akshay Kumar thanks his entire team of 'Bellbottom' for a swift and an incredible shooting experience in Glasgow, Scotland.


Amidst the current pandemic situation, the superstar wraps up the shoot of his film.

The actor shared a picture from their final day in Scotland. Seen in the picture is Akshay Kumar and his family along with Vaani Kapoor, producers Jackky Bhagnani and Deepshikha Deshmukh and director Ranjit M Tewari.


#Bellbottom

Friday 2 October 2020

Philanthropist Irbaaz Ansari lends his support for Covid affected area

Philanthropist Irbaaz Ansari lends his support for Covid affected area through his foundation I Love Aurangabad



Covid-19 pandemic has crippled the economic system of most of the countries including India. India is one of those countries who has been severely affected by the deadly virus with more positive cases being reported daily. Out of all states Maharashtra is experiencing more covid positive cases. Aurangabad city is a hub for all kinds of economic activities in the region. With the pandemic hit, the daily wage worker were the most affected lot. This led to irbaaz Ansari's foundation I Love Aurangabad to step forward to help these migrant workers with best of their capacity. Mainly they focused on providing the single most crucial thing for survival, which is food. Aurangabad city accounts for huge chunk of all COVID-19 cases in India, which is a big number for a city of this size. Looking at this, Mr Ansari's front line warriors including him flung into action by helping more than 600 families with basic supply of food and medical needs.


The NGO, I Love Aurangabad not only cared for humans in these difficult times but also taken care for homeless animals through the initiative Lets feed homeless animal social campaign. There was a time when the organisation was left with no funding but that didn't dither the warriors with the help of crowd funding and through personal savings helped many lives to survive.


Distributing face masks and shield, Immunity Boosters, footwear, organising safety awareness programs in various parts of Aurangabad city, arranging free psychological counseling of migrant workers and corono affected patients were some of the activities this foundation initiated tirelessly.

Looking at their great efforts actor Sonu Sood came in support of this foundation appreciating the president of the NGO Irbaaz Ansari who travelled to Mumbai to meet the superstar.


Speaking on this Mr Irbaaz Ansari said, "I have inherited this quality from my father  Nayab Ansari who is very kind and is always up to help others in their dire condition who happens to be the and founder and editor of The Hindustan Newspaper Urdu daily in Aurangabad. When I saw so many migrant workers going empty stomach without basic need of food supply and hygiene water to drink I felt humanity is calling me there are several human and animal life is at stake who urgently needed our help. Coming out from the comforts of my home along with my team of frontline warriors tried to help under our foundation I Love Aurangabad with best of our capacity and still continuing to reach out as many people we can help. It was highly motivating for me and my team when the real hero Sonu Sood appreciated our work and supported us. We couldn't have asked for more for our work."

#Irbaazansari #iloveaurangabad

Statement from Anurag Kashyap

Statement from Anurag Kashyap's Lawyer , Priyanka Khimani 

In an FIR registered with the Versova Police Station, one Ms. Payal Ghosh has alleged that in August 2013, my client, Mr. Anurag Kashyap, called her to his house and sexually harassed her. My client presented himself for questioning before the investigating authority on 1st October 2020.

Mr. Kashyap has denied all wrongdoing in the matter and has provided his statement to the police. The material provided by Mr. Kashyap, in support of his statement, demonstrates that the complaint of Ms. Ghosh is an outright lie. Mr. Kashyap has provided documentary proof of the fact that throughout August, 2013 he was away in Sri Lanka in connection with the shooting of one of his films. Mr. Kashyap has categorically denied that any such alleged incident ever took place and has also denied all allegations levelled against him.

These sudden, belated allegations of an alleged incident of August, 2013 have been widely publicised by the Complainant for the purpose of vilifying Mr. Kashyap, irrespective of the outcome of the judicial process. Mr. Kashyap is confident that the falsity of the complaint has been exposed, not only by the evidence presented by Mr. Kashyap, but also the ever-shifting version of events put forth by Ms. Ghosh in the media. Mr. Kashyap is apprehensive that now that the falsity of her allegations in the FIR have been established, she will alter her version of events in the investigative process as well.

Mr. Kashyap is distressed with the false and reckless allegations made against him that have caused pain to him, his family and his fans. Mr. Kashyap intends to vigorously pursue the legal remedies available to him.

Mr. Kashyap  vehemently denies any such incident, as has been alleged, and has sought for severe action against Ms. Ghosh for misusing the criminal justice system and for hijacking the Me Too Movement for her ulterior motives. Mr. Kashyap is confident that justice will prevail.

#PayalGhosh #AnuragKashyap

Wednesday 30 September 2020

K C Shivshankar is no more

 K C Shivshankar is no more



आपण सगळ्यांनीच आपल्या बालवयात चांदोबा/Chandamama नक्कीच वाचला आहे. अनेक देखण्या अप्सरा, सामान्य माणसं, शेतकरी, व्यापारी, राजघराण्यातील पुरुष, लहान बालकं... किती-किती म्हणून असायची ती चित्रं!! वाचन म्हणजे नक्की काय समजण्या आधी फक्त चित्र बघण्यात पण मजाच होती वेगळी, इतकी सुरेख जिवंत चित्र.


तर त्या मासिकातील विक्रम आणि वेताळ कथामालेतील रुबाबदार विक्रम, त्याची टोकदार तलवार, तो मोठा वृक्ष, त्याच्या आजूबाजूला असलेल्या कवट्या, विक्रमाच्या मानगुटिवर/पाठीवर बसलेला पांढरे शुभ्र केस मोकळे सोडलेला खतरनाक वेताळ!! या विक्रम आणि वेताळ यांची अक्षरशः जिवंत चित्रं काढणारे चित्रकार म्हणजे के. सी. शिवशंकरन.


#चांदोबा परिवारातील एकमेव हयात व्यक्ती असलेल्या चित्रकार शंकर यांचे आज निधन झाले आहे. आज त्यांचं वय 96 होतं.


Erode जवळील छोट्या गावात त्यांचा जन्म झालेला. जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांचे वडील बायको-मुलांना घेऊन चेन्नईत आले. शाळेत असताना त्यांची चित्रकलेतील प्रगती पाहून त्यांच्या एका शिक्षकाने,"तुझी चित्रकला उत्तम असून तू B.A./M.A. न होता चित्रकलेचं शिक्षण घे" असा सल्ला दिला.


त्यानुसार बारावी पास झाल्यावर त्यांनी Government College of Fine Arts, Chennai येथे प्रवेश घेतला. 1946 मध्ये ते तमिळ नियतकालिक Kalaimagal येथे नोकरीला सुरवात केली. त्यांचा पगार तेव्हा ₹150/- होता. तेवढेच पैसे ते freelance writer म्हणून कमवत होते.


1952 मध्ये बी. नागारेड्डी यांच्या #चंदामामा मासिकासाठी चित्र काढण्याची नोकरी मिळाली. तेव्हा त्यांना ₹ 350/- पगार होता. 


आपलं बालपण सुंदर-सहज करणाऱ्या चित्रकार शंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

#Chandamama #KCShivshankar #चांदोबा

Monday 28 September 2020

पायल घोषच्या तक्रारीनुसार अनुराग कश्यप यांना अटक करा

 #RAMDAS ATHAWALE#


         

पायल घोषच्या तक्रारीनुसार अनुराग कश्यप यांना येत्या सात दिवसांत अटक करा अन्यथा रिपब्लिकन पक्ष आंदोलन छेडेल  -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


 मुंबई दि. 28 - अभिनेत्री पायल घोष यांच्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.  त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्याप अनुराग कश्यप यांची चौकशी केली नाही. येत्या सात दिवसांत मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप यांच्यावर कोणती कारवाई केली नाहीतर मुंबईत रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिला आहे. आज अंधेरीत कर्मवीर दादासाहेब गायकवाड  केंद्र येथे अभिनेत्री पायल घोष आणि ना रामदास आठवले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी रिपाइं चे माजी मंत्री राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर;राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर; सुरेश बारशिंग; केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव; लाखमेन्द्र खुराणा; एम एस नंदा; रमेश गायकवाड;  जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव;ऍड. नितीन सातपुते; किशोर मासुम; रतन अस्वारे; तरणजीत सिंह; घनश्याम चिरणकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

 माझ्या जीवाची आणि इज्जतीची पर्वा न करता मी अनुराग कश्यप विरुद्ध तक्रार केली आहे.माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या या संकटकाळात केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिल्याने मला हिम्मत मिळाली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानत असल्याचे अभिनेत्री पायल घोष यावेळी म्हणाल्या.

 कोणत्याही महिलेने तिच्यावर अत्याचार झाल्याची तक्रार केल्यानंतर  पोलीस तातडीने कारवाई करून आरोपीला अटक करतात.मात्र अभिनेत्री पायल घोष ने तक्रार करून  आता 7 दिवस झाले तरी अनुराग कश्यपला चौकशी साठी ही पोलिसांनी बोलाविले नाही.

 याप्रकरणी काही लोक अनुराग कश्यप चांगला असल्याचे मत व्यक्त करीत असले तरी ते त्यांचे वैक्तिक मत आहे. पायल घोषला मात्र अनुराग कश्यपचा वाईट अनुभव आल्याने तिने त्याच्या विरुद्ध  तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबईचे सह पोलीस आयुक्त ; उपायुक्त आणि वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी आपण बोललो असून पायल घोष ला न्याय देण्याबाबत चर्चा केली आहे. पायल घोषने स्वतःच्या जीवाची आणि इज्जतीची पर्वा न करता अनुराग कश्यप विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. बॉलिवूड मध्ये नवीन आलेल्या कलाकारांना; करियर घडविण्यसाठी धडपडणाऱ्या  नव्या कलाकारांचे कोणत्याही प्रकारचे शोषण होऊ नये म्हणुन पायल घोष च्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष उभा आहे.

 याप्रकरणी मुंबई पोलिसांनी योग्य कारवाई केली तर नव्या कलाकारांचे कोणीही शोषण करणार नाही त्यामुळे येत्या 7 दिवसांत अनुराग कश्यप ला पोलिसांनी अटक करावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष तीव्र आंदोलन छेडेल असा ईशारा ना. रामदास आठवले यांनी दिला आहे. 

अभिनेत्री पायल घोषला मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले पाहिजे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे. 

यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्रा बाहेर रमेश पाईकराव; रमेश पाळंदे; आदी अनेक रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात एकत्र येऊन पायल पाठिंबा देत असल्याबाबत घोषणा देत होते. 


               

गीतकार अभिलाष का निधन

#इतनी_शक्ति_हमें_देना_दाता फेम #गीतकार_अभिलाष_का_निधन



कल 27 सितंबर 2020 की रात को गीतकार अभिलाष ने इस दुनिया को अलविदा कह दिया। उनकी स्मृति को सादर नमन।  मार्च में उन्होंने पेट के एक ट्यूमर का ऑपरेशन कराया था। तभी से उनकी तबीयत ठीक नहीं चल रही थी।  मध्य रात्रि में ही गोरेगांव पूर्व के शिव धाम में उनका अंतिम संस्कार किया गया। उनकी बेटी और दामाद बैंगलोर में रहते हैं।


पूर्व राष्ट्रपति ज्ञानी जैल सिंह द्वारा कलाश्री अवार्ड से सम्मानित सिने गीतकार अभिलाष का विश्व प्रसिद्ध गीत 'इतनी शक्ति हमें देना दाता' हिंदुस्तान के 600 विद्यालयों में प्रार्थना गीत के रूप में गाया जाता है। विश्व की आठ भाषाओं में इस गीत का अनुवाद हो चुका है और इसे वहाँ भी प्रार्थना गीत के रूप में गाया जाता है। इस गीत के मेल और फीमेल दो संस्करण हैं। एक में सुषमा श्रेष्ठ, पुष्पा पागधरे आदि की आवाज़ें हैं। दूसरे में घनश्याम वासवानी, अशोक खोसला, शेखर सावकार और मुरलीधर की आवाजें हैं। 


संगीतकार कुलदीप सिंह ने इस गीत को एन चंद्रा की फ़िल्म अंकुश (1985) के लिए संगीतबद्ध किया था। इससे पहले फ़िल्म 'साथ साथ' में  कुलदीप सिंह का संगीत सुपरहिट हो चुका था। चंद्रा जी को उस समय चंदू कहा जाता था। वे फ़िल्म जगत में एक स्ट्रगलर थे। एक दिन वे कुलदीप सिंह के पास गए और बोले- पापा जी, मैंने स्ट्रगल कर रहे कलाकारों की एक टीम बनाई है और उन्हें लेकर एक फ़िल्म कर रहा हूं। कुलदीप सिंह ने बिना पारिश्रमिक मांगे फ़िल्म 'अंकुश' का संगीत दिया। गीतकार अभिलाष ने गीत लिखे। फ़िल्म हिट हुई। गीत संगीत भी हिट हुआ। पब्लिसिटी में हर जगह सिर्फ़ एन चंद्रा का नाम था। इस फ़िल्म की सफलता के साथ चंदूजी एन चंद्रा बन गए। उन्होंने पीछे पलट कर दुबारा कुलदीप सिंह और अभिलाष की तरफ़ नहीं देखा। यही फ़िल्म जगत का दस्तूर है।


'इतनी शक्ति हमें देना दाता' गीत के अलावा अभिलाष जी के लिखे साँझ भई घर आजा (लता), आज की रात न जा (लता), वो जो ख़त मुहब्बत में (ऊषा), तुम्हारी याद के सागर में (ऊषा), संसार है इक नदिया (मुकेश), तेरे बिन सूना मेरे मन का मंदिर (येसुदास) आदि सिने गीत भी बेहद लोकप्रिय हुए। अभिलाष जी 40 सालों से फ़िल्म जगत में सक्रिय हैं। गीत के अलावा उन्होंने कई फ़िल्मों में बतौर पटकथा-संवाद लेखक भी योगदान किया है। कई टीवी धारावाहिको़ं की स्क्रिप्ट लिखी है। उनके गीत, संगीत की दुनिया की अमूल्य थाती हैं।

 

संवाद लेखन और गीत लेखन के लिए अभिलाष को सुर आराधना अवार्ड, मातो श्री अवार्ड, सिने गोवर्स अवार्ड, फ़िल्म गोवर्स अवार्ड, अभिनव शब्द शिल्पी अवार्ड, विक्रम उत्सव सम्मान, हिंदी सेवा सम्मान और दादा साहेब फाल्के अकादमी अवार्ड से सम्मानित किया गया है। अदालत, धूप छाँव, दुनिया रंग रंगीली, अनुभव, संसार, चित्रहार, रंगोली और ॐ नमो शिवाय जैसे अनेक लोकप्रिय धारावाहिकों में अभिलाष ने अपनी क़लम की छाप छोड़ी है। 

 

गीतकार अभिलाष स्क्रीन राइटर एसोसिएशन के ज्वाइंट सेक्रेटरी और आईपीआरएस के डाइरेक्टर का पद भी संभाल चुके हैं। साथ ही वे अपने प्रोडक्शन हाउस मंगलाया क्रिएशन के तहत टीवी के लिए कई धारवाहिकों का निर्माण भी कर चुके हैं। हिंदी सिने जगत में रचनात्मक योगदान के लिए गीतकार अभिलाष को गीत गौरव सम्मान से विभूषित किया गया। 



🍁#अभिलाष_उर्फ़_ओमप्रकाश_अज़ीज़🍁

------------------------------------------------------

गीतकार अभिलाष का जन्म 13 मार्च 1946 को दिल्ली में हुआ। दिल्ली में उनके पिता का व्यवसाय था। वे चाहते थे कि अभिलाष व्यवसाय में उनका हाथ बटाएं। लेकिन ऐसा संभव नहीं हुआ। छात्र जीवन में बारह साल की उम्र में अभिलाष ने कविताएं लिखनी शुरू कर दी थीं। मैट्रिक की पढ़ाई के बाद वे मंच पर भी सक्रिय हो गए। उनका वास्तविक नाम ओम प्रकाश है। उन्होंने अपना तख़ल्लुस 'अज़ीज़' रख लिया।ओमप्रकाश' अज़ीज़' के नाम से उनकी ग़ज़लें, नज़्में और कहानियां कई पत्र-पत्रिकाओं में प्रकाशित हुईं। 


'अज़ीज़' देहलवी नाम से अभिलाष ने मुशायरों में शिरकत की। मन ही मन साहिर लुधियानवी को अपना उस्ताद मान लिया। दिल्ली के एक मुशायरे में साहिर लुधियानवी पधारे। नौजवान शायर 'अज़ीज़' देहलवी ने उनसे मिलकर उनका आशीर्वाद लिया। साहिर साहब को कुछ नज़्में सुनाईं। साहिर ने कहा- मुझे ऐसा लग रहा है जैसे मैं तुम्हारे मुंह से अपनी नज़्में सुन रहा हूं। तुम अपना रास्ता अलग करो। ऐसी ग़ज़लें और नज़्में लिखो जिसमें तुम्हारा अपना रंग दिखाई पड़े। साहिर का मशविरा मानकर वे अपने रंग में ढल गए। ओमप्रकाश' अज़ीज़' सिने जगत में बतौर गीतकार दाख़िल हुए तो उन्होंने अपना नाम अभिलाष रख लिया। 


अभिलाष का कहना है कि अब सिने गीतों को भाषा बदल गई। सिने गीत फास्ट फूड बन गए हैं। इन्हें सुनकर दिल को सुकून नहीं मिलता। पहले गीतों में महबूब को 'आप' कहा जाता था। फिर 'तुम' पर आए और अब 'तू' लिखा जा रहा है। गीतों से शायरी ग़ायब हो गई है। ज़िंदगी की ज़रूरतों को पूरा करने के लिए अब गीत बेचना पड़ता है। मोबाइल की एक कॉलर ट्यून के लिए उपभोक्ता को 30  रूपए महीना भुगतान करना पड़ता है। ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ गीत को दो करोड़ से अधिक लोगों ने अपनी कॉलर ट्यून बनाया है। कॉपी राइट अमेंडमेंट बिल 2012 पास होने के बावजूद इससे ज़बर्दस्त कमाई करने वाली टी सीरीज़ म्यूज़िक कम्पनी ने इसके गीतकार अभिलाष को कोई भुगतान नहीं किया। 


गीतकार अभिलाष मृदुभाषी, मिलनसार और विनम्र इंसान थे। उन्होंने कई बेहतरीन ग़ज़लें और नज़्में लिखी हैं। अगर वह मंच पर जाते तो मंच की गरिमा बढ़ती। सिने गीतकार  बनने के बाद उन्हें मंच पर कविता पाठ का कभी आकर्षण नहीं रहा। दोस्ताना महफ़िलों और आत्मीय समारोहों में वे कविता पाठ भी करते थे।

लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना

महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर  यांना 




 महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना  जाहीर करण्यात आला आहे.  5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. अमित  विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सन 2020-21 साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली.  

         उषा मंगेशकर यांनी  मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. सुबह का तारा , जय संतोषी मां , आझाद , चित्रलेखा , खट्टा मीठा ,काला पत्थर, नसीब, खुबसूरत, डिस्को डान्सर , इनकार अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गायलेल्या लावण्यांमधील गावरान ठसका रसिकांना विशेष भावला. त्यांनी गायलेली असंख्य भावगीते, भक्तिगीते  अतिशय लोकप्रिय आहेत. 

             सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी उषाताईंचे पुरस्काराबददल अभिनंदन केले आहे. हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार शासनाने आपल्याला प्रदान करण्याचे घोषित केल्याबद्दल, उषाताई मंगेशकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

              गायन व संगीत या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या कलाकारास राज्य शासनातर्फे सन 1992 पासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येते.  संगीतकार  राम - लक्ष्मण, उषा खन्ना, उत्तम सिंग, प्रभाकर जोग, गायिका सुमन कल्याणपूर, आशा भोसले, पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले यांसारख्या अनेक मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Saturday 26 September 2020

इंडस्ट्री को बदनाम किया जा रहा हैं - डायरेक्टर विशाल भारद्वाज

 हमारी इंडस्ट्री को बदनाम किया जा रहा हैं, माफ कर दो हमे- डायरेक्टर विशाल भारद्वाज


फिल्मी दुनिया, एक ऐसी खूबसूरत नगरी , जिसकी चकाचौंध हर किसी को अपना दीवाना बना देती हैं, ये एक ऐसी मायानगरी हैं जिसके अंदर जाकर लोग कभी इससे बाहर नही आना चाहते। अच्छी हो या बुरी , हैं तो ये फ़िल्म इंडस्ट्री अपनी सी। पर आजकल के माहौल ने लोगो के मनोबल को तोड़कर रख दिया हैं कि क्या इस फिल्मी दुनिया मे बाहरी वालो को प्यार नही ? क्या यहां महिलाएं अपने काम को लेकर सुरक्षित नही और क्या यहां नशीली मादक पदार्थो का सेवन आपकी योग्यता को दर्शाता हैं।फिल्म इंडस्ट्री आज इल्ज़ामों के कटघरे में हैं। 


और इसी पर हाल ही में स्क्रीन राइटर एसोसिएशन के प्रेस कॉन्फ्रेंस में अतिथि बनकर आये डायरेक्टर, प्रोड्यूसर, सिंगर,म्यूजिक डायरेक्टर और राइटर विशाल भारद्वाज से जब पूछा गया कि आजकल फ़िल्म इंडस्ट्री में जो टॉक्सिक कल्चर हैं, जो जहरीला मौहाल हैं काम करने के लिए , उसपर क्या बोलना चाहेंगे! तो इसपर विशाल जी ने कहा ' ये लोगो की बनाई हुई बकवास हैं ,आजकल जो खास चल रही हैं।हमारी इंडस्ट्री बहुत ही खूबसूरत हैं जहाँ पर आपस मे बहुत प्यार हैं। जब किसी फ़िल्म की शूटिंग खत्म होती हैं तब पूरी यूनिट को एक दूसरे से बिछड़ने का बहुत  दुख होता हैं। मुझे यहां कभी बाहरी पन का अहसास नही हुआ ।मुझे इस इंडस्ट्री ने बहुत प्यार दिया हैं" ।


 इतना ही नही विशाल जी आगे कहते हैं कि " ये इंडस्ट्री ऐसी हैं जहा आप रातो रात स्टार बन सकते हैं और जोकर बन सकते हैं। अगर आप मे टैलेंट हैं तो आपकी लॉटरी लगने से कोई नही रोक सकता चाहे वो फिल्मी खानदान से हैं या नॉन फिल्मी खानदान से हो। हमारी इंडस्ट्री में बहुत भावनात्मक प्यार हैं। तो कृपा करके हमे माफ कर दीजिए हमे छोड़ दीजिये अपने हाल पर हम बहुत अच्छे हैं। यहाँ पर कोई टॉक्सिक कल्चर नही हैं बल्कि हम सब एक परिवार हैं" ।

 #Director #VishalBhardwaj #विशालभारद्वाज #निर्देशक

STATEMENT BY MR. KARAN JOHAR

 

 

 

Certain news channels, print/ electronic media and social media platform(s) are wrongly and misleadingly reporting that narcotics were consumed at a party that I, Karan Johar hosted on July 28, 2019 at my residence.

 

I had already clarified my position way back in 2019 that the allegations were false.

 

In view of the current malicious campaign, I am reiterating that the allegations are completely baseless and false. No narcotics substance was consumed in the party. I WOULD LIKE TO UNEQUIVOCALLY ONCE AGAIN STATE THAT I DO NOT CONSUME NARCOTICS AND I DO NOT PROMOTE OR ENCOURAGE CONSUMPTION OF ANY SUCH SUBSTANCE.

 

All these slanderous and malicious statements, news articles and news clippings have unnecessarily subjected me, my family, and my colleagues, and Dharma Productions, to hatred, contempt and ridicule.

 

I would like to further state that several media / news channels have been airing news reports that Kshitij Prasad and Anubhav Chopra are my “aides” / “close aides”. I would like to place on record that I do not know these individuals personally and neither of these two individuals are “aides” or “close aides”. NEITHER I, NOR DHARMA PRODUCTIONS CAN BE MADE RESPONSIBLE FOR WHAT PEOPLE DO IN THEIR PERSONAL LIVES. THESE ALLEGATIONS DO NOT PERTAIN TO DHARMA PRODUCTIONS.

 

I wish to further state that Mr. Anubhav Chopra is not an employee at Dharma Productions. He was briefly associated with us for only two months in the capacity of 2nd assistant director for a film, between November 2011 and January 2012 and as assistant director for the short film in January 2013. He has thereafter never been associated with Dharma Productions for any other project.

 

Mr. Kshitij Ravi Prasad joined Dharmatic Entertainment (sister concern of Dharma Productions) in November 2019 as one of the executive producers on contract basis for a project which eventually did not materialise.

 

However, in the past few days, the media has resorted to distasteful, distorted and false allegations. I hope the members of the media would exercise restraint else I will be left with no option but to legally protect my rights against this baseless attack on me.

Friday 25 September 2020

Baiju Mangeshkar’s Digital Baithak

Baiju Mangeshkar’s Familial Tribute With Malhaar Baithak’s  ‘The Mangeshkar Legacy’, A Digital Baithak



September seems to be a rather cherished month for the illustrious Mangeshkar family of India. Bharat Ratna Lata Mangeshkar, who is fondly referred to as the Queen of Melody while Padma Vibhushan Asha Bhosle, arguably the most versatile playback singer in the history of the Indian film and music industry. Interestingly both the sisters were born in the month of September! Asha Bhosle, who just celebrated her birthday in a familial celebration at Lonavala, while the family gears towards celebrating Lata Mangeshkar’s birthday on the 28th in the coming week! What grabs our attention is what Baiju Mangeshkar, their nephew has in store for us! A musical treat celebrating the legacy of the Mangeshkar family.


Baiju Mangeshkar, the new generation torch-bearer of this illustrious musical family, has been invited to make his presence felt by the Malhaar Baithak to share some interesting anecdotes and back stories! The musical troupe comprising of students from the U.A.E., will pay an endearing tribute to this musical legacy and the family’s famous classical compositions in an interactive session with Baiju! “I am delighted to be invited as a guest to witness such an honourable tribute to my aunts, my father and the entire family,” he avers. 


Yours to witness is the digital baithak live on selected social media.

Thursday 24 September 2020

भारताचा 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास पुढे ढकलण्यात आला

 भारताच्या 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ( 51वा इफ्फी)यंदा गोवा येथे दि. 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर, 2020 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले होते. मात्र हा महोत्सव आता पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन कार्यक्रमानुसार आता दि. 16 ते 24 जानेवारी, 2021 या काळामध्ये हा चित्रपट महोत्सव भरविण्यात येणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.


आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या मार्गदर्शक सूचना आणि शिष्टाचार लक्षात घेवून दि. 16 ते 24 जानेवारी,2021 या काळात या महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आला आहे. कोविड-19 महामारीचा उद्रेक लक्षात घेवून यंदा हा महोत्सव संयुक्त स्वरूपामध्ये म्हणजे प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. अलिकडच्या काळामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांप्रमाणे कोविड-19 संबंधित सर्व नियम यावेळी काटेकोरपणे लागू करण्यात येणार आहेत.

Tuesday 22 September 2020

आशालता बावगावकर यांना श्रद्धांजली

 *जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज करोना मुळे निधन झाले.* 

*आशालता वाबगावकर यांचा अल्पपरिचय.* 



जन्म. २ जुलै १९४१

आशालता नाईक हे आशालता वाबगांवकर यांचे माहेरचे नाव.

 ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘सं. संशयकल्लोळ’ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता वाबगावकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकाचे गोपीनाथ सावकार हे दिग्दर्शक होते. रेवतीच्या भूमिकेसाठी मुलींचा शोध चालू झाला. काहींची भाषा योग्य नव्हती, काहींना रेवतीचे सौंदर्य नव्हते, तर काहींना गाण्याचे अंग नव्हते. मुंबई आकाशवाणीवर त्या काळी कोकणी विभागात असणारे विष्णू नाईक यांनी आशालता नाईक या मुलीचे नाव सुचवले. आकाशवाणीवर त्यांनी या मुलीची भाषा ऐकली होती. गाणेही ऐकले होते. 

घरात स्कर्ट घालणारी ही षोडशवर्षा मुलगी साडी नेसून चाचणीला आली आणि एकही प्रश्न न विचारता सावकारांनी तिची निवड केली. सर्व जण अवाक झाले. सावकारांना विचारताच ते म्हणाले, ‘तिचा नाकाचा शेंडा फार बोलका आहे. ही मुलगी रंगभूमीवर नाव काढील.’ त्यांची निवड योग्य ठरली. संस्थेने स्पर्धेत सादर केलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत शारदा’ व ‘संगीत मृच्छकटीक’ या तिन्ही नाटकांत अनुक्रमे रेवती, शारदा व वसंतसेना या भूमिकांसाठी दर वर्षी आशालता वाबगावकर यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी साकार केलेल्या भूमिका अद्यापि लोकांच्या स्मरणातून गेलेल्या नाहीत. पं. गोविंदराव अग्नींनी त्यांची सर्व गाणी पारंपरिक पद्धतीने बसवली होती. त्यांची वसंतसेनेची भूमिका पाहूनच प्रा. वसंतराव कानेटकरांनी ‘हीच माझी मत्स्यगंधा,’ असे उद्गार काढले होते. म्हणून आशालता वाबगावकर या आपल्या दोन्ही गुरूंचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत असत.

नाट्यस्पर्धांतून बक्षिसे मिळविणारी आशालता वाबगावकर सर्वार्थाने रसिकांच्या मनात कायमची जाऊन बसल्या, त्या त्यांच्या मत्स्यगंधेच्या भूमिकेने. या नाटकात संवादाबरोबरच संगीताची परीक्षा त्यांना प्रेक्षकांसमोर द्यायची होती. जितेंद्र अभिषेकी या नव्या दमाच्या कल्पक संगीत दिग्दर्शकाचेही ते पहिलेच नाटक. त्यामुळे एक वेगळा तणाव आशाच्या मनावर येणे स्वाभाविक होते. अभिषेकींनी आपल्या कौशल्याने त्यांच्या गळ्यात चपखल बसतील, अशा चाली अलगदपणे तिच्या गळ्यात उतरवल्या. आशालता वाबगावकर यांनीही परिश्रमपूर्वक या चालींचे सोने केले. कुठलीही भूमिका साकारताना त्यासाठी अपार कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. म्हणूनच ‘भावबंधन’ नाटकात चित्तरंजन कोल्हटकर (घनश्याम) व प्रसाद सावकार (प्रभाकर) यांसारख्या मुरलेल्या अनुभवी कलाकारांबरोबर आपल्याला लतिकेची भूमिका करावी लागणार आहे, हे समजल्यावर त्यांनी, त्या मा. नरेश यांना आपल्या घरी येऊन तालीम देण्याची विनंती केली. मा. नरेश यांनी प्रकृती अस्वस्थ असूनसुद्धा पंधरा दिवस आशाताईंच्या घरी राहून त्यांना या भूमिकेचे बारकावे समजावून दिले होते. दुर्दैवाने अल्पावधीतच त्यांचे निधन झाल्यामुळे मा.नरेश त्यांचा प्रयोग मात्र पाहू शकले नाहीत.

पहिल्यांदाच रंगभूमीवर येणाऱ्या नाटकात एखादी भूमिका साकार करणे हे जितके कठीण असते, त्याहीपेक्षा पूर्वी रंगभूमीवर येऊन गेलेल्या व प्रेक्षकांच्या मनात स्थिर होऊन राहिलेल्या, दुसऱ्या कलाकाराने साकारलेल्या भूमिका करणे हे अति अवघड असते; कारण प्रेक्षकांच्या नजरेसमोर तरळत असलेल्या पूर्वीच्या अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कौशल्याचा प्रभाव स्वत:च्या भूमिकेने पुसून टाकणे हे आव्हान असते व ते पेलण्यासाठी धाडस लागते, जबर आत्मविश्वास लागतो. आशाताईंनी हे आव्हान अनेक वेळा यशस्वीरीत्या पेललेले होते. यात ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मधील येसूबाई (सुधा करमरकर), ‘गारंबीचा बापू’मधील राधा (उषा किरण), ‘गुंतता हृदय हे’मधील कल्याणी (पद्मा चव्हाण) आणि ‘भाऊबंदकी’नाटकात त्यांनी आनंदीबाईची भूमिका केली होती. ही भूमिका आधी दुर्गाबाई खोटे करीत असत. दाजी भाटवडेकर (राघोबादादा), मा. दत्ताराम (रामशास्त्री) अशा कसलेल्या अनुभवी कलाकारांबरोबर काम करणे सोपी गोष्ट नव्हती. नटश्रेष्ठ केशवराव दाते यांनी आशाताईंना आनंदीबाईच्या स्वभावाचे कंगोरे समजावून सांगितले होते, मार्गदर्शन केले होते. आनंदीबाई ही राजकारण कोळून प्यालेली, आपल्या सौंदर्यावर आपला नवरा पूर्णपणे भाळलेला आहे हे जाणणारी, महत्त्वाकांक्षी स्त्री. ‘या नाटकात डोळ्यांचा आणि शब्दांचा उपयोग करा, शब्द प्रेक्षकांच्या उरी घुसले पाहिजेत,’ असा कानमंत्र दाते यांनी आशाताईंना दिला होता. एका प्रवेशात नारायणरावांची गारद्यांच्या हातून हत्या होताना आनंदीबाई पाहते आणि लगेच बाकी सर्वांच्या समोर त्यांचे प्रेत पाहून रडवेली होते, असा क्षणात मुद्राभिनय बदलण्याचा प्रसंग होता. साताऱ्याला या प्रसंगानंतर त्यांच्यावर प्रेक्षकांतून चप्पल फेकली. त्या क्षणभर नर्व्हस झाल्या. भाषण आठवेना. रामशास्त्रीच्या भूमिकेतील मा. दत्ताराम जवळच उभे होते. ते म्हणाले, ‘मुली, ही तुझ्या अभिनयाला दिलेली दाद आहे. पुढचं वाक्य बोल.’ या व अशा भूमिकांमुळे आशा आणि आव्हान हे रंगभूमीवरचे समीकरणच झालेले असावे.

दि गोवा हिंदू असोसिएशन, चंद्रलेखा, अभिजात, मुंबई मराठी साहित्य संघ, माउली प्रॉडक्शन्स व आय.एन.टी. अशा सहा संस्थांमधून त्यांनी जवळजवळ पन्नासहून अधिक नाटकांचे हजारो प्रयोग केले. चंद्रलेखा या संस्थेत त्यांनी सर्वाधिक नाटके केली. ‘घरात फुलला पारिजात’मध्ये चंद्रलेखा, ‘आश्चर्य नंबर दहा’ मध्ये विमला, ‘विदूषक’ मध्ये अंजली, ‘गरुडझेप’मधील सत्तरी ओलांडलेली राजमाता जिजाबाई आणि ‘वाऱ्यावरची वरात’मधली तारस्वरात कन्नड भाषेचे हेल काढून बोलणारी कडवेकर मामी अशा भिन्नभिन्न स्वभावाच्या भूमिकांमधून आशाताईंनी आपले नाट्यनैपुण्य प्रकर्षाने प्रगट केलेले आहे. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकात खुद्द पु.लं.च्या बरोबर काम करायला मिळणे हा त्या आपल्या आयुष्यातील भाग्ययोग मानत असत.

‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाच्या वेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाला बँडेज केले होते. असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे हालचाली करणे कठीण झाले होते. शंभरावा प्रयोग रद्द करणे योग्य नसल्यामुळे त्या तशाही परिस्थितीत भूमिका करण्यासाठी तयार झाल्या. प्रयोग सुरू होण्याअगोदर त्यांनी ही परिस्थिती प्रेक्षकांना समजावून सांगितली. 

आपली भूमिका नेहमीप्रमाणे होऊ शकत नसल्यामुळे ज्यांना पैसे परत पाहिजेत, त्यांना ते देण्याची संस्थेने तयारी दाखविली; पण एकाही प्रेक्षकाने पैसे परत घेतले नाहीत. 

आशालता वाबगावकर यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात अभीनय केला होता. 

दूरदर्शनवरआशालता वाबगावकर यांनी एका कोकणी नाटकात भाग घेतला होता. त्यातील त्यांचा अभिनय बघून नामांकित चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी त्यांच्याबद्दल चौकशी केली. त्यांचे ‘गुंतता हृदय हे’हे नाटक पाहिले आणि ‘अपने पराये’ या आपल्या चित्रपटात त्यांना भूमिका दिली. अमोल पालेकर, गिरीश कार्नाड यांच्यासारख्या चित्रपटसृष्टीत मुरलेल्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी त्यांना पदार्पणातच मिळाली होती. त्यांनी चित्रपट तंत्राची मुळाक्षरे बासुदांसारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली गिरवल्यामुळे नंतर केलेल्या जवळजवळ दोनशेहून अधिक हिंदी व पन्नासहून अधिक मराठी चित्रपटांचा प्रवास सोपा झाला. आशाताई कधी स्तुतीने भाळल्या नाहीत किंवा निंदेने चळल्या नाहीत. रंगभूमीवर किंवा चित्रपटात डोळ्यांत पाणी आणण्यासाठी त्यांना कधी ग्लिसरीनचा वापर करावा लागला नाही, असे त्या अभिमानाने सांगतात. स्टेजवर नुसते रूप असून भागत नाही. आपण बोललेले शब्द प्रेक्षकांच्या मनाला गोड वाटले पाहिजेत. चेहरा बोलला पाहिजे. भूमिकेशी एकरूप व तन्मय झाले म्हणजे प्रेक्षक तुमचा अभिनय स्वीकारतात. प्रेक्षक हुशार असतात. त्यांना अस्सल व नक्कल यांतला फरक लगेच समजतो. याच प्रेक्षकांनी आपला अभिनय गोड मानून घेतला आणि आपल्याला उदंड प्रेम दिले, याबद्दल त्या त्यांचे ऋणही व्यक्त करत असत.

(Copied from Unknown source)

Thursday 25 June 2020

झाले हो शूटींग सुरू

चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्याने चित्रीकरण कामांना वेग येणार
- सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

सांस्कृतिक विभागामार्फत ३० मे २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांबाबतचे स्पष्टीकरण

मुंबई दि.२५ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्यामुळे ठप्प झालेली चित्रपटसृष्टीतील कामे पुन्हा सुरू झाली आहेत. राज्य शासनाने  काही अटी-शर्तींच्या अधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे, शासनाच्या या निर्णयामुळे मनोरंजन, चित्रपट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओ टी टी यांच्या चित्रीकरणासंदर्भात राज्य शासनाने मार्गदर्शक तत्वे ३० मे २०२० रोजी जारी केलेले  आहे. या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करताना संबंधित संस्था/संघटना  यांना काही अडचणी येत होत्या. त्यामुळेच सांस्कृतिक विभागामार्फत ३० मे २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संबंधित संस्थांनी या स्पष्टीकरणात्मक सूचनांनुसार कार्यवाही करावी. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक २०२००६२४११०९३७८२३ असा आहे.

१.  चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओ टी टी यांना ३० मे २०२० च्या शासन निर्णयानुसार चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. सदर चित्रीकरणाची परवानगी राज्य शासनाने तयार करून दिलेल्या एस ओ पी (मार्गदर्शक तत्वे) नुसार असेल. लॉकडाउन पूर्वी  चित्रीकरणासाठी शासनाची परवानगी घेण्याची पद्धत यापुढेही तशीच असणार आहे.

२. लॉकडाउन पूर्वी ज्या पद्धतीने आरक्षण आणि चित्रीकरणाची परवानगी घेण्यात येत होती त्याच पद्धतीने आताही तीच पद्धत असणार आहे. चित्रीकरण  करत  असताना संबंधित निर्मात्याने आवश्यक त्या परवानग्या, स्व-घोषित पत्र, चित्रीकणासंबंधित सर्व माहिती चित्रनगरीला लिखित स्वरूपात कळविणे आवश्यक आहे.

३. प्रतिबंधित क्षेत्र नसलेला भाग आणि निषीद्ध क्षेत्र नसलेला भाग यामध्येच चित्रीकरणाला परवानगी आहे. केंद्र शासन व राज्य शासन यांनी लॉकडाउन बाबत दिलेल्या निर्णयाचे पालन करणे आवश्यक राहील.

४. मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पणे पालन करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे संबंधित निर्मिती संस्था/ निर्माते यांची असेल. चित्रीकरणादरम्यान सुरक्षेचे व स्वच्छतेचे नियम पाळले जात आहे की नाही याची खातरजमा वेळोवेळी परवाना अधिकारी (लायसेन्स ऑथॉरिटी) यांच्यामार्फत करण्यात येईल.

५. चित्रीकरणादरम्यान कलाकार, तंत्रज्ञ सामाजिक अंतर ठेवून चित्रीकरण करू शकतात,संबंधित निर्मात्यांनी कमीत कमी मनुष्यबळात चित्रीकरण करणे आवश्यक आहे. संबंधित निर्मात्यांनी केंद्र व राज्य शासनाचे लॉक डाउन संदर्भातील नियम पाळणे आवश्यक आहे.

६. थर्मल स्क्रिनिंग, स्वच्छतेची काळजी चित्रिकरणच्या  ठिकाणी असणे आवश्यक आहे. चित्रीकरणाच्या स्थळी जवळील कोविड -१९ रुग्णालये याची माहिती दूरध्वनी क्रमांक निर्मिती संस्थेला असणे आवश्यक आहे. तसेच निर्मिती संस्थेने एक स्वतंत्र वाहन आरक्षित करून ठेवणे आवश्यक आहे, जेणे करून जर एखादा संशयित रुग्ण चित्रीकरणाठीकाणी आढळल्यास त्याला रुग्णालयात नेणे सोयीस्कर होईल. तसेच या वाहनात प्रथमोपचार पेटी, पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, शुगर टेस्टिंग किट असणे आवश्यक आहे.

७. राज्य शासनामार्फत जारी  करण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचना या कलाकार/ तंत्रज्ञ/ मदतनीस यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात आले आहे.

चित्रिकरण स्टुडिओ आणि एडिटिंग कक्षात कोविड-१९  विषाणूचा धोका टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करणे, सर्व संबंधितांना, कर्मचाऱ्यांचे कोरोना विषाणूच्या संदर्भात प्रबोधन करून दक्षता घेण्याच्या सूचना देणे, चित्रीकरणस्थळी गर्दी टाळणे, कमीत कमी तंत्रज्ञांमध्ये
चित्रिकरण स्टुडिओ आणि एडिटिंग कक्षात कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करणे, सर्व संबंधितांना, कर्मचाऱ्यांचे कोरोना विषाणूच्या संदर्भात प्रबोधन करून दक्षता घेण्याच्या सूचना देणे, चित्रीकरणस्थळी गर्दी टाळणे, कमीत कमी तंत्रज्ञांमध्ये  काम करणे, मोबाईलमध्ये आरोग्यसेतू ॲप इन्स्टॉल करणे, साधनसामुग्रीची हाताळणी, चित्रीकरणाच्यावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, कार्यालयांचे, चित्रिकरण स्थळांचे सॅनिटायझेशन आदी बाबींवर भर देण्याच्या अटी-शर्ती टाकण्यात आल्या असून या अटी शर्तींचे, शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे, निर्बंधांचे  सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालन करणे गरजेचे आहे.

Saturday 25 April 2020

एक्टर इरफान खान इनकी मां का निधन

दुख की घड़ी / मशहूर एक्टर इरफान खान की मां का निधन, जयपुर में अपने निवास पर ली अंतिम सांस


एक्टर इरफान खान, इनकी मां का निधन हो गया है।
मूल रूप से जयपुर के रहने वाले हैं इरफान खान

हॉलीवुड और बॉलीवुड फिल्म के मशहूर अभिनेता इरफान खान की मां सईदा बेगम का शनिवार को निधन हो गया।  सईदा बेगम करीब 80 वर्ष की थीं। वे काफी समय  से बीमार चल रही थीं।

उनके छोटे बेटे सलमान खान ने बताया कि मां वैसे तो स्वस्थ थी, लेकिन अचानक से शनिवार सुबह उनकी तबियत बिगड़ गई थी। उन्होंने कर्बला मोड रामगढ़ रोड स्थित अपने निवास स्थान पर अंतिम सांस ली।

Friday 24 April 2020

Manushi Chhillar urges to distributes sanitary pads along with daily rations

‘I urge for distributing sanitary pads along with daily rations’ : appeals Manushi Chhillar as underprivileged women become susceptible to hygiene crisis amid coronavirus pandemic

Gorgeous Miss World 2017 Manushi Chhillar, who is set to debut in Akshay Kumar’s Prithviraj, has always championed the cause of women. She backs Project Shakti, a non-profit programme, that has joined hands with local women across India and has empowered them to make a living by educating them to make biodegradable sanitary pads. The initiative works towards raising the awareness on menstrual hygiene among women in the local communities of these women.

Manushi lauds the government’s decision to include sanitary pads as essential commodity amid coronavirus crisis. However, she explains that underprivileged women have become prone to severe risks due to shortage of funds in the hands of daily wage earners because of SARS-CoV-2 – the terminology now being used by medical fraternity to describe coronavirus globally. Manushi has an appeal to make to the all the government authorities.

“I’m hugely thankful that sanitary pads have been listed as an essential commodity by the government of India during SARS-CoV-2 crisis. However, we need to focus on how women, especially from the economically handicapped strata, can get pads free of cost. I also urge the governments of various states to kindly look into distributing sanitary pads along with daily rations to the underprivileged,” she says.

Manushi adds, “The issue is that due to the shortage of funds, particularly among the daily wage earners, most would be looking to spend their money on just food and women’s sanitation might not be a top priority for many families. This would increase the health hazard for millions of women in India as sanitary pads come at a certain cost and the financial crisis is definitely going to push women to be at risk. I have spoken to organizations who are working non-stop in ensuring pads are distributed free of cost but it would be great if administration, from a district level to city to state level comes forward to help the needy.”

Thursday 23 April 2020

महाराष्ट्र शासनाचा corona मुकाबला कार्ड : निर्णयक्रम

असा सुरु आहे कोरोनाचा मुकाबला (निर्णयक्रम)

४ मार्च.
विमानतळ, बंदरावर तपासणीचे निर्देश.
मुंबईत कस्तुरबा रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर येथी विलगीकरण कक्ष.
केंद्र शासनाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
राज्यात पीपीई कीट, एन-९५ मास्क, ट्रीपल लेअर मास्क आदी सुविधा मुबलक उपलब्ध.

५ मार्च.
राज्यात संशयीत रुग्ण नाही. नागरिकांनी भिती न बाळगता सतर्कता ठेवावी.
कोरोनाच्या चाचणी करण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर येथे सुविधा
आंतरराष्ट्रीय विमानातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची तपासणी.
सार्वजनिक होळीच्या सणाचा आनंद घेताना स्वरुप मर्यादित ठेवण्याचे आवाहन.

११ मार्च.
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक.
विमानतळ, बंदरांवरील यंत्रणा अधिक सतर्क कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज.
आरोग्य विभागासह विमानतळ, बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती खबरदारीचे निर्देश.
नागरिकांनी सामुहीक कार्यक्रमांना गर्दी करणे टाळावे.
शाळा, महाविद्यालये तसेच धार्मिक कार्यक्रम यांचेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार.
खासगी रुग्णालयातील विशेषज्ञांनी यासंदर्भात सर्वसामान्यरित्या अवलंबवायची कार्यपद्धती (एसओपी) तातडीने तयार करावी.
जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात याव्यात.

१२ मार्च
महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाच्या 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत.
प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरु करण्यात यावा.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या 7 देशांमधून प्रवास केलेल्यांना शंभर टक्के क्वॉरंटाईन करण्यात यावे.
राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करण्यात यावे.
यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत.
जे परदेशातून प्रवास करुन आले आहे त्यांनी 14 दिवसांपर्यंत घरीच थांबावे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या शहरात विलगीकरण सुविधा तातडीने निर्माण कराव्यात.

१३ मार्च
कोरोनामुळे राज्यात मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू
खबरदारीसाठी व्यायामशाळा, चित्रपट, नाट्यगृहे,जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय
मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नागपूर येथील व्यायामशाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव या महिना अखेरीपर्यंत बंद करण्याचा निर्णय.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दहावी व बारावीच्या परीक्षा वगळून शाळा, महाविद्यालये बंद राहतील.

१४ मार्च
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय.
राज्यभरातील माल्सही बंद ठेवणार.
कोरोनाच्या प्रतिबंध आणि उपचारासाठी जिल्हा नियोजन निधीतून साडे तीन टक्के निधी खर्चास मान्यता.
ऑर्थर रोड कारागृहातील संशयीत रुग्ण कैद्यांना क्वारंटाईन करणार. कैद्यांच्या तपासणीचे प्रमाण वाढविणार.
बनावट सॅनिटायझर, विकणाऱ्यांवर कठोर कारवाई.
सोशल मिडीयावर खोटा प्रचार करणाऱ्यांवरही सायबर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई.

१५ मार्च
मास्क, सॅनिटायझरचा काळा बाजार केल्यास कारवाई.
कोरोना चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात अतिरिक्त यंत्रणा.

१६ मार्च
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य.
सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी बंद करा राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम, मेळावे थांबवा
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका,  रेल्वेमधून, बसमधून अनावश्यक प्रवास टाळा.
केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करून आलेल्यांना सक्तीचे क्वारंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामध्ये दुबई, सऊदी अरेबिया, अमेरिका यांचा समावेश.
मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.
कोरोना प्रतिबंधासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद.
नियोजित परीक्षा ३१ मार्च नंतर घेण्याचा निर्णय.

१७ मार्च
शासकीय कार्यालये, सार्वजनिक वाहतूक बंद राहणार नाहीत
अनावश्यक गर्दी, प्रवास टाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
मंत्रालयासह शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार नाहीत. मात्र, परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून याविषयी योग्य तो निर्णय वेळोवेळी घेण्यात येईल.
सध्या अत्यावश्यक नसलेल्या सेवांना शासनाने मर्यादित स्वरुपात काम करण्यास सांगितले आहे.
खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून वर्क फ्राम होम कार्यपद्धती मान्य.
रास्तभावन धान्य दुकानात ई-पास उपकरणावर बोट अंगठा लावण्याची आवश्यकता नाही.
महावितरणाच्या ऑनलाईन सेवांचा वापर करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन.
विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिस्थितीनुसार वर्क-फ्राम-होम प्रमाणे काम करण्याचे निर्देश.
राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित.
तुरुंग प्रशासनाला सज्जतेचे निर्देश, नव्याने भरती होणाऱ्या बंद्याचे स्क्रीनिंग करण्याचे निर्देश.
सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून देण्याचे आवाहन, साठेबाजी करण्यास मनाई.
कुक्कूटपालन उत्पादनांबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश.

१८ मार्च
शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील.
रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्याक खर्चाच्या आर्थिक निर्बंधातून सूट देण्याचा वित्त मंत्रालयाचा निर्णय.
जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश.
राज्यात नव्याने आठ ठिकाणी कोरोना स्त्राव नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरु करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे सुतोवाच.
कोरोनासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातदारांवर कडक कारवाईचे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचे निर्देश.
गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती न करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे निर्देश.
कोरोना आपत्ती निवारणासाठी विभागीय आयुक्तांना ४५ कोटी रुपयांचा निधी वितरीत.

१९ मार्च
‘वॉर अगेंस्ट व्हायरस’ आपण निश्चित जिंकणार.
जनतेने गर्दी करणे बंद करा, सूचनांचे पालन करा
पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी यासंदर्भात बोललो असून त्यांनी राज्याला पुरेपूर सहकार्य केले जाईल हे सांगीतले आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मिडियावरून लाईव्ह प्रसारणाद्वारे सांगितले. जनतेने घाबरून जाऊन जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा.
आयकर परतावा भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती.
मुख्यमंत्र्यांनी सिंगापूर दुतावासाशी संपर्क साधून, विमानतळावर अडकलेल्या भारतीय विशेषतः महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या चमुच्या परतण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश.
स्वस्त धान्य दुकानात एप्रिल सोबतच मे, जूनचे धान्य उपलब्ध.
आठवडाभरात १३३० खाटांची क्षमता असलेले विलगीकरण कक्ष कार्यान्वित होणार.
विनापरवाना तसेच बनावट सॅनिटायझरची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार.
एमसीएईटीची २८ मार्च रोजी होणारी परीक्षा ३० एप्रिल रोजी होणार
एसटी प्रवासासाठी ज्येष्ठांच्या स्मार्टकार्डला एक महिन्याची मुदतवाढ.

२० मार्च
शासकीय कार्यालयांतील उपस्थिती  25 टक्क्यांवर
मुंबई, पुणे, नागपूर मधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने आज मध्यरात्रीपासून कार्यालये बंद
मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने, आस्थापना व खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा.
चाचणी केंद्रे आणि प्रयोगशाळा यांच्या सध्याच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मागणी.
महानगरातील सर्व खासगी दुकाने, आस्थापना दि. 31 मार्च पर्यंत बंदचे निर्देश सर्व बँका तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित वित्तीय संस्था यांना लागू नाही.
कोरोना प्रतिबंधक उपचाराचा गोल्डन अवर सुरु, यंत्रणांनी सतर्क रहावे, मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
कोरोनाच्या अनुषंगिक साहित्य खरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना प्रदान.
पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द.
नववी ते अकरावी वर्गांच्या परीक्षा पंधरा एप्रिलनंतर घेण्यात येणार.
शिक्षकांनाही घरीच बसून वर्क फ्राम होम काम करण्याची अनुमती.
दहावी व बारावीचे पेपर घरी तपासणीचा निर्णय घेणार.
मास्क सॅनिटायझर्सची विनापरवाना विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची धडक कारवाई.

२१ मार्च
कोरोना संकटात कंत्राटी, तात्पुरत्या कामगारांचे वेतन न कापण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
राज्याच्या कामगार विभागाची सर्व कारखाने व व्यवसायांना निर्देश.
मंत्रालयात करोना नियंत्रण कक्ष
उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासह मदत कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालयात करोना नियंत्रण कक्षाची स्थापना.
दहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित.

२२ मार्च
फेसबुक “लाईव्ह” प्रसारण
आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू
महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका.
रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद.
जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील
अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थिती.
मध्यरात्रीपासून आंतरराष्ट्रीय विमाने बंद.
कोरोना विरुद्धच्या लढाईत दिवस रात्र काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, डॉकटर्स, रुग्णवाहिका चालक, पोलीस कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून टाळ्या वाजवून गौरव.
मीच माझा रक्षक संदेशाचे प्रत्येकाने पालन करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन.
मुंबई आणि पुणे येथील तपासणी केंद्रांना मान्यता. बावीसशे नमुने तपासण्याची क्षमता.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणच्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश.
अत्यावश्यक सेवेसाठी एसटी महामंडळाची मदत. मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांच्या वाहतुकीसाठी एसटी. महामंडळ आणि बेस्टवर जबाबदारी.

२३ मार्च.
आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सुचना
संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू, लोकहितासाठी कठोर निर्णय.
जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद.
काल राज्यात १४४ कलम लावले होते आता राज्यात संचार बंदी.
महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश, अधिसूचना जारी
जे. जे. रुग्णालयात कोरोनाच्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण.

२४ मार्च.
संकटात संधी शोधू नका, मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरूच राहणार.
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन.
अत्यावश्यक सेवा, बजावणाऱ्या शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटी आणि बेस्टची सेवा.
अखंडीत वीजपुरवठा देण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचे निर्देश.
धुळे-नंदूरबार विधान परिषदेची पोटनिवडणूक पुढे ढकलली.
अन्न व औषध प्रशासन विभागाचा नियंत्रण कक्ष स्थापन.
कोरोनाविषयी अधिकृत माहितीसाठी राज्यशासनाचा व्हाटस अप ग्रुप
प्रधानमंत्र्यांच्या लाकडाऊन घोषणेचे पालन परंतु दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम राहाणार.

२५ मार्च.
घरी राहा, सुरक्षित राहा, मुख्यमंत्र्याचे आवाहन, जीवनावश्यक वस्तू उपलब्ध, अत्यावश्यक सेवा, दुकाने सुरु राहणार.
एसीचा वापर टाळण्याचे आवाहन.
राज्यात १४ एप्रिल पर्यंत लाकडाऊन, सुधारित अधिसूचना जारी.
राज्यभरात २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता, ५५ हजार ७०७ खाटांची सोय.
आरोग्याशी निगडीत साहित्य पुरविण्यासाठी उद्योगांना पुढे येण्याचे आवाहन.

२६ मार्च
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवणार.
जीवनावश्यक वस्तू घरपोच सोसायटीपर्यंत पोहोचविण्याचे नियोजनाचे आवाहन.
राज्यातील मालवाहू ट्रक वाहतुकीला परवानगी, खासगी संस्थांद्वारे कम्युनिटी किचनचा निर्णय.
कोरोनाच्या संकटातून मुक्त झाल्यावरच रेडीरेकनर दर जाहीर होणार.
कृषी व पूरक उद्योगांशी संबंधित वाहतूक सुरळीत सुरु राहणार.
राज्यातील ८ खासगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता.
भाजीपाला वाहतूक विना अडथळा सुरु राहणार.
कोकण विभागात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक नियंत्रणासाठी वार रुमची स्थापना.
डाक्टर, आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास सांगितल्यास घर मालक, हौसिंग सोसायटीवर कारवाई होणार.
खासगी वैद्यकीय व्यावसायीकांनी दवाखाने बंद न ठेवण्याचे आवाहन. परराज्यातील नागरिकांची काळजी घेणार.
केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील लाभार्थींना लाभ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे यंत्रणांना निर्देश.
कोरोना चाचणीसाठी राज्यातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये साधन सामुग्री उपलब्ध.
नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पुर्ववत सुरु.

२७ मार्च.
हाटेलमधील पदार्थ घरपोच करण्यासह, अंडी, कोंबडी, मटण मासेविक्रीला परवानगी.
सुरक्षितता बाळगून आंबा, द्राक्षे, संत्री, केळी फळ विक्रीसही मान्यता.
ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट त्रिसुत्रीनूसार कोरोनाचा प्रतिबंध करणार.
राज्यातील सर्व दिव्यांगाना महिन्याचे रेशन, स्वच्छता किट घरपोच मिळणार. एक महिन्याचे पेन्शन आगाऊ देण्याचा निर्णय. बँकेतील व्यवहारही होणार रांगेशिवाय.
जे. जे. समूह रुग्णालयातील कोरोना रुग्णालयांसाठी नोडल अधिकारी म्हणून विनिता सिंघल यांची नियुक्ती.
लॅटव्हियामध्ये अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी प्रयत्न सुरू.
मासे, मत्स्यबीज व मत्स्यखाद्याच्या वाहतूकीस परवानगी.
राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
शिवभोजन केंद्राचे उद्दीष्टात वाढ. दुध संकलन व्यवस्थित व्हावे यासाठी निर्देश. रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन.
विदर्भ, मराठवाड्यातील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य.

२८ मार्च
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ नावाने स्वतंत्र बँक खाते, मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
मजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये, आरोग्य, जेवण व निवासाची व्यवस्था शासन करणार- मुख्यमंत्र्यांचा दिलासा.
कोरोना बाधितांवार आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार होणार.
बाल संगोपन संस्थांमधील बालकांची विशेष काळजी घेण्याचे बालविकास मंत्र्यांचे निर्देश.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध होणार.

२९ मार्च
परराज्यातील कामगार, कष्टकरी यांची पूर्ण काळजी घेणार. कोरोना विरोधातील लढ्यातील महत्त्वाचा टप्पा सूरू. अजूनही गर्दी कमी करा अन्यथा कठोर पावले उचलण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा.
मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर.
कोरोनाच्या संकटात केवळ पाच रुपयांत शिवभोजन. शहरांसोबतच तालुकास्तरावरही रोज एक लाख शिवभोजन थाळी देण्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचे निर्देश.
लाकडाऊनमुळे अडकलेल्या आदिवासी बांधवासाठी अन्न व निवाऱ्याची सोय करण्याचे आदिवासी विकास मंत्र्यांचे निर्देश.
गरजू, गरीब आणि कामगार यांच्यासाठी निवास-भोजन व्यवस्था करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनाचे निर्देश.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य, जिल्हा, महापालिकास्तरावर नियंत्रण समित्या कार्यान्वित.
स्थलांतरित कामगार, बेघरांना सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन निधीतून खर्च करण्यास मान्यता.
कोरोनाच्या अनुषंगाने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरील पथकर वसुली आज मध्यरात्रीपासून बंद.
ऊसतोड मजुरांना निवास, भोजनासह, आरोग्य सुविधा पुरविण्याचे शासनाचे साखर कारखान्यांना आदेश.

३० मार्च.
मुख्यमंत्री सहायता निधीकडे ओघ सुरू, साडे बारा कोटी जमा, तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणांचे योगदान.
जंतूनाशकांची फवारणी आवश्यकतेनुसार पालिकाच करणार, सोयायट्यांनी फवारणी करू नये. नियंत्रण कक्षाच्या बैठकीत निर्णय.
विस्थापित कामगारांच्या व्यवस्थेसाठी मुख्यमंत्र्यांनी केला ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर.
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत चोवीस तास मदत कार्य, तत्काळ संपर्काचे आवाहन.
बांधकाम कामगारांच्या मध्यान्ह भोजनाची तातडीने व्यवस्था करण्याचे कामगार मंत्र्यांचे निर्देश.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याचे निर्देश.
पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात करण्याचे राज्य नियामक आयोगाची घोषणा.
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी केंद्राकडे २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज देण्याची मागणी.

३१ मार्च.
मुंबईत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रय़त्न.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड – १९ हे स्वतंत्र बँक खाते सुरु.
स्थलांतरितांसाठी एक हजार केंद्रे स्थापन, सुमारे सव्वादोन लाख मजुरांची व्यवस्था.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही. मार्चचे वेतन दोन टप्प्यात देणार.
राज्यात दररोज १० लाख लिटर्स दुधाची पंचवीर रुपये दराने खरेदी करण्याची वित्त मंत्र्यांची घोषणा.
कोरोनाच्या चाचण्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा, दिवसाला होऊ शकतात साडेपाच हजार चाचण्या.
राज्यात कोरोना निदान करणाऱ्या २३ प्रयोगशाळा कार्यान्वित.
कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत ग्रामपंचायत, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांना एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता.

१ एप्रिल
दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोणतेही धार्मिक सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत.
मरकजमधील सहभागी नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करण्याचे आवाहन.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाना घरपोच वस्तू देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
राज्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तांदूळ वाटप करण्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचे निर्देश.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता डिजिटल प्लॅटफार्म.
हरभरा खऱेदीसाठी नोंदणी प्रक्रियेच्या कालावधीत वाढ.

२ एप्रिल
दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामधील राज्यातील सहभागी नागरिकांना क्वारंटाईन करणे सुरु.
सर्वधर्मीय गुरुंना आवाहनाची मुख्यमंत्र्यांची सूचना पंतप्रधानांनी स्वीकारली.
वसईतील तबलिगी संमेलनास वेळीच परवानगी नाकारल्याची गृह मंत्र्यांची माहिती.
राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये आरोग्यमंत्र्यांची घोषणा.
लाकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांसाठी विशेष मदत देण्याचा केंद्राचा विचार.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल.
क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेसाठी राज्यात २ हजार ३३३ पथके सज्ज आरोग्यमंत्र्यांची माहिती.

३ एप्रिल.
कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यु झाल्यास पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याची वित्त मंत्र्यांची घोषणा.
कोरोना प्रतिबंधक मास्क, टेस्टींग व पीपीई किटस्, व्हेंटिलेटर्सवरील जीएसटी माफ करण्याची उपमुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी.
क्लस्टर कटेंनमेंट कृती योजनेंतर्गत राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण.

४ एप्रिल
कोरोनाच्या परिस्थितीत समाजामध्ये दुही माजविणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा.
जयंती, सण उत्सव, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन.
कोरोना मुकाबल्यासाठी सव्ला लाख आयुष डाक्टरांना प्रशिक्षण देणार
कामगारांच्या अडचणींचे निराकारण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती.

५ एप्रिल
राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही, जादा दराने वस्तू विकणाऱ्या दुकानदारांना शासनाचा कारवाईचा इशारा.
मंत्रालयात मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा प्रवेश नाही

६ एप्रिल
कोरोना संक्रमण थांबविण्याबाबत राज्यपालांचा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद.
कोरोना प्रतिबंधासाठी सव्वातीन लाख पीपीई किटस्, मास्क, व्हेंटीलेटर्सची केंद्र शासनाकडे मागणी.
आरोग्यमंत्र्यांच्या पुढाकारातून तबलिगी धर्मगुरूंची बैठक, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन.
राज्यात १ लाख ६३ हजार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप.
विद्यापीठांमध्ये टेस्टिंग लँब सुरु करण्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या सूचना.
जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोविड-१९ निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर.
राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा.
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा.

७ एप्रिल
मंत्रिमंडळ निर्णय
o केशरी शिधापत्रिका धारकांना एप्रिल ते जून २०२० कालावधीत सवलतीच्या दराने अन्नधान्य.
o कोविडच्या अनुषंगाने धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा.
o शिवभोजन – तालुकास्तरावर विस्तार आणि पुढील तीन महिन्यांसाठी पाच रुपये दरात थाळी देणार.
o कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता.
धारावी झोपडपट्टीतील क्वारंटाईन सुविधा, उपचार विशेष रुग्णालयाची आरोग्यमंत्र्यांकडून पाहणी.
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी mahainfocorona.in संकेतस्थळ कार्यान्वित, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा पुढाकार.
आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन, शासनासोबत कोरोना प्रतिबंधात्मक युद्धात सहकार्य करण्यासाठी कोरोनोयोद्धा म्हणून पुढे यावे.
लाँकडाऊन कालावधीत रक्ताचा तुटवडा भासणार नाही- अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांची ग्वाही.
शालेय विद्यार्थ्यांसाठी लर्न फ्राम-होम सुविधा- शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा.
आयसीटीकडून सॅनिटायझर टनेलची निर्मिती- उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती.
बाजारसमित्यांनी भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या पणन मंत्र्यांच्या सूचना.

८ एप्रिल.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील मोफत तांदळाचे वाटप सुरु, २३ लाख क्विंटल धान्याचे वाटप.
महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही – आरोग्यमंत्र्यांची माहिती.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालकांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षणाची ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी सहकारी संस्थांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे सहकार मंत्र्यांचे आवाहन.
कोविड-१९ प्रतिबंधासाठी प्राणी संग्रहालये, व वन्य प्राणी बचाव केंद्रांनी अधिक दक्षता घेण्याचे वनमंत्र्याचे निर्देश.
हाफकिनकडून प्रमाणित पीपीई किट, एन९५ मास्क विक्रीला परवानगी.
बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य आता बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर समाज माध्यमांमध्ये आक्षेपार्ह मजकूर पाठविणाऱ्या १३२ जणांवर गुन्हे.
मुंबई व पुणे महानगर क्षेत्रात सर्व शासकीय कार्यालयात मास्क घालणे बंधनकारक.
आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत- कोरोनायोद्धाबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन.

९ एप्रिल
मंत्रिमंडळ निर्णय
o राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी शिफारस
o आर्थिक पुनरुज्जीवनासाठी दोन समित्या नेमण्याचा निर्णय
o सर्व विधीमंडळ सदस्यांच्या वेतनात ३० टक्के कपात.
o महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण साधेपणाने करणार.
o निवारा केंद्रांमध्ये भोजनाची क्षमता वाढविण्यास, चांगल्या सुविधा देण्याबाबत निर्णय.
उद्योग क्षेत्रापुढील समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध, उद्योजकांसोबत उद्योगमंत्र्यांचा व्हीसीद्वारे संवाद.
मास्कचा वापर आवश्यक व अनिवार्य – गृहमंत्र्यांचे निर्देश.

१० एप्रिल.
राज्यातील पुरवठा अधिकाऱ्यांसोबत अन्न, नागरी पुरवठा मंत्र्यांचा व्हिसीद्वारे संवाद, विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची, चांगल्या नियोजनाचे निर्देश.
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाधित क्षेत्रातील पाच कारागृहे लाऍकडाऊन- गृहमंत्र्यांची माहिती.
कोविड संशयित मृत्यू- पोलिस यंत्रणेला चौकशी न करण्याची मुभा.
नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती येथे कोरोना चाचण्यांची सुविधा देण्याची आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी.

११ एप्रिल
मा. मुख्यमंत्र्यांचा मा. प्रधानमंत्र्यांशी व्हिसीद्वारे संवाद. राज्यातील परिस्थिती व उपाययोजनांची दिली माहिती.
महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लाँकडाऊन- मुख्यमंत्र्याची घोषणा – तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
स्वयंसेवी संस्थांना अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून देणारी केंद्र शासनाची ओएमएसएस योजना राज्यात लागू केल्याची अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची घोषणा.
व्हाँटसअँप एँप मार्गदर्शिका प्रकाशित, समाजमाध्यमे हाताळताना विशेष दक्षता घेण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची त्रिस्तरीय वर्गवारी.
रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन कार्यान्वीत.
केंद्रीय पथकाकडून पुणे विभागाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा.
कुठल्याच अनुज्ञप्तींना ऑनलाईन मद्य विक्रीची परवानगी नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्पष्टीकरण.

१२ एप्रिल.
मुख्यमंत्री सहायता निधीत ओघ, १९७ कोटी रुपये जमा.
स्थलांतरित कुटुंबांना रेशन देण्यासाठी महसूल यंत्रणा काम करणार-महसूल मंत्र्यांचे निर्देश.
लाँकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार-गृहमंत्री.
दहावीचे भूगोल, कार्यशिक्षण पेपर रद्द. नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द.
ससून रुग्णालयात मेडिकल गॅस पाईपलाईनचे काम विक्रमी ११ दिवसात पूर्ण.
राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची माहिती.

१३ एप्रिल.
मुंबईतील नामवंत डाक्टर्स, कोरोना लढाईत शासनाबरोबर टास्क फोर्स, हाँटलाईनद्वारे मार्गदर्शन करणार- मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद.
शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरु करावेत, औद्योगीक स्थितीचा उद्योगमंत्र्यांकडून आढावा.
प्रसारमाध्यमांतील सक्रीय पत्रकारांची कोविड-१९ चाचणी करण्याचे उद्योगमंत्र्यांचे निर्देश.
कोविड-१९ प्रमाणेच ‘सारी’ आजाराच्या नियंत्रणासाठी शासन सज्ज.
केंद्र सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या धान्यासाठी सवलत देण्याची अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची मागणी.
समाज माध्यमांचा गैरवापर केल्यास कठोर कारवाईचा गृहमंत्र्यांचा इशारा.
चंद्रपूरमध्ये अडीच कोटी रुपयांची कोरोना प्रयोगशाळा-मदत व पुनर्वसन मंत्र्यांची घोषणा.
विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नाही – उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती.
निर्जंतुकीकरणासाठी अतिनील किरणांची टाँर्च निर्मिती – उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती.

१४ एप्रिल.
परराज्यातील मजूर, कामगारांनी संयम ठेवावा, राज्य सरकार पूर्ण काळजी घेणार, परिस्थितीचे राजकारण न करता एकत्र लढा देऊ या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित २१ हजार जणांचे कोरोना लढ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज.
कोरोना संकटाच्या प्रभावी मुकाबल्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री उपसमिती स्थापन.
अर्थव्यवस्था पुनरूज्जीवनाच्या उपाययोजना सुचविण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन, अर्थमंत्र्यांची माहिती.
कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दोन समित्यांची नियुक्ती-आरोग्यमंत्र्यांची माहिती.
लाँकडाऊन हाताळण्यासाठी पोलिसांना आधुनिक ड्रोनची मदत-गृहमंत्र्यांची माहिती.
राज्यात १४० लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन, ३० एप्रिलपर्यंत नियोजन पूर्ण करण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश.
घरपोच पोषण आहार, पुरवठा सुरळीत महिला व बालविकास मंत्र्यांची माहिती.
राज्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना पर्यटन संचालनायाची मदत, पाच पर्यटक मायदेशी परत.

१५ एप्रिल.
कोरोनाचा मुंबई-पुण्यातील आलेख खाली आणायचाय, मुख्यमंत्र्यांची कार्पोरेट रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा.
लाकडाऊनच्या काळात शेतीशी निगडीत व्यवसायांना सूट
जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये यासाठी सहकार्य करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचे आवाहन.
शेतकरी हितासाठी विविध निर्णय आवश्यक – महिला व बालविकास मंत्र्यांची अपेक्षा.

१६ एप्रिल.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग दोनवरून सहा दिवसांवर, चाचण्यांपैकी निम्म्या मुंबईत – आरोग्यमंत्र्यांची माहिती.
केंद्राच्या मार्गदर्सक सूचनांनुसार राज्यातील उद्योग सुरु होणार- उद्योगमंत्र्याची माहिती.
कोविडसंदर्भात डाँक्टरांचा सल्ला घ्या, टेलिमेडीसीनद्वारे. राज्य शासनाची कोविड मदत हेल्पलाईन.

१७ एप्रिल.
अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायीक उपक्रम सुरु, सुधारित मार्गदर्शक आदेश जारी. लोकांना अत्यावश्यक सेवा जीवनावश्यक वस्तू विना अडथळ मिळत राहतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
मंत्रीमंडळ उपसमितीचे निर्णय
o प्राँपर्टी व्यवहारांच्या नोंदणीस परवानगी.
डीपीसीचा २५ टक्के निधी आरोग्यासाठी.
o अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना त्वरीत वेतन.
कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्राला आर्थिक सहकार्य करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी.
रेशनिंगचे धान्य वाटप विनातक्रार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी व्यक्तीशः लक्ष घालण्याचे उपमुख्यमंत्र्याचे आवाहन.
घरभाडे वसूली तीन महिने पुढे ढकलावी, गृहनिर्माण मंत्र्यांचे आवाहन.
हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांकडून हेक्टरी ११.२९ क्विंटल हरभरा खरेदी होणार.
मानक कार्यप्रणाली सुरु करणाऱ्या बाजार समित्यांचे व्यवहार २१ एप्रिलपासून सुरू करण्याची परवानगी द्यावी.

१८ एप्रिल.
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट, घरोघर वितरणावर मात्र बंदी.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य रक्कम थेट बँक खात्यात – कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील
कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करूनच शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी- उपमुख्यमंत्र्यांची माहिती.
कोरोना उपचारांसाठी विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट, ६ हजार ६६० खाटांची उपलब्धता, राज्यात ५५ विशेष रुग्णालये अधिसूचित –आरोग्यमंत्र्याची माहिती.
राज्यात २० एप्रिलपासून कापूस खरेदी सुरु होणार – सहकार व पणन मंत्र्यांची माहिती.
सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड-१९ तपासणी केंद्रांची मान्यता.
अंगणवाडीतील बालकांना घरपोच शिधा, पंधरा दिवसांत १०० टक्के पुरवठा करण्याचे महिला व बालकल्याण मंत्र्यांचे आवाहन.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व २५ लाखांचे विमा संरक्षण- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांची घोषणा.
रमजान मध्ये मुस्लिम बांधवांनी घऱातच रोजा इफ्तार, तरावीह पठण करण्याचे अल्पसंख्याक विकास विभागाचे आवाहन.

१९ एप्रिल.
काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करणार, मात्र जिल्हयांच्या सीमा बंदच राहतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
जिल्हा प्रशासन, पोलिसांनी अधिक सतर्क राहून लाँकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे, पालिकांनी पावसाळ्यापुर्वीची महत्त्वाची कामे संपवावी मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
कोविड-१९च्या प्रतिकारासाठी ग्रामपंचायत पातळीवर स्वच्छाग्रहींची नियुक्ती करणार- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांची माहिती.
पाणी टंचाई निवारणाच्या कामांकरिता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ.
कोरोना संसर्ग – व्यक्ती किंवा समुहावर होणारी जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक.
टाळेबंदीतही दररोज २० हजार क्विंटल फळे, भाजीपाल्याची विक्री, कृषी विभागाच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना दिलासा.
मालेगाव, अहमदनगर आण सोलापूर येथे तज्ज्ञ डाँक्टरांचे पथक नियुक्त.
एकत्रित वार्षिक विवरणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ- कामगार आय़ुक्तांची माहिती.

२० एप्रिल.
पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये, सर्व हल्लेखोर तुरुंगात सीआयडी तपास सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.
महाराष्ट्रात ७५ हजार रॅपीड टेस्ट करणर, कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार –आरोग्यमंत्र्याची माहिती.
खासगी संकेतस्थळावर ग्रामविकास विभागातील पदभरतीची खोटी जाहिरात, संबंधितावर गुन्हा दाखल होणार.

२१ एप्रिल
परराज्यातील कामगारांची घरी जाण्याची इच्छा लक्षात घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार
मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द. नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केल्याने शासनाचा निर्णय
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे स्वतंत्र बँक खाते,'सीएसआर' निधी जमा करता येणार. उद्योजक, व्यावसायिकांना पुढे येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन